म.टा.प्रतिनिधी, नागपूर
शेतांना असलेल्या कुंपणात वीजप्रवाह सोडल्याने त्याचा धक्का लागून वाघ व इतर प्राण्यांची शिकार होण्याच्या घटनांत अलीकडे वाढ झाली आहे. नियमबाह्यपणे विद्युतप्रवाह सोडण्याच्या या प्रकारांना आळा घालण्यासाठी महावितरणने आता वनविभागाच्या सहाय्याने संयुक्त गस्त मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या गस्त मोहिमेला सुरुवातही करण्यात आली आहे.
शिकारीच्या घटना टाळण्यासाठी वनविभागाच्या सहकार्याने रात्रीच्या वेळी ग्रामीण भागात गस्त घालून या गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न यानिमित्ताने सुरू झाला आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन महिन्यांच्या कालावधीत तीन वाघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. शेतातील कुंपणात वीजप्रवाह सोडल्याने या वाघांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. शेतातील कुंपणात वीजप्रवाह सोडणे बेकायदेशीर असतानादेखील असे प्रकार ग्रामीण भागात सुरू आहेत. या प्रकारामुळे मनुष्यहानीदेखील झाली आहे. वाघाशिवाय अन्य जंगली जनावरांच्या शिकारीसाठी कधीकधी शेतातील कुंपणात वीजप्रवाह सोडला जातो. जंगली जनावरांची शिकार केल्यावर याचा फारसा गवगवा होत नाही. पण, एकूणच हा प्रकार बेकायदेशीर आहे. जनतेमध्ये जागृती करण्यासाठी महावितरणकडून वाघाची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे. यासाठी कायद्यात शिक्षेची तरतूद केली आहे. संबंधित संदेश लिहिलेले पोस्टर्स ग्रामीण भागात लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी कोणी शेतातील कुंपणात वीजप्रवाह सोडला आहे का, याची तपासणी महावितरण आणि वनविभागाचे पथक ग्रामीण भागात करीत आहे. नागपूर जिल्ह्यातील बडेगाव तसेच वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात गुरुवारी गस्त घालण्यात आली. वरोरा येथील खेमजी गावात महावितरण आणि वनविभागाच्या गस्ती पथकास एका शेतातील कुंपणात वीजतार जोडलेली आढळून आली. पण, ती प्रवाहित नसल्याचे निदर्शनास आले. यापुढे असे प्रकार आढळून आले तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
शेतांना असलेल्या कुंपणात वीजप्रवाह सोडल्याने त्याचा धक्का लागून वाघ व इतर प्राण्यांची शिकार होण्याच्या घटनांत अलीकडे वाढ झाली आहे. नियमबाह्यपणे विद्युतप्रवाह सोडण्याच्या या प्रकारांना आळा घालण्यासाठी महावितरणने आता वनविभागाच्या सहाय्याने संयुक्त गस्त मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या गस्त मोहिमेला सुरुवातही करण्यात आली आहे.
शिकारीच्या घटना टाळण्यासाठी वनविभागाच्या सहकार्याने रात्रीच्या वेळी ग्रामीण भागात गस्त घालून या गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न यानिमित्ताने सुरू झाला आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन महिन्यांच्या कालावधीत तीन वाघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. शेतातील कुंपणात वीजप्रवाह सोडल्याने या वाघांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. शेतातील कुंपणात वीजप्रवाह सोडणे बेकायदेशीर असतानादेखील असे प्रकार ग्रामीण भागात सुरू आहेत. या प्रकारामुळे मनुष्यहानीदेखील झाली आहे. वाघाशिवाय अन्य जंगली जनावरांच्या शिकारीसाठी कधीकधी शेतातील कुंपणात वीजप्रवाह सोडला जातो. जंगली जनावरांची शिकार केल्यावर याचा फारसा गवगवा होत नाही. पण, एकूणच हा प्रकार बेकायदेशीर आहे. जनतेमध्ये जागृती करण्यासाठी महावितरणकडून वाघाची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे. यासाठी कायद्यात शिक्षेची तरतूद केली आहे. संबंधित संदेश लिहिलेले पोस्टर्स ग्रामीण भागात लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी कोणी शेतातील कुंपणात वीजप्रवाह सोडला आहे का, याची तपासणी महावितरण आणि वनविभागाचे पथक ग्रामीण भागात करीत आहे. नागपूर जिल्ह्यातील बडेगाव तसेच वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात गुरुवारी गस्त घालण्यात आली. वरोरा येथील खेमजी गावात महावितरण आणि वनविभागाच्या गस्ती पथकास एका शेतातील कुंपणात वीजतार जोडलेली आढळून आली. पण, ती प्रवाहित नसल्याचे निदर्शनास आले. यापुढे असे प्रकार आढळून आले तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.