म.टा. प्रतिनिधी, नागपूर
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींद्वारे होणाऱ्या जलप्रदूषणावर कितीही चर्चा झाली तरीसुद्धा या मूर्ती बाजारात येतातच आणि त्यांची खरेदीसुद्धा होते. त्यामुळे या प्रश्नावर उत्तर म्हणून मटा, नीरी व पोलिस दलाच्यावतीने पर्यावरणपूरक पीओपी गणेशमूर्ती विसर्जनाची शास्त्रशुद्ध सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा मोठ्या संख्येने लाभ घेत नागपूरकरांनी पर्यावरणाबद्दल असलेल्या जागरुकतेचे प्रत्यंतर द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवातील गणेशमूर्तींचे विसर्जन विविध दिवशी केले जाते. दीड दिवसाच्या गणेशापासून ते संपूर्ण दहा दिवसांपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा बाप्पा १२ दिवस विराजमान आहे. आता विसर्जनाचे दिवस जवळ येऊ लागले आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना नागपूकरांनी नीरीने तयार केलेल्या पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर करावा, यासाठी तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नीरीतर्फे विसर्जनाकरिता १४ हजार लिटरचे दोन आणि २० हजार लिटरचा एक असे तीन कुंड तयार करण्यात आले आहेत. यातील १४ हजार लिटरच्या एका कुंडात शाडू मातीच्या तर इतर दोन्ही कुंडात पीपीओच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. या प्रकल्पाचे समन्वयक व नीरीचे शास्त्रज्ञ डॉ क्रिष्णा खैरनार म्हणाले, ‘पीओपीच्या गणेशमूर्तींकरिता कुंडांमध्ये अमोनियम बायकार्बोनेटचे द्रव्य टाकण्यात येईल. पीओपीची रिअॅक्शन होऊन त्याद्वारे अमोनियम सल्फेट आणि कॅल्शिअम कार्बोनेट तयार होईल. अमोनियम सल्फेटद्वारे खतनिर्मिती करणे शक्य आहे. हे खत नीरीच्या परिसरातील झाडांकरिता वापरण्यात येईल.’ याखेरीज गणेशमूर्तींवरील निर्माल्य वेगळे करण्याचीही व्यवस्था येथे करण्यात आली आहे. ५ सप्टेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांना येथे विसर्जन करता येणार आहे. या सुविधेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपयोग करावा आणि जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींद्वारे होणाऱ्या जलप्रदूषणावर कितीही चर्चा झाली तरीसुद्धा या मूर्ती बाजारात येतातच आणि त्यांची खरेदीसुद्धा होते. त्यामुळे या प्रश्नावर उत्तर म्हणून मटा, नीरी व पोलिस दलाच्यावतीने पर्यावरणपूरक पीओपी गणेशमूर्ती विसर्जनाची शास्त्रशुद्ध सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा मोठ्या संख्येने लाभ घेत नागपूरकरांनी पर्यावरणाबद्दल असलेल्या जागरुकतेचे प्रत्यंतर द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवातील गणेशमूर्तींचे विसर्जन विविध दिवशी केले जाते. दीड दिवसाच्या गणेशापासून ते संपूर्ण दहा दिवसांपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा बाप्पा १२ दिवस विराजमान आहे. आता विसर्जनाचे दिवस जवळ येऊ लागले आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना नागपूकरांनी नीरीने तयार केलेल्या पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर करावा, यासाठी तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नीरीतर्फे विसर्जनाकरिता १४ हजार लिटरचे दोन आणि २० हजार लिटरचा एक असे तीन कुंड तयार करण्यात आले आहेत. यातील १४ हजार लिटरच्या एका कुंडात शाडू मातीच्या तर इतर दोन्ही कुंडात पीपीओच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. या प्रकल्पाचे समन्वयक व नीरीचे शास्त्रज्ञ डॉ क्रिष्णा खैरनार म्हणाले, ‘पीओपीच्या गणेशमूर्तींकरिता कुंडांमध्ये अमोनियम बायकार्बोनेटचे द्रव्य टाकण्यात येईल. पीओपीची रिअॅक्शन होऊन त्याद्वारे अमोनियम सल्फेट आणि कॅल्शिअम कार्बोनेट तयार होईल. अमोनियम सल्फेटद्वारे खतनिर्मिती करणे शक्य आहे. हे खत नीरीच्या परिसरातील झाडांकरिता वापरण्यात येईल.’ याखेरीज गणेशमूर्तींवरील निर्माल्य वेगळे करण्याचीही व्यवस्था येथे करण्यात आली आहे. ५ सप्टेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांना येथे विसर्जन करता येणार आहे. या सुविधेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपयोग करावा आणि जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.