म.टा. प्रतिनिधी, नागपूर
‘आज योगाचा प्रचार, प्रसार जगभर झाला आहे. भारतीयांचा हा वारसा आज संपूर्ण जगाने स्वीकारला, ही आनंदाची बाब आहे. अनेकदा विदेशात गेल्यास भारतीयांना योगाबद्दल प्रश्न विचारले जातात. परंतु, खेदाची बाब अशी की आपणसुद्धा या प्रश्नांची योग्य ती उत्तरे देऊ शकत नाही. जर्मनीसारख्या देशात आयुर्वेद आणि योगावर अत्यंत सखोल संशोधन सुरू आहे. भारतीयांनी ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. योग आणि आयुर्वेदात देशात मोठ्या प्रमाणावर संशोधन होणे गरजेचे आहे’, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
जनार्दनस्वामी यांच्या शतकोत्तर रजतजयंती वर्षानिमित्त रामनगर संघ मैदानात योग संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या संमेलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी गडकरी बोलत होते. गडकरींच्या हस्ते शुक्रवारी या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले होते. पुढे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संमेलनाला सदिच्छा भेट दिली. रविवारी गडकरी यांच्या उपस्थितीत या संमेलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी कांचन गडकरी, मंडळाचे कार्यवाह राम खांडवे, नगरसेविका रूपा रॉय आणि परिणीता फुके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.जनार्दन स्वामी यांनी केलेल्या कार्याबाबत गडकरी म्हणाले, ‘योगाचा प्रचार, प्रसार हे एक ईश्वरी कार्य आहे, असे समजून स्वामींनी अविरत आणि अखंडपणे हे काम केले. स्वामीजींनी संन्यास घेतला होता. आपल्या सगळ्या वैयक्तिक मोहावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी हे कार्य केले. आज मंडळातर्फे त्यांचे काम अधिक मोठ्या स्तरावर नेले जात आहे. माझी आई स्वामींची शिष्या होती. माझ्यावर माझ्या आईचा आणि परिणामतः स्वामीजींच्या विचारांचा प्रभाव आहे.’
‘विद्यापीठात योगाचे अभ्यासक्रम असावेत’
‘राज्य सरकारतर्फे योग शिक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे, ही चांगली बाब आहे. परंतु, मी अनेकदा नागपूर विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केला. अद्याप तो पूर्णत्वास आला नाही. नागपूर विद्यापीठ आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात हे अभ्यासक्रम येणे गरजेचे आहे. त्याकरिता खांडवे गुरुजींनी दिल्लीला यावे, त्यांच्या मार्गदर्शनात अभ्यासक्रम तयार केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल’, असे गडकरी म्हणाले.
योगाद्वारे रोजगारनिर्मिती!
मंडळातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून निःशुल्क योगासन शिबिरे घेतली जातात, हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. परंतु, निःशुल्क गोष्टींचे महत्त्व लोकांना लवकर पटत नाही. याउलट शुल्क आकारल्यास त्याला महत्त्व प्राप्त होईल. एवढेच नाही, तर विद्यापीठांनी अभ्यासक्रम सुरू केल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीसुद्धा होऊ शकते, असे मत गडकरींनी व्यक्त केले.
‘आज योगाचा प्रचार, प्रसार जगभर झाला आहे. भारतीयांचा हा वारसा आज संपूर्ण जगाने स्वीकारला, ही आनंदाची बाब आहे. अनेकदा विदेशात गेल्यास भारतीयांना योगाबद्दल प्रश्न विचारले जातात. परंतु, खेदाची बाब अशी की आपणसुद्धा या प्रश्नांची योग्य ती उत्तरे देऊ शकत नाही. जर्मनीसारख्या देशात आयुर्वेद आणि योगावर अत्यंत सखोल संशोधन सुरू आहे. भारतीयांनी ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. योग आणि आयुर्वेदात देशात मोठ्या प्रमाणावर संशोधन होणे गरजेचे आहे’, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
जनार्दनस्वामी यांच्या शतकोत्तर रजतजयंती वर्षानिमित्त रामनगर संघ मैदानात योग संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या संमेलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी गडकरी बोलत होते. गडकरींच्या हस्ते शुक्रवारी या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले होते. पुढे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संमेलनाला सदिच्छा भेट दिली. रविवारी गडकरी यांच्या उपस्थितीत या संमेलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी कांचन गडकरी, मंडळाचे कार्यवाह राम खांडवे, नगरसेविका रूपा रॉय आणि परिणीता फुके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.जनार्दन स्वामी यांनी केलेल्या कार्याबाबत गडकरी म्हणाले, ‘योगाचा प्रचार, प्रसार हे एक ईश्वरी कार्य आहे, असे समजून स्वामींनी अविरत आणि अखंडपणे हे काम केले. स्वामीजींनी संन्यास घेतला होता. आपल्या सगळ्या वैयक्तिक मोहावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी हे कार्य केले. आज मंडळातर्फे त्यांचे काम अधिक मोठ्या स्तरावर नेले जात आहे. माझी आई स्वामींची शिष्या होती. माझ्यावर माझ्या आईचा आणि परिणामतः स्वामीजींच्या विचारांचा प्रभाव आहे.’
‘विद्यापीठात योगाचे अभ्यासक्रम असावेत’
‘राज्य सरकारतर्फे योग शिक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे, ही चांगली बाब आहे. परंतु, मी अनेकदा नागपूर विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केला. अद्याप तो पूर्णत्वास आला नाही. नागपूर विद्यापीठ आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात हे अभ्यासक्रम येणे गरजेचे आहे. त्याकरिता खांडवे गुरुजींनी दिल्लीला यावे, त्यांच्या मार्गदर्शनात अभ्यासक्रम तयार केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल’, असे गडकरी म्हणाले.
योगाद्वारे रोजगारनिर्मिती!
मंडळातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून निःशुल्क योगासन शिबिरे घेतली जातात, हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. परंतु, निःशुल्क गोष्टींचे महत्त्व लोकांना लवकर पटत नाही. याउलट शुल्क आकारल्यास त्याला महत्त्व प्राप्त होईल. एवढेच नाही, तर विद्यापीठांनी अभ्यासक्रम सुरू केल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीसुद्धा होऊ शकते, असे मत गडकरींनी व्यक्त केले.