म. टा. प्रतिनिधी,नागपूर
माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते सुबोध मोहिते यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसंग्राम पक्षात प्रवेश घेतला. आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा हा पक्षप्रवेश झाला. मोहिते यांच्या प्रवेशाने शिवसंग्रामला विदर्भात एक चेहरा मिळाला आहे.
शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करीत मोहिते यांनी एका नव्या पक्षाची वाट पकडली आहे. शिवसेनेत असताना खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता, हे विशेष. शिवसेनेत प्रवेशाचेही त्यांनी प्रयत्न केले. मात्र, ते फसल्याची चर्चा आहे. अखेर शिवसंग्राम पक्षात त्यानी प्रवेश घेतला. मोहिते यांच्याकडे मेटे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. विदर्भात मराठा समाजाची ताकद दाखविण्याचे संकेत प्रवेशानंतर त्यांनी दिले आहे.
काँग्रेसमध्ये सध्या मोहिते सक्रिय नव्हते. पक्षाने त्यांना विधानसभा, विधानपरिषदेची उमेदवारीही दिली होती. मात्र, ते अपयशी ठरले. पहिल्यांदा १९९८ मध्ये ते रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडून गेले होते. त्यांच्या रूपात शिवसेनेने प्रथमच रामटेक लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडून हिसकावला होता. आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांना पराभूत करून ते निवडले गेले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा परत ते लोकसभेवर निवडले गेले. केंद्रात वाजपेयींचे सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आले. त्यावेळी त्यांना शिवसेनेचे अनंत गिते यांच्याऐवजी केंद्रात मंत्री बनण्याची संधी मिळाली. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद देऊन त्यांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय मिळाले. मंत्रिपदावर असताना त्यांचे शिवसेनेशी असलेले सख्य बिघडू लागले. त्याचवेळी नारायण राणे यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यांच्यासोबतच मोहिते यांनीही शिवसेना सोडली. सोबतच खासदारकीचा राजीनामाही दिला. त्यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. शिवसेनेने जुने शिवसैनिक व जिल्हाप्रमुख असलेले प्रकाश जाधव यांना रिंगणात उतरविले. जाधव यांनी मोहिते यांना पराभूत केले. तेव्हापासून मोहिते राजकारणापासून दूर जाऊ लागले. त्यानंतरही काँग्रेसने त्यांना रामटेक विधानसभेची उमेदवारी दिली. तेव्हाही शिवसेनेच्या उमेदवाराकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. तरीही, काँग्रेसने एक अभ्यासू नेता म्हणून त्यांचा सन्मान करीत विधानपरिषदेची उमेदवारी दिली.
मात्र, नशिबाने त्यांना साथ दिली नाही. उमेदवारी अर्ज भरताना त्यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याने व उशिरा विधानभवनात पोहोचल्याने त्यांच्याऐवजी रजनी जैन यांना आमदारकी मिळाली. काँग्रेसने त्यानंतरही त्यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी देत पक्षाचे प्रवक्तेपद दिले. मात्र, त्यांनी सक्रियता दाखविली नाही. मधल्या काळात त्यांनी शिवसेनेत परतण्याचा प्रयत्नही केला. यात त्यांना यश आले नाही. त्यांच्या शिवसेनाप्रवेशास अनेकांनी विरोध दर्शविल्याने त्यांना पुन्हा हातात धनुष्यबाण घेता आले नाही. राजकारणात संधी मिळत नसल्याने अखेर त्यांनी शिवसंग्राम पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत राजू कडू, प्रदीप ठाकरे, किसन येसनसुरे व वसंत डोंगरे यांनीही आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षात प्रवेश घेतला.
माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते सुबोध मोहिते यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसंग्राम पक्षात प्रवेश घेतला. आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा हा पक्षप्रवेश झाला. मोहिते यांच्या प्रवेशाने शिवसंग्रामला विदर्भात एक चेहरा मिळाला आहे.
शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करीत मोहिते यांनी एका नव्या पक्षाची वाट पकडली आहे. शिवसेनेत असताना खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता, हे विशेष. शिवसेनेत प्रवेशाचेही त्यांनी प्रयत्न केले. मात्र, ते फसल्याची चर्चा आहे. अखेर शिवसंग्राम पक्षात त्यानी प्रवेश घेतला. मोहिते यांच्याकडे मेटे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. विदर्भात मराठा समाजाची ताकद दाखविण्याचे संकेत प्रवेशानंतर त्यांनी दिले आहे.
काँग्रेसमध्ये सध्या मोहिते सक्रिय नव्हते. पक्षाने त्यांना विधानसभा, विधानपरिषदेची उमेदवारीही दिली होती. मात्र, ते अपयशी ठरले. पहिल्यांदा १९९८ मध्ये ते रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडून गेले होते. त्यांच्या रूपात शिवसेनेने प्रथमच रामटेक लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडून हिसकावला होता. आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांना पराभूत करून ते निवडले गेले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा परत ते लोकसभेवर निवडले गेले. केंद्रात वाजपेयींचे सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आले. त्यावेळी त्यांना शिवसेनेचे अनंत गिते यांच्याऐवजी केंद्रात मंत्री बनण्याची संधी मिळाली. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद देऊन त्यांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय मिळाले. मंत्रिपदावर असताना त्यांचे शिवसेनेशी असलेले सख्य बिघडू लागले. त्याचवेळी नारायण राणे यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यांच्यासोबतच मोहिते यांनीही शिवसेना सोडली. सोबतच खासदारकीचा राजीनामाही दिला. त्यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. शिवसेनेने जुने शिवसैनिक व जिल्हाप्रमुख असलेले प्रकाश जाधव यांना रिंगणात उतरविले. जाधव यांनी मोहिते यांना पराभूत केले. तेव्हापासून मोहिते राजकारणापासून दूर जाऊ लागले. त्यानंतरही काँग्रेसने त्यांना रामटेक विधानसभेची उमेदवारी दिली. तेव्हाही शिवसेनेच्या उमेदवाराकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. तरीही, काँग्रेसने एक अभ्यासू नेता म्हणून त्यांचा सन्मान करीत विधानपरिषदेची उमेदवारी दिली.
मात्र, नशिबाने त्यांना साथ दिली नाही. उमेदवारी अर्ज भरताना त्यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याने व उशिरा विधानभवनात पोहोचल्याने त्यांच्याऐवजी रजनी जैन यांना आमदारकी मिळाली. काँग्रेसने त्यानंतरही त्यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी देत पक्षाचे प्रवक्तेपद दिले. मात्र, त्यांनी सक्रियता दाखविली नाही. मधल्या काळात त्यांनी शिवसेनेत परतण्याचा प्रयत्नही केला. यात त्यांना यश आले नाही. त्यांच्या शिवसेनाप्रवेशास अनेकांनी विरोध दर्शविल्याने त्यांना पुन्हा हातात धनुष्यबाण घेता आले नाही. राजकारणात संधी मिळत नसल्याने अखेर त्यांनी शिवसंग्राम पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत राजू कडू, प्रदीप ठाकरे, किसन येसनसुरे व वसंत डोंगरे यांनीही आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षात प्रवेश घेतला.