अ‍ॅपशहर

​ ‘मी खऱ्या अर्थाने लोकमाता’

लोकमाता सुमतीताई प्रतिष्ठानच्या वतीने सिंधूताई सपकाळ यांना लोकमाता पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे माझ्या माहेरचा पुरस्कार असल्याचे सिंधूताईंनी भावूकपणे सांगितले. आज मी खऱ्या अर्थाने लोकमाता झाले, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.

Maharashtra Times 25 Dec 2017, 4:00 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur sindhutai sapkal felicitate
​ ‘मी खऱ्या अर्थाने लोकमाता’


म. टा.प्रतिनिधी, नागपूर

लोकमाता सुमतीताई प्रतिष्ठानच्या वतीने सिंधूताई सपकाळ यांना लोकमाता पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे माझ्या माहेरचा पुरस्कार असल्याचे सिंधूताईंनी भावूकपणे सांगितले. आज मी खऱ्या अर्थाने लोकमाता झाले, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या खुल्या रंगमंचावर झालेल्या कार्यक्रमात डॉ. शशिकांत रामटेके यांना ‘विशेष सेवा पुरस्कारा’ने, तर वरुण श्रीवास्तव यांच्या उपाय संस्थेला उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, न्या. विकास सिरपूरकर, डॉ. उदय बोधनकर, एमटीडीसीच्या महाव्यवस्थापक स्वाती काळे, देवेंद्र दस्तुरे, ज्योत्स्ना दस्तुरे, सुधीर कुन्नावार यांची प्रमुख उपस्थिती होती.

सिंधूताई म्हणाल्या, मला ज्यांनी फटके दिले, त्याच लोकांनी सत्कार केला. पण, त्यासाठी मला संघर्ष करावा लागला. बाईच्या जातीला खूप संघर्ष येतो. सोळा दगडांनी ठेचून बाळाची नाळ तोडली. रेल्वेत गाणं गाऊन भीक मागितली. पण, मरणाऱ्यांनी जगायला शिकवले. मात्र, संघर्षाचे चीज होत असते, म्हणूनच आज सतरा देशांमध्ये जाऊन आले. मी विदर्भाची आहे आणि विदर्भ कुठेही मागे नाही. रुख्मिणीला पळवायला कृष्णही विदर्भात आला होता. त्यामुळे विदर्भातील मुलींनी स्वतःला कुठेही कमी समजू नये.' तिन्ही पुरस्कार विजेते महान व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्याकडून राष्ट्रसेवा घडत आहे. गरिबांचे अश्रू पुसणे हा सर्वांत मोठा त्याग आहे आणि धर्माचे काम आहे, या शब्दांत राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी कौतुक केले.

डॉ. शशिकांत रामटेके आणि वरुण श्रीवास्तव यांनी आयोजकांचे आभार मानले. डॉ. रामटेके यांनी आपल्या संघर्षाची कहाणी सांगतानाच २१ वर्षे झाली तरी आर्थिक अनुशेष भरून निघालेला नाही, अशी खंत व्यक्त केली. वरुण श्रीवास्तव यांनी फुटपाथ शाळा चालवून उद्याचा विद्यार्थी घडविण्याचे काम करीत असलो, तरी ही शाळा चालविण्याचे काम पडू नये, अशी भावना व्यक्त केली. तसेच पुरस्कारापेक्षा प्रोत्साहन महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन वृषाली देशपांडे यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज