म.टा. प्रतिनिधी, नागपूर
देशभरात लाखोंच्या संख्येने असलेल्या व खऱ्या अर्थाने विकासाचा भाग असलेल्या छोट्या कंपन्यांना भांडवल उभारणीत अनेक अडचणी येतात. या अडचणी सोडविण्यासाठीच स्वतंत्र एसएमई एक्सचेंज स्थापन करण्यात आली. त्याबद्दल विदर्भातील कंपन्यांना माहिती देण्यासाठी सेबीची चमू नागपुरात आली होती.
मोठ्या कंपन्या अर्थव्यवस्था भक्कम करतात. तसे असले तरी देशाच्या अर्थव्यवस्थेचा खरा भार हा लघु व मध्यम क्षेत्रातील कंपन्या उचलतात. एकूण मनुष्यबळापैकी ५६ टक्के रोजगार याच कंपन्या देतात. पण तसे असतानादेखील देशभरात असलेल्या या कंपन्यांना भांडवल निर्मितीत अडचण येते. आपले मित्र, फार-फार अर्थ क्षेत्रातील बलाढ्य व्यक्ती यांच्यानंतर ते बँकांकडे जातात. पण व्यावसायिकतेचा अभाव असल्याने त्यांना या सर्व मार्गांनी एका मर्यादेपेक्षा अधिक भांडवल मिळू शकत नाही. मग या कंपन्या एकतर बंद पडतात किंवा मर्यादित विकासच साधू शकतात. हे ध्यानात घेत सीक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड अर्थात सेबी आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) यांनी पुढाकार घेत एसएमई एक्सचेंज सुरू केले. चार वर्षांपासून हे एक्सचेंज स्थिर विकास साधत आहे. पण यामध्ये आणखी कंपन्यांना आणण्यासाठी सेबीने विदर्भात पाऊल ठेवले आहे.
यासंबंधीचा विशेष कार्यक्रम शनिवार, ३० जुलैला नागपुरात झाला. त्यामध्ये सेबी आणि बीएसईच्या मंचावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथील लघु व मध्यम उद्योजकांना (एसएमई) मार्गदर्शन केले. यनिमित्ताने आयोजित पत्र परिषदेत सेबीचे पूर्णवेळ सदस्य राजीवकुमार अग्रवाल यांनी एक्सचेंजबाबत माहिती दिली. ‘देशातील लाखो छोट्या कंपन्यांसाठी ही संधी आहे. यामुळे कंपनीला निधी तर मिळतोच. पण सोबतच त्यांच्या उद्योगाचे व्यावसायिकीकरण होते. कारण या कंपन्या एकदा एक्सचेंजमध्ये आल्यानंतर त्यांना अनेक प्रकारची माहिती घोषित करावी लागते. पण त्यातच त्यांचा विकास आहे. हे ध्यानात घेऊनच आम्ही विविध ठिकाणी अशाप्रकारचे सेमिनार घेत आहोत. यानिमित्ताने त्या-त्या भागातील उद्योजकांना आम्ही पुरस्कार देतो’, असे त्यांनी सांगितले.
अशाप्रकारे छोट्या कंपन्यांना एक्स्चेंजमध्ये आणण्यासाठी सेबीने प्रामुख्याने एसएमई क्लस्टर्सवर लक्ष केंद्रीत केल्याची माहिती सेबीचे कार्यकारी संचालक एस.व्ही. मुरलीधर राव यांनी दिली. नागपुरात हा कार्यक्रम आता होत असला तरी कोइम्बतूर, राजकोट, विशाखापट्टणम, विजयवाडा, रायपूर, जमशेदपूर अशा छोटे उद्योग असलेल्या ठिकाणीदेखील घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. एसएमई एक्सचेंजचे प्रमुख अजय ठाकूर, या कार्यक्रमाचे आयोजक पेन्टोमॅथ ग्रूपचे व्यवस्थापकीय संचालक महावीर लुनावत यांच्यासह सेबी व बीएसईचे अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विदर्भासाठी फायद्याचेच
विदर्भ हा आर्थिक विकासात मागे आहे. त्याचे प्रमुख येथे तुलनेने कमी असलेले उद्योग. नागपुरात पंचतारांकित औद्योगिक वसाहतींसह दोन मोठ्या वसाहती आहेत. पण तेथेसुद्धा लघु व मध्यम उद्योगच अधिक आहेत. एकूणच या उद्योगांना पुढे जायचे असल्यास त्यांनी एसएमई एक्स्चेंजचा लाभ घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विदर्भासाठी हा सेमिनार अत्यंत फायद्याचा ठरला.
१४५ कंपन्यांचे १ हजार कोटी
चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या एक्स्चेंजमध्ये आतापर्यंत १४५ कंपन्यांनी १ हजार ०५७ कोटी रुपयांच्या भांडवलाची उभारणी केली आहे. या भांडवलाची आज बाजारी किंमत तब्बल १० हजार ४०० कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, हे भांडवल घेऊन यातीलच १८ कंपन्या मोठ्या होऊन त्या मुख्य एक्सचेंजमध्ये गेल्या आहेत, अशी माहिती बीएसईचे मुख्य व्यावसाय अधिकारी व्ही. बालसुब्रमण्यम यांनी दिली.
देशभरात लाखोंच्या संख्येने असलेल्या व खऱ्या अर्थाने विकासाचा भाग असलेल्या छोट्या कंपन्यांना भांडवल उभारणीत अनेक अडचणी येतात. या अडचणी सोडविण्यासाठीच स्वतंत्र एसएमई एक्सचेंज स्थापन करण्यात आली. त्याबद्दल विदर्भातील कंपन्यांना माहिती देण्यासाठी सेबीची चमू नागपुरात आली होती.
मोठ्या कंपन्या अर्थव्यवस्था भक्कम करतात. तसे असले तरी देशाच्या अर्थव्यवस्थेचा खरा भार हा लघु व मध्यम क्षेत्रातील कंपन्या उचलतात. एकूण मनुष्यबळापैकी ५६ टक्के रोजगार याच कंपन्या देतात. पण तसे असतानादेखील देशभरात असलेल्या या कंपन्यांना भांडवल निर्मितीत अडचण येते. आपले मित्र, फार-फार अर्थ क्षेत्रातील बलाढ्य व्यक्ती यांच्यानंतर ते बँकांकडे जातात. पण व्यावसायिकतेचा अभाव असल्याने त्यांना या सर्व मार्गांनी एका मर्यादेपेक्षा अधिक भांडवल मिळू शकत नाही. मग या कंपन्या एकतर बंद पडतात किंवा मर्यादित विकासच साधू शकतात. हे ध्यानात घेत सीक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड अर्थात सेबी आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) यांनी पुढाकार घेत एसएमई एक्सचेंज सुरू केले. चार वर्षांपासून हे एक्सचेंज स्थिर विकास साधत आहे. पण यामध्ये आणखी कंपन्यांना आणण्यासाठी सेबीने विदर्भात पाऊल ठेवले आहे.
यासंबंधीचा विशेष कार्यक्रम शनिवार, ३० जुलैला नागपुरात झाला. त्यामध्ये सेबी आणि बीएसईच्या मंचावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथील लघु व मध्यम उद्योजकांना (एसएमई) मार्गदर्शन केले. यनिमित्ताने आयोजित पत्र परिषदेत सेबीचे पूर्णवेळ सदस्य राजीवकुमार अग्रवाल यांनी एक्सचेंजबाबत माहिती दिली. ‘देशातील लाखो छोट्या कंपन्यांसाठी ही संधी आहे. यामुळे कंपनीला निधी तर मिळतोच. पण सोबतच त्यांच्या उद्योगाचे व्यावसायिकीकरण होते. कारण या कंपन्या एकदा एक्सचेंजमध्ये आल्यानंतर त्यांना अनेक प्रकारची माहिती घोषित करावी लागते. पण त्यातच त्यांचा विकास आहे. हे ध्यानात घेऊनच आम्ही विविध ठिकाणी अशाप्रकारचे सेमिनार घेत आहोत. यानिमित्ताने त्या-त्या भागातील उद्योजकांना आम्ही पुरस्कार देतो’, असे त्यांनी सांगितले.
अशाप्रकारे छोट्या कंपन्यांना एक्स्चेंजमध्ये आणण्यासाठी सेबीने प्रामुख्याने एसएमई क्लस्टर्सवर लक्ष केंद्रीत केल्याची माहिती सेबीचे कार्यकारी संचालक एस.व्ही. मुरलीधर राव यांनी दिली. नागपुरात हा कार्यक्रम आता होत असला तरी कोइम्बतूर, राजकोट, विशाखापट्टणम, विजयवाडा, रायपूर, जमशेदपूर अशा छोटे उद्योग असलेल्या ठिकाणीदेखील घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. एसएमई एक्सचेंजचे प्रमुख अजय ठाकूर, या कार्यक्रमाचे आयोजक पेन्टोमॅथ ग्रूपचे व्यवस्थापकीय संचालक महावीर लुनावत यांच्यासह सेबी व बीएसईचे अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विदर्भासाठी फायद्याचेच
विदर्भ हा आर्थिक विकासात मागे आहे. त्याचे प्रमुख येथे तुलनेने कमी असलेले उद्योग. नागपुरात पंचतारांकित औद्योगिक वसाहतींसह दोन मोठ्या वसाहती आहेत. पण तेथेसुद्धा लघु व मध्यम उद्योगच अधिक आहेत. एकूणच या उद्योगांना पुढे जायचे असल्यास त्यांनी एसएमई एक्स्चेंजचा लाभ घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विदर्भासाठी हा सेमिनार अत्यंत फायद्याचा ठरला.
१४५ कंपन्यांचे १ हजार कोटी
चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या एक्स्चेंजमध्ये आतापर्यंत १४५ कंपन्यांनी १ हजार ०५७ कोटी रुपयांच्या भांडवलाची उभारणी केली आहे. या भांडवलाची आज बाजारी किंमत तब्बल १० हजार ४०० कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, हे भांडवल घेऊन यातीलच १८ कंपन्या मोठ्या होऊन त्या मुख्य एक्सचेंजमध्ये गेल्या आहेत, अशी माहिती बीएसईचे मुख्य व्यावसाय अधिकारी व्ही. बालसुब्रमण्यम यांनी दिली.