म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
वर्तमान शिक्षणव्यवस्था नवीन विचारांच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान देण्यासाठी कॉलेजस्तरावर चौकटींबाहेर जाऊन विचारांचे आदानप्रदान वाढविण्याची आज गरज आहे. नव्या तंत्रज्ञान व माहितीसह अद्ययावत राहणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मानवसंसाधन राज्यमंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्राचार्य फोरम आणि धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य महासंघाच्या ३७ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, नॅकचे समन्वयक डॉ. जगन्नाथ पाटील, प्राचार्य टाले, ठाकरे, भोयर, निकम, देशमुख, डॉ. सुभाष ब्रह्मभट्ट व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. पांडे म्हणाले की, कौशल्यांचा विकास करण्यावर अधिक भर दिला पाहिजे. महाराष्ट्राने शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता राखली आहे. नवनवीन तंत्रज्ञान व ज्ञानाचा अंतर्भाव व व्यावहारिक उपयोग झाला पाहिजे. शिक्षकांना नियमित प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. कॉलेजेसने ‘स्मार्ट क्लासेस’वर भर देण्याचे आवाहन त्यांनी योवळी केले.
याप्रसंगी नॅक बंगलोरचे सल्लागार समन्वयक डॉ. जगन्नाथ पाटील यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, नॅक सदैव गुणवत्तेसाठी अग्रेसर असते. भारताला महासत्ता बनविण्यासाठी उच्चशिक्षणाशिवाय पर्याय नाही. तेव्हा देशाच्या विकास प्रक्रियेत सहयोग द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ‘नवीन विद्यापीठ कायदा आणि महाविद्यालयासमोरील आव्हाने’ या विषयावर विल्सन कॉलेज मुंबई संचालक डॉ. टी. ए. शिवारे, महासंघाचे माजी अध्यक्षद्वय डॉ. नंदकुमार निकम आणि डॉ. आर. जी. भोयर यांनी प्रकाश टाकला.
प्रास्ताविक भाषणातून महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी अधिवेशनाची भूमिका मांडली तसेच प्राचार्यांचा पाच वर्षांचा कालावधी मर्यादित केला आहे, तो वाढवावा, असे निवेदनही त्यांनी केले. महाराष्ट्रात प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ आहे. ते इतर राज्यातील प्राचार्यांसारखे ६५ वर्षे करावे असेही त्यांनी निवेदन केले. या अधिवेशनाचा समारोप विधान परिषद सदस्य आमदार गो. गाणार, व आमदार अनिल सोले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मीरासिंग काकण यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. अंजन नायडू यांनी केले.
वर्तमान शिक्षणव्यवस्था नवीन विचारांच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान देण्यासाठी कॉलेजस्तरावर चौकटींबाहेर जाऊन विचारांचे आदानप्रदान वाढविण्याची आज गरज आहे. नव्या तंत्रज्ञान व माहितीसह अद्ययावत राहणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मानवसंसाधन राज्यमंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्राचार्य फोरम आणि धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य महासंघाच्या ३७ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, नॅकचे समन्वयक डॉ. जगन्नाथ पाटील, प्राचार्य टाले, ठाकरे, भोयर, निकम, देशमुख, डॉ. सुभाष ब्रह्मभट्ट व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. पांडे म्हणाले की, कौशल्यांचा विकास करण्यावर अधिक भर दिला पाहिजे. महाराष्ट्राने शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता राखली आहे. नवनवीन तंत्रज्ञान व ज्ञानाचा अंतर्भाव व व्यावहारिक उपयोग झाला पाहिजे. शिक्षकांना नियमित प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. कॉलेजेसने ‘स्मार्ट क्लासेस’वर भर देण्याचे आवाहन त्यांनी योवळी केले.
याप्रसंगी नॅक बंगलोरचे सल्लागार समन्वयक डॉ. जगन्नाथ पाटील यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, नॅक सदैव गुणवत्तेसाठी अग्रेसर असते. भारताला महासत्ता बनविण्यासाठी उच्चशिक्षणाशिवाय पर्याय नाही. तेव्हा देशाच्या विकास प्रक्रियेत सहयोग द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ‘नवीन विद्यापीठ कायदा आणि महाविद्यालयासमोरील आव्हाने’ या विषयावर विल्सन कॉलेज मुंबई संचालक डॉ. टी. ए. शिवारे, महासंघाचे माजी अध्यक्षद्वय डॉ. नंदकुमार निकम आणि डॉ. आर. जी. भोयर यांनी प्रकाश टाकला.
प्रास्ताविक भाषणातून महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी अधिवेशनाची भूमिका मांडली तसेच प्राचार्यांचा पाच वर्षांचा कालावधी मर्यादित केला आहे, तो वाढवावा, असे निवेदनही त्यांनी केले. महाराष्ट्रात प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ आहे. ते इतर राज्यातील प्राचार्यांसारखे ६५ वर्षे करावे असेही त्यांनी निवेदन केले. या अधिवेशनाचा समारोप विधान परिषद सदस्य आमदार गो. गाणार, व आमदार अनिल सोले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मीरासिंग काकण यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. अंजन नायडू यांनी केले.