म. टा. प्रतिनिधी, नागपूर
वीजग्राहक आणि वीज कर्मचाऱ्यांमध्ये विद्युत सुरक्षेप्रती जागरूकता निर्माण व्हावी, ग्राहकांना अपघातविरहित वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे ११ ते १७ जानेवारीला महावितरणच्या नागपूर परिमंडळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
आर्वी विभागातील आर्वी शहर आणि कारंजा उपविभागातील येनगाव येथील शालेय विद्यार्थ्यांनी वीजसुरक्षेचा संदेश देणारी रॅली काढली. रामटेक उपविभागातील नगरधन आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी उपकार्यकारी अभियंता पराग फाटे यांच्या नेतृत्वात विद्युत सुरक्षेबाबत रॅली काढून जनजागृती केली. कुही उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता भूपेंद्र रंध्ये यांनी सर्वोदय विद्यालय कुही येथे विद्यार्थ्यांना तर भिवापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दामोदर उरकुडे यांनी भिवापूर येथे वीज कर्मचारी आणि ग्राहकांना वीज सुरक्षेविषयीचे मार्गदर्शन केले.
खापा उपविभागातील खुबाळा येथील अभ्युदय ग्लोब स्कूल आणि खापा येथील जवाहर माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांना उपकार्यकारी अभियंता दिलीप भालेराव यांनी मार्गदर्शन केले. वर्धा आणि आर्वी शहरातही विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. कळमेश्वर येथील प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
सप्ताहानिमित्त खापरखेडा उपविभागातर्फे स्थानिक शंकरराव चव्हाण विद्यालयातील विद्यार्थ्यांची सुरक्षा जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीला विद्यालयाचे मुख्याध्यापक डोंगरे यांच्यासह शिक्षकवृंद आणि खापरखेडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. रॅलीनंतर कार्यकारी अभियंता सुहास मेत्रे, सहाय्यक विद्युत निरीक्षक विपिन यादव आणि उपकार्यकारी अभियंता हेमेंद्र गौर यांनी विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. या वेळी सचिन धनविजय, आशिष चेटुले, सुमेध जंगम, तुषार कोंडावार, स्वाती पाटील, मोनाली तारसाटे या अभियंत्यांसह जालंधर, लोधी, केळकर, मुसळे, वाघमारे व रंगारी आदी कर्मचारी उपस्थित होते.
वीजग्राहक आणि वीज कर्मचाऱ्यांमध्ये विद्युत सुरक्षेप्रती जागरूकता निर्माण व्हावी, ग्राहकांना अपघातविरहित वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे ११ ते १७ जानेवारीला महावितरणच्या नागपूर परिमंडळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
आर्वी विभागातील आर्वी शहर आणि कारंजा उपविभागातील येनगाव येथील शालेय विद्यार्थ्यांनी वीजसुरक्षेचा संदेश देणारी रॅली काढली. रामटेक उपविभागातील नगरधन आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी उपकार्यकारी अभियंता पराग फाटे यांच्या नेतृत्वात विद्युत सुरक्षेबाबत रॅली काढून जनजागृती केली. कुही उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता भूपेंद्र रंध्ये यांनी सर्वोदय विद्यालय कुही येथे विद्यार्थ्यांना तर भिवापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दामोदर उरकुडे यांनी भिवापूर येथे वीज कर्मचारी आणि ग्राहकांना वीज सुरक्षेविषयीचे मार्गदर्शन केले.
खापा उपविभागातील खुबाळा येथील अभ्युदय ग्लोब स्कूल आणि खापा येथील जवाहर माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांना उपकार्यकारी अभियंता दिलीप भालेराव यांनी मार्गदर्शन केले. वर्धा आणि आर्वी शहरातही विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. कळमेश्वर येथील प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
सप्ताहानिमित्त खापरखेडा उपविभागातर्फे स्थानिक शंकरराव चव्हाण विद्यालयातील विद्यार्थ्यांची सुरक्षा जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीला विद्यालयाचे मुख्याध्यापक डोंगरे यांच्यासह शिक्षकवृंद आणि खापरखेडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. रॅलीनंतर कार्यकारी अभियंता सुहास मेत्रे, सहाय्यक विद्युत निरीक्षक विपिन यादव आणि उपकार्यकारी अभियंता हेमेंद्र गौर यांनी विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. या वेळी सचिन धनविजय, आशिष चेटुले, सुमेध जंगम, तुषार कोंडावार, स्वाती पाटील, मोनाली तारसाटे या अभियंत्यांसह जालंधर, लोधी, केळकर, मुसळे, वाघमारे व रंगारी आदी कर्मचारी उपस्थित होते.