म. टा. प्रतिनिधी, नागपूर
तुरीचे डाळीचे उत्पादन वाढल्यानंतर सरकारने सुरू केलेली खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांकडे असलेली तूर लक्षात घेता खरेदीची मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी समोर आली आहे. लिलावाद्वारे तूर विक्री सुरू केल्याने शेतकऱ्यांना क्विंटलमागे सुमारे हजार रुपयांचा फटका बसत आहे.
गेल्यावर्षी तुरीला चांगला भाव मिळाला. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात लागवड झाली. निसर्गाने साथ दिल्याने उत्पादनदेखील वाढले. परंतु, बाजारात अपेक्षित भाव मिळाले नाही. तूर उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबवणे व योग्य भाव मिळावा, यासाठी सरकारने तूर खरेदीचा निर्णय घेतला. बाजारात ४००० ते ४२०० रुपये क्विंटल भाव असल्याने सरकारने ५०५० रुपये क्विंटल भावाने तूर खरेदी सुरू केली. नाफेडने विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून ही खरेदी केली. परंतु, गोदामांची अडचण, तूर साठवण्यासाठी गोण्यांची कमरता आणि अन्य कारणांमुळे सरकारसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या परिसरात तूर खरेदी करताना अनेक अडचणी आल्या. बाजारात नेलेली तूर शेतकऱ्यांना उघड्यावर ठेवावी लागली.
तूर खरेदीसाठी सुरुवातीला सरकारने मोजकी केंद्रे सुरू केली. केंद्राची संख्या कमी असल्याने त्यासाठीही मागणी झाली. माजी मंत्री अनिल देशमुख यांनी नरखेड परिसरासाठी आक्रमक भूमिका घेतल्याने केंद्र सुरू करण्यात आले. परंतु, ते केंद्र काही दिवसच सुरू होते. महिनाभरापूर्वी खरेदीची मुदत संपल्यानंतरही शेतकऱ्यांनी माल बाहेर काढला नाही. तूर खरेदी परत सुरू होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी घरीच माल ठेवला. परंतु, अद्याप सरकारकडून तसे संकेत मिळालेले नाही. खरीप हंगाम, लग्न व इतर कार्य, शिक्षण आदींमुळे पैशाची गरज असलेल्या शेतकऱ्यांनी आता चार रुपये क्विंटलप्रमाणे बाजारात लिलावासाठी तूर आणली आहे. लिलावामुळे शेतकऱ्यांना ८०० ते हजार रुपये क्विंटलमागे फटका बसत आहे. सरकारने तातडीने तूर खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
‘खरेदी पुन्हा करा सुरू’
काटोलचे केंद्र १० मार्चपासून बंद करण्याचे पत्र विदर्भ मार्केटिंगने दिले. तेव्हाच केंद्र बंद करण्यात आले. गेल्या आठवड्यात नाफेडने १५ एप्रिलपासून खरेदी बंद करण्याची सूचना केली. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तूर असल्याने सरकारने यावर पुनर्विचार करून खरेदी परत सुरू करावी, अशी मागणी काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तारकेश्वर शेळके यांनी केली.
तुरीचे डाळीचे उत्पादन वाढल्यानंतर सरकारने सुरू केलेली खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांकडे असलेली तूर लक्षात घेता खरेदीची मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी समोर आली आहे. लिलावाद्वारे तूर विक्री सुरू केल्याने शेतकऱ्यांना क्विंटलमागे सुमारे हजार रुपयांचा फटका बसत आहे.
गेल्यावर्षी तुरीला चांगला भाव मिळाला. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात लागवड झाली. निसर्गाने साथ दिल्याने उत्पादनदेखील वाढले. परंतु, बाजारात अपेक्षित भाव मिळाले नाही. तूर उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबवणे व योग्य भाव मिळावा, यासाठी सरकारने तूर खरेदीचा निर्णय घेतला. बाजारात ४००० ते ४२०० रुपये क्विंटल भाव असल्याने सरकारने ५०५० रुपये क्विंटल भावाने तूर खरेदी सुरू केली. नाफेडने विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून ही खरेदी केली. परंतु, गोदामांची अडचण, तूर साठवण्यासाठी गोण्यांची कमरता आणि अन्य कारणांमुळे सरकारसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या परिसरात तूर खरेदी करताना अनेक अडचणी आल्या. बाजारात नेलेली तूर शेतकऱ्यांना उघड्यावर ठेवावी लागली.
तूर खरेदीसाठी सुरुवातीला सरकारने मोजकी केंद्रे सुरू केली. केंद्राची संख्या कमी असल्याने त्यासाठीही मागणी झाली. माजी मंत्री अनिल देशमुख यांनी नरखेड परिसरासाठी आक्रमक भूमिका घेतल्याने केंद्र सुरू करण्यात आले. परंतु, ते केंद्र काही दिवसच सुरू होते. महिनाभरापूर्वी खरेदीची मुदत संपल्यानंतरही शेतकऱ्यांनी माल बाहेर काढला नाही. तूर खरेदी परत सुरू होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी घरीच माल ठेवला. परंतु, अद्याप सरकारकडून तसे संकेत मिळालेले नाही. खरीप हंगाम, लग्न व इतर कार्य, शिक्षण आदींमुळे पैशाची गरज असलेल्या शेतकऱ्यांनी आता चार रुपये क्विंटलप्रमाणे बाजारात लिलावासाठी तूर आणली आहे. लिलावामुळे शेतकऱ्यांना ८०० ते हजार रुपये क्विंटलमागे फटका बसत आहे. सरकारने तातडीने तूर खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
‘खरेदी पुन्हा करा सुरू’
काटोलचे केंद्र १० मार्चपासून बंद करण्याचे पत्र विदर्भ मार्केटिंगने दिले. तेव्हाच केंद्र बंद करण्यात आले. गेल्या आठवड्यात नाफेडने १५ एप्रिलपासून खरेदी बंद करण्याची सूचना केली. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तूर असल्याने सरकारने यावर पुनर्विचार करून खरेदी परत सुरू करावी, अशी मागणी काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तारकेश्वर शेळके यांनी केली.