म. टा. प्रतिनिधी, नागपूर
मेट्रो रेल्वे ही नागपूरकरांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी हा प्रकल्प साकारताना घेतली जात आहे. उज्ज्वलनगरमधील नागरिकांच्या मागणीचा सन्मान करत महामेट्रोने मनीषनगर ‘आरओबी’च्या डिझाइनमध्येच बदल करत १४ घरे वाचविण्याचा निर्णय घेतला असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.
मनीषनगर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. काही पिलरही तयार झाले आहे. मनीषनगर ‘सब वे’ आणि रेल्वे क्रॉसिंग ‘सब वे’ असे दोन ‘सब वे’ बनविण्याचे नियोजन होते. या दोन्ही सब वे मुळे नागरिकांना प्रवास करणे अधिक सोयीचे झाले असते असा दावा महामेट्रोकडून करण्यात येत होता. मात्र मनीषनगर सब वेमध्ये उज्ज्वलनगरातील दोन रांगेत असणारी १४ घरे घरे जाणार होती. पहिल्या रांगेत ६ घरे आणि एक खाली प्लॉट आहे. दुसऱ्या रांगेत ७ घरे आहेत. दुसऱ्या रांगेतील घरे तात्पुरती हटवून वाचविण्याचा पर्याय महामेट्रोकडून देण्यात आला होता. मात्र उज्ज्वलनगरमधील नागरिकांनी आम्हाला घरे द्यायचेच नाही, अशी भूमिका घेत महामेट्रोचा प्रस्ताव फेटाळला होता. महामेट्रोने आता डिझाइनच बदलविण्याचा निर्णय घेतल्याने ही १४ घरे वाचणार आहे.
नागरिकांना घ्यावा लागेल फेरा
सब वेमुळे नागरिकांना पुलावरून प्रवास करताना अधिक सोईचे झाले असते. आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनाही मोठे वळण न घेता सहज पुलावर जाता आले असते आणि पुलावरून खाली उतरता आले असते. मात्र आता हा सब वेच रद्द झाल्याने नागरिकांना मोठे वळण घ्यावे लागणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले. मनीषनगरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर सब वेसाठी रोटरी (गोलाकार रस्ता) तयार करावा लागतो. या रोटरीचा व्यास रस्त्याच्या रुंदीपेक्षा थोडा मोठा असावा लागतो. त्यामुळे उज्ज्वलनगरातील घरे जाणार होती. आता डिझाइनमध्येच बदल करण्यात येत असल्याने या १४ घरांना धक्कापण लागणार नसल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
मनीषनगरचा प्रश्न सुटेल
मनीषनगर रेल्वे गेटजवळ एक सबवे तयार करण्याचे नियोजन आहे. हा सब वे आता पूर्वीपेक्षा मोठा करण्याचेही प्रयत्न सुरू आहे. दोन सब वेऐवजी आता एकच सब वे मनीषनगर नागरिकांच्या वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या कामाचे डिझाइन तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
मेट्रो रेल्वे ही नागपूरकरांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी हा प्रकल्प साकारताना घेतली जात आहे. उज्ज्वलनगरमधील नागरिकांच्या मागणीचा सन्मान करत महामेट्रोने मनीषनगर ‘आरओबी’च्या डिझाइनमध्येच बदल करत १४ घरे वाचविण्याचा निर्णय घेतला असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.
मनीषनगर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. काही पिलरही तयार झाले आहे. मनीषनगर ‘सब वे’ आणि रेल्वे क्रॉसिंग ‘सब वे’ असे दोन ‘सब वे’ बनविण्याचे नियोजन होते. या दोन्ही सब वे मुळे नागरिकांना प्रवास करणे अधिक सोयीचे झाले असते असा दावा महामेट्रोकडून करण्यात येत होता. मात्र मनीषनगर सब वेमध्ये उज्ज्वलनगरातील दोन रांगेत असणारी १४ घरे घरे जाणार होती. पहिल्या रांगेत ६ घरे आणि एक खाली प्लॉट आहे. दुसऱ्या रांगेत ७ घरे आहेत. दुसऱ्या रांगेतील घरे तात्पुरती हटवून वाचविण्याचा पर्याय महामेट्रोकडून देण्यात आला होता. मात्र उज्ज्वलनगरमधील नागरिकांनी आम्हाला घरे द्यायचेच नाही, अशी भूमिका घेत महामेट्रोचा प्रस्ताव फेटाळला होता. महामेट्रोने आता डिझाइनच बदलविण्याचा निर्णय घेतल्याने ही १४ घरे वाचणार आहे.
नागरिकांना घ्यावा लागेल फेरा
सब वेमुळे नागरिकांना पुलावरून प्रवास करताना अधिक सोईचे झाले असते. आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनाही मोठे वळण न घेता सहज पुलावर जाता आले असते आणि पुलावरून खाली उतरता आले असते. मात्र आता हा सब वेच रद्द झाल्याने नागरिकांना मोठे वळण घ्यावे लागणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले. मनीषनगरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर सब वेसाठी रोटरी (गोलाकार रस्ता) तयार करावा लागतो. या रोटरीचा व्यास रस्त्याच्या रुंदीपेक्षा थोडा मोठा असावा लागतो. त्यामुळे उज्ज्वलनगरातील घरे जाणार होती. आता डिझाइनमध्येच बदल करण्यात येत असल्याने या १४ घरांना धक्कापण लागणार नसल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
मनीषनगरचा प्रश्न सुटेल
मनीषनगर रेल्वे गेटजवळ एक सबवे तयार करण्याचे नियोजन आहे. हा सब वे आता पूर्वीपेक्षा मोठा करण्याचेही प्रयत्न सुरू आहे. दोन सब वेऐवजी आता एकच सब वे मनीषनगर नागरिकांच्या वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या कामाचे डिझाइन तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.