अ‍ॅपशहर

नागझिरा अभयारण्यातील सहा वाघ गायब!

नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सहा वाघ गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कॅमेरा ट्रॅपमध्ये हे वाघ दिसून येत नसल्याने त्यांच्या शिकारीचा धोका व्यक्त होऊ लागला आहे. पण, वनविभागाने ही शक्यता फेटाळून लावली आहे.

Maharashtra Times 28 Jul 2016, 12:12 am
खेमेंद्र कटरे, गोंदिया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur six tigers from nagzira sanctuary missing
नागझिरा अभयारण्यातील सहा वाघ गायब!


नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सहा वाघ गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कॅमेरा ट्रॅपमध्ये हे वाघ दिसून येत नसल्याने त्यांच्या शिकारीचा धोका व्यक्त होऊ लागला आहे. पण, वनविभागाने ही शक्यता फेटाळून लावली आहे.

नागझिरा अभयारण्यातून २०१०मध्ये ‘प्रिन्स’ नामक वाघ हा पेंच व्याघ्र प्रकल्पात गेला. २०१३मध्ये ‘आयत’ हा मध्य प्रदेशातील वराशिवणीच्या जंगलात व नंतर पेंच व्याघ्र प्रकल्पात आला. ‘जय’ नामक वाघ २०१३मध्ये नागझिऱ्यातून उमरेड कऱ्हांडलाच्या जंगलात गेला. २०१४मध्ये अल्फा या वाघिणीच्या पोटी जन्मलेली ‘कॉनी’ नागझिऱ्यातून निघून गेली. दोन महिन्यातच ती नवेगावच्या जंगलात आढळून आल्याने अधिकाऱ्याना दिलासा मिळाला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून राष्ट्रपती, वीरू, डेनडू, आल्फा आणि तिचे दोन बछडे बेपत्ता आहेत. व‌नविभागाच्या अधिकाऱ्यांना याविषयीची कुणकुण लागताच त्यांनी शोधाशोध सुरू केली. पण, त्यांचा शोध घेण्यात अपयश आले आहे.

सध्या नवेगावच्या जंगलात तीन ब्लॉकमध्ये टी-६, टी-७, टी-८ हे वाघ आहेत. नागझिरा, न्यू नागझिरा आणि कोका व्याघ्र प्रकल्पात टी-४ आणि तिचे दोन बछडे आहेत. तर टी -९ हा वाघ वर्षभरापूर्वीच ताडोब्यातून नागझिऱ्यात आला आहे. टी-१० ही नवीन वाघीण कोकाच्या जंगलात दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी मायी या वाघिणीचा मृत्यू झाला होता.

वाघ कमी होण्यामागे अनेक कारणे : गुहेकर

नागझिऱ्यातील वाघांची संख्या कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. जंगलात शाकाहारी प्राण्यांची संख्या कमी होणे, पुरेसे अन्न उपलब्ध नसणे किंवा जंगलातील भ्रमण मार्गात अडथडा निर्माण होणे आदींचा समावेश आहे. शिकार हा एक घटक होऊ शकतो. पण, मृतदेह मिळेपर्यंत त्याची शिकार झाल्याचे मानले जात नाही. वाघाची शिकार केल्यास ती अधिक काळ दडवून ठेवणे शक्य होत नाही. नागझिऱ्यात आधीपासूनच वाघांची संख्या अधिक आहे. वाघिणींच्या तुलनेत वाघ अधिक प्रमाणात बाहेर पडतात. वाघ हा आई किंवा बहिणीच्या परिसरात अधिक काळ राहात नाही. हे कारणही नागझिऱ्यातील वाघांची संख्या कमी होण्यामागे असण्याची शक्यता नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदियाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर. एस. गुहेकर यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज