म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुरू केलेली विकासकामे आणि अकरा वर्षांपासून बांधण्यात आलेल्या संघटनेतून मतदारांनी घवघवीत यश पदरात टाकल्याचा दावा भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केला.
खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, मावळते महापौर प्रवीण दटके, पक्षाचे सर्व आमदार, प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कोहळे यांनी भरगच्च पत्रपरिषद घेऊन नागपूरकरांचे आभार मानले. दोन-अडीच वर्षापूर्वी राज्य व केंद्रात आमची सत्ता नव्हती. एलबीटी व इतर कारणांमुळे निधी अभावी आम्हाला विकास करता आला नाही. सत्ता येताच गडकरी व फडणवीस विकासावर भर दिला. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था आणल्या. दुसरीकडे २००६ मध्ये संघटन बांधणीवर लक्ष केंद्रित केले. गेल्या काही महिन्यांत सात हजार कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले. त्यातही निवडणूक व बुथ प्रक्रियेची माहिती देण्यात आली. या नेटवर्कचादेखील लाभ झाला, असेही कोहळे यांनी स्पष्ट केले.
एकाही गुन्हेगाराला उमेदवारी दिली नाही. कोर्टातून एकावरही गुन्हा सिद्ध झालेला नाही. राजकीय आंदोलनातील गुन्हे असू शकतात, असा दावाही त्यांनी केला.
खुल्या प्रवर्गात इतर समाजाला उमेदवारी दिल्याची नाराजी झाल्याचा इन्कार करून कोहळे म्हणाले की, खुला प्रवर्ग म्हणजे ब्राह्मण किंवा क्षत्रिय असा होत नाही. त्यात पात्र असलेला कोणत्याही समाजातील प्रतिनिधी निवडणूक लढू शकतो. त्या आधारे पक्षाने चर्चा करून उमेदवार निश्चित केल्याने इतिहास घडला.
बंडू राऊत, रमेश सिंगारे यांच्या पराभव का व कसा झाला, कुठे कमी पडलो याचे चिंतन करू. बंडखोरांना आता पक्षात कुठेही स्थान नाही, असेही त्यांनी सांगितले.
महापौरपदाच्या उमेदवाराबाबत विचारले असता, या पदासाठी राजकीय पात्रतेऐवजी ‘नॉलेजेबल’ असणे अधिक महत्त्वाचे आहे, असे सांगून सुधाकर कोहळे यांनी उमेदवाराबाबत अधिक बोलण्याचे टाळले. यावेळी निवडणूक प्रमुख प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, नागो गाणार, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, राजेश बागडी, संदीप जाधव, चंदन गोस्वामी, देवेन दस्तुरे आदी उपस्थित होते.
पारदर्शकतेवर विश्वास
नागपूरसह राज्यातील जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक कारभारावर विश्वास दर्शविला. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या इतिहासात हा अभूतपूर्व विजय मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार व काळ्या पैशांविरोधात सुरू केलेल्या लढ्याला लाभलेल्या जनसमर्थनाचा विजय असल्याची प्रतिक्रिया खासदार अजय संचेती यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुरू केलेली विकासकामे आणि अकरा वर्षांपासून बांधण्यात आलेल्या संघटनेतून मतदारांनी घवघवीत यश पदरात टाकल्याचा दावा भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केला.
खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, मावळते महापौर प्रवीण दटके, पक्षाचे सर्व आमदार, प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कोहळे यांनी भरगच्च पत्रपरिषद घेऊन नागपूरकरांचे आभार मानले. दोन-अडीच वर्षापूर्वी राज्य व केंद्रात आमची सत्ता नव्हती. एलबीटी व इतर कारणांमुळे निधी अभावी आम्हाला विकास करता आला नाही. सत्ता येताच गडकरी व फडणवीस विकासावर भर दिला. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था आणल्या. दुसरीकडे २००६ मध्ये संघटन बांधणीवर लक्ष केंद्रित केले. गेल्या काही महिन्यांत सात हजार कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले. त्यातही निवडणूक व बुथ प्रक्रियेची माहिती देण्यात आली. या नेटवर्कचादेखील लाभ झाला, असेही कोहळे यांनी स्पष्ट केले.
एकाही गुन्हेगाराला उमेदवारी दिली नाही. कोर्टातून एकावरही गुन्हा सिद्ध झालेला नाही. राजकीय आंदोलनातील गुन्हे असू शकतात, असा दावाही त्यांनी केला.
खुल्या प्रवर्गात इतर समाजाला उमेदवारी दिल्याची नाराजी झाल्याचा इन्कार करून कोहळे म्हणाले की, खुला प्रवर्ग म्हणजे ब्राह्मण किंवा क्षत्रिय असा होत नाही. त्यात पात्र असलेला कोणत्याही समाजातील प्रतिनिधी निवडणूक लढू शकतो. त्या आधारे पक्षाने चर्चा करून उमेदवार निश्चित केल्याने इतिहास घडला.
बंडू राऊत, रमेश सिंगारे यांच्या पराभव का व कसा झाला, कुठे कमी पडलो याचे चिंतन करू. बंडखोरांना आता पक्षात कुठेही स्थान नाही, असेही त्यांनी सांगितले.
महापौरपदाच्या उमेदवाराबाबत विचारले असता, या पदासाठी राजकीय पात्रतेऐवजी ‘नॉलेजेबल’ असणे अधिक महत्त्वाचे आहे, असे सांगून सुधाकर कोहळे यांनी उमेदवाराबाबत अधिक बोलण्याचे टाळले. यावेळी निवडणूक प्रमुख प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, नागो गाणार, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, राजेश बागडी, संदीप जाधव, चंदन गोस्वामी, देवेन दस्तुरे आदी उपस्थित होते.
पारदर्शकतेवर विश्वास
नागपूरसह राज्यातील जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक कारभारावर विश्वास दर्शविला. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या इतिहासात हा अभूतपूर्व विजय मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार व काळ्या पैशांविरोधात सुरू केलेल्या लढ्याला लाभलेल्या जनसमर्थनाचा विजय असल्याची प्रतिक्रिया खासदार अजय संचेती यांनी व्यक्त केली.