म.टा. प्रतिनिधी, नागपूर
उष्णतेत मोठी वाढ झाल्याने आर्द्रता तयार होऊन विदर्भातील काही भागात वातावरण ढगाळ झाले आहे. यामुळे येत्या तीन दिवसांत विदर्भाच्या २५ टक्के भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, बुधवारीदेखील पारा उच्चांकावरच स्थिर होता.
एप्रिल महिन्यात तुलनेत विदर्भातील पारा सरासरीपेक्षा सातत्याने अधिक आहे. पूर्व नागपुरात रविवारपासून पाऱ्यात सातत्याने वाढ होत आहे. दोन दिवसांपासून पारा ४४ ते ४५ अंशांदरम्यान आहे. बुधवारीदेखील हेच वातावरण कायम राहिले. ४४.५ अंशांचा पारा नागपुरात ४४ अंशांवर आला असला, तरी उन्हाचे चटके कायम आहेत. बुधवारीदेखील चंद्रपूर ४५ अंशांसह राज्यात सर्वाधिक होते. मत्र, तापमानाच्या या उच्चांकाला बुधवारी आर्द्रतेचीदेखील साथ होती.
उष्णतेत अचानक वाढ झाल्याने विदर्भ आणि परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. आर्द्रता वाढून हा पट्टा तयार होत आहे. याचा प्रभाव नागपूर शहरात बुधवारीही दिसून आला. आर्द्रता ५५ टक्क्यांच्या वर जाऊन दिवसभर उन्हासह उकाडा कायम होता. ढगांच्या आडून सूर्य डोकावत होता. सायंकाळच्या सुमारास काहिसे पावसाळी वातावरण तयार झाले होते. मात्र, पाऊस पडला नसला तरी वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला. त्याचा प्रभाव रात्री उशिरापर्यंत कायम होता.
प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, उष्णतेत एकाएकी वाढ झाल्याने आर्द्रता तयार होत आहे. यामुळे पुढील तीन दिवसांत नागपूरसह विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. यादरम्यान पाऱ्यात फार घट होण्याची शक्यता नाही. कमाल पारा पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र तापमानात हळूहळू वाढ होईल, असा अंदाज आहे.
उष्णतेत मोठी वाढ झाल्याने आर्द्रता तयार होऊन विदर्भातील काही भागात वातावरण ढगाळ झाले आहे. यामुळे येत्या तीन दिवसांत विदर्भाच्या २५ टक्के भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, बुधवारीदेखील पारा उच्चांकावरच स्थिर होता.
एप्रिल महिन्यात तुलनेत विदर्भातील पारा सरासरीपेक्षा सातत्याने अधिक आहे. पूर्व नागपुरात रविवारपासून पाऱ्यात सातत्याने वाढ होत आहे. दोन दिवसांपासून पारा ४४ ते ४५ अंशांदरम्यान आहे. बुधवारीदेखील हेच वातावरण कायम राहिले. ४४.५ अंशांचा पारा नागपुरात ४४ अंशांवर आला असला, तरी उन्हाचे चटके कायम आहेत. बुधवारीदेखील चंद्रपूर ४५ अंशांसह राज्यात सर्वाधिक होते. मत्र, तापमानाच्या या उच्चांकाला बुधवारी आर्द्रतेचीदेखील साथ होती.
उष्णतेत अचानक वाढ झाल्याने विदर्भ आणि परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. आर्द्रता वाढून हा पट्टा तयार होत आहे. याचा प्रभाव नागपूर शहरात बुधवारीही दिसून आला. आर्द्रता ५५ टक्क्यांच्या वर जाऊन दिवसभर उन्हासह उकाडा कायम होता. ढगांच्या आडून सूर्य डोकावत होता. सायंकाळच्या सुमारास काहिसे पावसाळी वातावरण तयार झाले होते. मात्र, पाऊस पडला नसला तरी वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला. त्याचा प्रभाव रात्री उशिरापर्यंत कायम होता.
प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, उष्णतेत एकाएकी वाढ झाल्याने आर्द्रता तयार होत आहे. यामुळे पुढील तीन दिवसांत नागपूरसह विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. यादरम्यान पाऱ्यात फार घट होण्याची शक्यता नाही. कमाल पारा पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र तापमानात हळूहळू वाढ होईल, असा अंदाज आहे.