म. टा. प्रतिनिधी, नागपूर
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी राबविल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला नागपूर जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. तूर्तास शाळांची नोंदणी करण्यात येत असून ५ फेब्रुवारीच्या सुमारास विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाणार आहे.
पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी राज्य शासनाच्या वतीने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील मुलांसाठी सर्व शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या असतात. या जागांवर ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापन मंडळांच्या शाळांमध्ये असलेल्या या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक असते. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून www.rte25admission.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून ती राबविली जाणार आहे.
२०१७-१८ च्या शैक्षणिक सत्रासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून सुरुवातीला शाळांची नोंदणी करण्यात येत आहे. संकेतस्थळांच्या माध्यमातून शाळांची नोंदणी झाल्यानंतर एकूण जागा यंदाच्या प्रवेशासाठी उपलब्ध आहेत, याची विस्तृत माहिती मिळणार आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ७ हजार जागांवर यंदा आरटीईचे प्रवेश केले जातील.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी राबविल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला नागपूर जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. तूर्तास शाळांची नोंदणी करण्यात येत असून ५ फेब्रुवारीच्या सुमारास विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाणार आहे.
पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी राज्य शासनाच्या वतीने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील मुलांसाठी सर्व शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या असतात. या जागांवर ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापन मंडळांच्या शाळांमध्ये असलेल्या या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक असते. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून www.rte25admission.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून ती राबविली जाणार आहे.
२०१७-१८ च्या शैक्षणिक सत्रासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून सुरुवातीला शाळांची नोंदणी करण्यात येत आहे. संकेतस्थळांच्या माध्यमातून शाळांची नोंदणी झाल्यानंतर एकूण जागा यंदाच्या प्रवेशासाठी उपलब्ध आहेत, याची विस्तृत माहिती मिळणार आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ७ हजार जागांवर यंदा आरटीईचे प्रवेश केले जातील.