म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
आघाडीच्या काळात सुपर मुख्यमंत्र्यांप्रमाणे बॅटिंग केल्यानंतर धरणातील पाण्याचे प्रकरण अंगलट आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचे वेध पक्षाच्या कार्यकर्त्यांना लागले आहेत. राष्ट्रवादीने कार्यकर्ता मेळावा व पदाधिकाऱ्यांच्या बैठकांच्या माध्यमातून पक्षाची नव्याने बांधणी करण्यासोबतच आगामी निवडणुकीसाठी टीम सज्ज करण्यासाठी पावले उचलली आहेत. पक्षाचे किमान शंभर जागांचे टार्गेट ठेवले. त्या दिशेने वाटलाच सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पवार आणि महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांचे नागपूर, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर उद्या, शुक्रवारी आगमन होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या लोकसभा व या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी अशाच प्रकारचे विभागीय मेळावे आयोजित केले होते. यावेळी मात्र बराच आधी मेळावे होत आहेत. राष्ट्रवादीचे बडे नेते तसेच, विविध सेल प्रदेशाध्यक्ष राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या शृंखलेत नागपूर, विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी यापूर्वीच्या सभांमध्ये केले. राष्ट्रवादीलाही सत्ता बदल होईल, अशी आशा आहे. त्यातून संघटनेकडे नव्याने लक्ष देण्यात आहे.
राष्ट्रवादीला विदर्भात अद्यापही जम बसवता आलेला नाही. नागपूरसह सर्वत्र नेत्यांचीच संख्या अधिक आहे. विदर्भाने शरद पवार यांना कधीही साथ दिली नाही, अशी खंत अजित पवार यांनी यापूर्वीच व्यक्त केली. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील विदर्भाकडे पाहिजे तसे लक्ष दिले नाही. सत्तेत असताना नेत्यांनी विदर्भावर फोकस केला नाही किंवा नियमित दौरेही काढले नाही. विदर्भात विशेषतः यवतमाळमध्ये विषबाधेने शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. अद्याप राष्ट्रवादीच्या एकाही बड्या नेत्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली नाही. विदर्भात पक्षाचे फक्त दोन आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत फक्त मनोहर नाईक निवडून आले. यापूर्वी राष्ट्रवादीच्या ११ जागांवरून चार आल्या होत्या. गेल्यावेळी एकच आल्याने येणाऱ्या दीड वर्षात विदर्भावर फोकस करण्याचे पक्षाचे प्रयत्न राहणार असल्याचे सूत्रांनी केली.
शहर अध्यक्ष अध्यक्ष अनिल देशमुख व जिल्हाध्यक्ष रमेश बंग यांनी आढावा बैठकीची जोरदार तयारी केली आहे. पवार व तटकरे यांनी शहर व ग्रामीण राष्ट्रवादीला ३-३ तास वेळ दिला आहे. गणेशपेठेतील पक्ष कार्यालयात शहर व ग्रामीणमधील संघटनात्मक रचनेचा आढावा घेणार आहेत.
आघाडीच्या काळात सुपर मुख्यमंत्र्यांप्रमाणे बॅटिंग केल्यानंतर धरणातील पाण्याचे प्रकरण अंगलट आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचे वेध पक्षाच्या कार्यकर्त्यांना लागले आहेत. राष्ट्रवादीने कार्यकर्ता मेळावा व पदाधिकाऱ्यांच्या बैठकांच्या माध्यमातून पक्षाची नव्याने बांधणी करण्यासोबतच आगामी निवडणुकीसाठी टीम सज्ज करण्यासाठी पावले उचलली आहेत. पक्षाचे किमान शंभर जागांचे टार्गेट ठेवले. त्या दिशेने वाटलाच सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पवार आणि महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांचे नागपूर, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर उद्या, शुक्रवारी आगमन होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या लोकसभा व या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी अशाच प्रकारचे विभागीय मेळावे आयोजित केले होते. यावेळी मात्र बराच आधी मेळावे होत आहेत. राष्ट्रवादीचे बडे नेते तसेच, विविध सेल प्रदेशाध्यक्ष राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या शृंखलेत नागपूर, विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी यापूर्वीच्या सभांमध्ये केले. राष्ट्रवादीलाही सत्ता बदल होईल, अशी आशा आहे. त्यातून संघटनेकडे नव्याने लक्ष देण्यात आहे.
राष्ट्रवादीला विदर्भात अद्यापही जम बसवता आलेला नाही. नागपूरसह सर्वत्र नेत्यांचीच संख्या अधिक आहे. विदर्भाने शरद पवार यांना कधीही साथ दिली नाही, अशी खंत अजित पवार यांनी यापूर्वीच व्यक्त केली. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील विदर्भाकडे पाहिजे तसे लक्ष दिले नाही. सत्तेत असताना नेत्यांनी विदर्भावर फोकस केला नाही किंवा नियमित दौरेही काढले नाही. विदर्भात विशेषतः यवतमाळमध्ये विषबाधेने शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. अद्याप राष्ट्रवादीच्या एकाही बड्या नेत्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली नाही. विदर्भात पक्षाचे फक्त दोन आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत फक्त मनोहर नाईक निवडून आले. यापूर्वी राष्ट्रवादीच्या ११ जागांवरून चार आल्या होत्या. गेल्यावेळी एकच आल्याने येणाऱ्या दीड वर्षात विदर्भावर फोकस करण्याचे पक्षाचे प्रयत्न राहणार असल्याचे सूत्रांनी केली.
शहर अध्यक्ष अध्यक्ष अनिल देशमुख व जिल्हाध्यक्ष रमेश बंग यांनी आढावा बैठकीची जोरदार तयारी केली आहे. पवार व तटकरे यांनी शहर व ग्रामीण राष्ट्रवादीला ३-३ तास वेळ दिला आहे. गणेशपेठेतील पक्ष कार्यालयात शहर व ग्रामीणमधील संघटनात्मक रचनेचा आढावा घेणार आहेत.