स्त्री-पुरुष विषमतेचे विष लहानपणापासूनच मनात पेरले जाते. मग ते तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वाचा केव्हा ताबा घेते हे तुम्हाला कळतही नाही. काय आम्ही गप्पा मारतो की स्त्रिया सर्वच क्षेत्रात प्रगती करताहेत म्हणून? किती स्त्रियांविषयी तुम्ही बोलता? अगदी मूठभर.
अलीकडे एक भयानक बातमी वाचनात आली. सज्ञान मनीषाने वडिलांच्या मर्जीविरुद्ध परजातीच्या मुलाशी विवाह केला म्हणून तिच्या वडिलांनी काय करावे? तर कुऱ्हाडीने मुलीचा खून केला. वाचतानाही अंगावर काटा येतो नं? त्या मुलीचा जीव किती कळवळला असेल? कल्पनाही करवत नाही. बापाने असे का करावे? घराण्याची प्रतिष्ठा? की आपले ऐकले नाही ह्याचा राग? की ‘पुरुषी अहंकार’ दुखावला म्हणून? ‘सन्मान हत्या’ केवळ निम्न आर्थिक स्तरावरील समाजातच होतात असे नाही. उच्चवर्णीय, अतिउच्च समाजही त्याला अपवाद नाहीत. (आरुषी तलवारची हत्या आठवा)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची १२६वी जयंती साजरी झाली. त्यांनी एका विद्यार्थी सेमिनारसाठी लिहिलेल्या ‘कास्टस् इन इंडिया : देयर मेकॅनिझम, जेनसिस अॅण्ड डेव्हलपमेंट’ ह्या शोधनिबंधाला शंभर वर्षे पूर्ण झालीत. ह्या निबंधात बाबासाहेबांनी जातिनिर्मूलनासाठी दहा कलमी कार्यक्रमच दिला आहे. ‘आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन, पाठिंबा आणि संरक्षण देणे’ हे त्यातील एक कलम होते. एका गोष्टीचे सखेद आश्चर्य वाटते की शंभर वर्षांपूर्वी ‘जात’ ह्या वास्तवाची चर्चा बाबासाहेबांनी केली आणि आजही एकविसाव्या शतकात आपण तेच करतोय. शंभर वर्षांत जातिनिर्मूलनाच्या संदर्भात एकही पाऊल आम्ही प्रगतीच्या दिशेने उचलले नाही का? नाही म्हणायला काही आंतरजातीय विवाह सफलपणे झाले, होताहेत. परंतु हे प्रमाण नगण्य आहे. अंतर्यामी आम्ही आजही जातीयवादीच आहोत.
या ठिकाणी मला कवी लोकनाथ यशवंत ह्यांच्या ‘जिवाचा आटापिटा’ या कवितेची आठवण येते. कवीची जात जाणून घेण्याचा ‘तो’ (सर्वसामान्य समाजाचे प्रतिनिधित्व करणारा ‘तो’) किती तऱ्हेने प्रयत्न करतो याचे वर्णन कवितेत आहे. वस्ती विचारली, पत्नीचे गणगोत, मुलांची नावे, आदरणीय थोर व्यक्तींचा मुद्दा काढला, धर्माविषयी विचारले, चातुर्वर्णात कोठे बसतो का ते पाहिले. कोणत्याच मार्गाने ‘जाती’विषयी निर्णयाप्रत येता येत नाही म्हणून ‘नोकरी कोणत्या कोट्यात मिळाली?’ विचारतो. कवी सांगतो, ‘कलावंताच्या’. कवीची जात जाणून घेण्याचे त्याचे सर्व प्रयत्न विफल होतात. या ‘आट्यापिट्या’वर कवी म्हणतो, ‘काही किडे घाणीत जगतात, तिथेच सरपटतात आणि तिथेच मरतात’. खरे आहे.
दुसरी गोष्ट ध्यानात घेतली असेल की हत्या ‘बाप’ करतो. म्हणजे ‘पुरुष’! ‘पुरुषी अहंकार’ हा घटक इतका जबरदस्त आहे की त्यामुळे व्यक्ती सारासार विवेक गमावून बसते. आजही पुरुष श्रेष्ठ व स्त्री कनिष्ठ ही भावना समाजाच्या मनात खोलवर रुजलेली आहे. ‘मुलगी असून माझे ऐकत नाही म्हणजे काय?’ येथे एक निरीक्षण नोंदवून ठेवते. सन्मान हत्या- मुलीची वा मुलाची- कोणाचीच होऊ नये. परंतु घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी मुलांचा खून झाल्याचे वाचनात नाही आले.
समाज व्यवस्थादेखील तेवढीच जबाबदार आहे. स्त्री-पुरुष विषमतेचे विष लहानपणापासूनच मनात पेरले जाते. मग ते तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वाचा केव्हा ताबा घेते हे तुम्हाला कळतही नाही. काय आम्ही गप्पा मारतो की स्त्रिया सर्वच क्षेत्रात प्रगती करताहेत म्हणून? किती स्त्रियांविषयी तुम्ही बोलता? अगदी मूठभर. सर्वसाधारण स्त्री आजही कोठे आहे? स्वतःचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य नसणारी ‘स्त्री’, स्त्री गर्भ असेल तर तेथेच अस्तित्व संपविणारी व्यवस्था ही सर्व ‘प्रगती’ची, ‘विकासा’ची चिन्हे मानायची का?
आता बस झाले. काहीतरी ठोस उपाय योजण्याची वेळ आली आहे. व्यवस्था परिवर्तनासाठी शिक्षण, प्रबोधन, कायदा आणि राजकीय इच्छाशक्ती ह्या गोष्टी निश्चितच आवश्यक आहेत. परंतु सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. ती बदलत नाही तोवर ही व्यवस्था आणखी किती ‘मनीषां’चा खून पाडणार, हा प्रश्न मला पोटतिडकीने विचारावासा वाटतो.
अलीकडे एक भयानक बातमी वाचनात आली. सज्ञान मनीषाने वडिलांच्या मर्जीविरुद्ध परजातीच्या मुलाशी विवाह केला म्हणून तिच्या वडिलांनी काय करावे? तर कुऱ्हाडीने मुलीचा खून केला. वाचतानाही अंगावर काटा येतो नं? त्या मुलीचा जीव किती कळवळला असेल? कल्पनाही करवत नाही. बापाने असे का करावे? घराण्याची प्रतिष्ठा? की आपले ऐकले नाही ह्याचा राग? की ‘पुरुषी अहंकार’ दुखावला म्हणून? ‘सन्मान हत्या’ केवळ निम्न आर्थिक स्तरावरील समाजातच होतात असे नाही. उच्चवर्णीय, अतिउच्च समाजही त्याला अपवाद नाहीत. (आरुषी तलवारची हत्या आठवा)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची १२६वी जयंती साजरी झाली. त्यांनी एका विद्यार्थी सेमिनारसाठी लिहिलेल्या ‘कास्टस् इन इंडिया : देयर मेकॅनिझम, जेनसिस अॅण्ड डेव्हलपमेंट’ ह्या शोधनिबंधाला शंभर वर्षे पूर्ण झालीत. ह्या निबंधात बाबासाहेबांनी जातिनिर्मूलनासाठी दहा कलमी कार्यक्रमच दिला आहे. ‘आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन, पाठिंबा आणि संरक्षण देणे’ हे त्यातील एक कलम होते. एका गोष्टीचे सखेद आश्चर्य वाटते की शंभर वर्षांपूर्वी ‘जात’ ह्या वास्तवाची चर्चा बाबासाहेबांनी केली आणि आजही एकविसाव्या शतकात आपण तेच करतोय. शंभर वर्षांत जातिनिर्मूलनाच्या संदर्भात एकही पाऊल आम्ही प्रगतीच्या दिशेने उचलले नाही का? नाही म्हणायला काही आंतरजातीय विवाह सफलपणे झाले, होताहेत. परंतु हे प्रमाण नगण्य आहे. अंतर्यामी आम्ही आजही जातीयवादीच आहोत.
या ठिकाणी मला कवी लोकनाथ यशवंत ह्यांच्या ‘जिवाचा आटापिटा’ या कवितेची आठवण येते. कवीची जात जाणून घेण्याचा ‘तो’ (सर्वसामान्य समाजाचे प्रतिनिधित्व करणारा ‘तो’) किती तऱ्हेने प्रयत्न करतो याचे वर्णन कवितेत आहे. वस्ती विचारली, पत्नीचे गणगोत, मुलांची नावे, आदरणीय थोर व्यक्तींचा मुद्दा काढला, धर्माविषयी विचारले, चातुर्वर्णात कोठे बसतो का ते पाहिले. कोणत्याच मार्गाने ‘जाती’विषयी निर्णयाप्रत येता येत नाही म्हणून ‘नोकरी कोणत्या कोट्यात मिळाली?’ विचारतो. कवी सांगतो, ‘कलावंताच्या’. कवीची जात जाणून घेण्याचे त्याचे सर्व प्रयत्न विफल होतात. या ‘आट्यापिट्या’वर कवी म्हणतो, ‘काही किडे घाणीत जगतात, तिथेच सरपटतात आणि तिथेच मरतात’. खरे आहे.
दुसरी गोष्ट ध्यानात घेतली असेल की हत्या ‘बाप’ करतो. म्हणजे ‘पुरुष’! ‘पुरुषी अहंकार’ हा घटक इतका जबरदस्त आहे की त्यामुळे व्यक्ती सारासार विवेक गमावून बसते. आजही पुरुष श्रेष्ठ व स्त्री कनिष्ठ ही भावना समाजाच्या मनात खोलवर रुजलेली आहे. ‘मुलगी असून माझे ऐकत नाही म्हणजे काय?’ येथे एक निरीक्षण नोंदवून ठेवते. सन्मान हत्या- मुलीची वा मुलाची- कोणाचीच होऊ नये. परंतु घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी मुलांचा खून झाल्याचे वाचनात नाही आले.
समाज व्यवस्थादेखील तेवढीच जबाबदार आहे. स्त्री-पुरुष विषमतेचे विष लहानपणापासूनच मनात पेरले जाते. मग ते तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वाचा केव्हा ताबा घेते हे तुम्हाला कळतही नाही. काय आम्ही गप्पा मारतो की स्त्रिया सर्वच क्षेत्रात प्रगती करताहेत म्हणून? किती स्त्रियांविषयी तुम्ही बोलता? अगदी मूठभर. सर्वसाधारण स्त्री आजही कोठे आहे? स्वतःचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य नसणारी ‘स्त्री’, स्त्री गर्भ असेल तर तेथेच अस्तित्व संपविणारी व्यवस्था ही सर्व ‘प्रगती’ची, ‘विकासा’ची चिन्हे मानायची का?
आता बस झाले. काहीतरी ठोस उपाय योजण्याची वेळ आली आहे. व्यवस्था परिवर्तनासाठी शिक्षण, प्रबोधन, कायदा आणि राजकीय इच्छाशक्ती ह्या गोष्टी निश्चितच आवश्यक आहेत. परंतु सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. ती बदलत नाही तोवर ही व्यवस्था आणखी किती ‘मनीषां’चा खून पाडणार, हा प्रश्न मला पोटतिडकीने विचारावासा वाटतो.