म. टा. प्रतिनिधी, नागपूर
उपराजधानीतील कर्करोगाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वर्षभरात मेडिकलमध्ये अडीच हजार कॅन्सरग्रस्तांची नोंद झाली. यातील १२९ रुग्णांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक रुग्ण मुखाच्या कर्करोगरुग्ण आहेत.
नागपूर शहर आणि विदर्भात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात होतात. त्यात खर्रा, तंबाखू, मावा, गुटखा आदी पदार्थाचा समावेश आहे. गुटख्यावर येथे बंदी असली तरी मध्य प्रदेशातून छुप्या मार्गाने आयात होते आणि शौकीनांना ती पुरविण्यात येते. गेल्या काही वर्षात मुखाच्या कर्करोगात मोठी वाढ झाली आहे. सार्क देशात मोठ्या प्रमाणात कॅन्सरग्रस्त आहेत. एनतारुण्यात कॅन्सरग्रस्तांचे मृत्यूचे प्रमाण ७० टक्के आहे. मात्र, अवघे दोन हजार कॅन्सरचे युनिट देशात आहेत. यापैकी भारतात ३०० युनिट आहेत. स्तन आणि गर्भाशयाचा कॅन्सर दुसऱ्या स्थानी आहे. चौथा क्रमांक फुफ्फुसाच्या कॅन्सरचा लागतो. दहा टक्के अन्न नलिकेच्या कॅन्सरग्रस्तांचे आहे. रक्ताच्या कॅन्सरसह उर्वरित कॅन्सरचे १ ते ६ टक्के रुग्ण आढळतात. मात्र, तरीदेखील उपराजधानीत मंजूर झालेले कॅन्सर इन्स्टिट्यूट दूरच आहे. माहिती अधिकारातून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांमधून ही माहिती उजेडात आली आहे. कर्करोगरुग्ण वाढत असताना त्या तुलनेत डॉक्टरांची संख्या नाही. संशोधनाचा अभाव आहे. रुग्णाला अत्याधुनिक उपचार मिळत नाही. त्यामुळे रुग्ण दगावण्याची संख्या वाढलेली आहे. कॅन्सरचे निदान लवकर व्हावे, यासाठी राज्यातील आरोग्य अधिकारी, तंत्रज्ञ, परिचारिका यांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सरकारने हाती घ्यावा. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅन्सरचे निदान करणारे केंद्र तयार झाल्यास निदान लवकर होईल. परंतु, नागपूरचे कॅन्सर इन्स्टिट्यूट अद्याप कागदावरच आहे, अशी खंत ज्येष्ठ ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. कृष्णा कांबळे यांनी व्यक्त केली.
मेडिकलमध्ये दरवर्षी सात लाख रुग्ण
मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात विविध उपचारासाठी गेल्या वर्षात सात लाख अठरा हजार २११ रुग्णांवर उपचार झाले. यापैकी ८३ हजार ३४० रुग्ण भरती झाले. तर वर्षभरात सहा हजार मृत्यू मेडिकलमध्ये झाले.
उपराजधानीतील कर्करोगाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वर्षभरात मेडिकलमध्ये अडीच हजार कॅन्सरग्रस्तांची नोंद झाली. यातील १२९ रुग्णांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक रुग्ण मुखाच्या कर्करोगरुग्ण आहेत.
नागपूर शहर आणि विदर्भात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात होतात. त्यात खर्रा, तंबाखू, मावा, गुटखा आदी पदार्थाचा समावेश आहे. गुटख्यावर येथे बंदी असली तरी मध्य प्रदेशातून छुप्या मार्गाने आयात होते आणि शौकीनांना ती पुरविण्यात येते. गेल्या काही वर्षात मुखाच्या कर्करोगात मोठी वाढ झाली आहे. सार्क देशात मोठ्या प्रमाणात कॅन्सरग्रस्त आहेत. एनतारुण्यात कॅन्सरग्रस्तांचे मृत्यूचे प्रमाण ७० टक्के आहे. मात्र, अवघे दोन हजार कॅन्सरचे युनिट देशात आहेत. यापैकी भारतात ३०० युनिट आहेत. स्तन आणि गर्भाशयाचा कॅन्सर दुसऱ्या स्थानी आहे. चौथा क्रमांक फुफ्फुसाच्या कॅन्सरचा लागतो. दहा टक्के अन्न नलिकेच्या कॅन्सरग्रस्तांचे आहे. रक्ताच्या कॅन्सरसह उर्वरित कॅन्सरचे १ ते ६ टक्के रुग्ण आढळतात. मात्र, तरीदेखील उपराजधानीत मंजूर झालेले कॅन्सर इन्स्टिट्यूट दूरच आहे. माहिती अधिकारातून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांमधून ही माहिती उजेडात आली आहे. कर्करोगरुग्ण वाढत असताना त्या तुलनेत डॉक्टरांची संख्या नाही. संशोधनाचा अभाव आहे. रुग्णाला अत्याधुनिक उपचार मिळत नाही. त्यामुळे रुग्ण दगावण्याची संख्या वाढलेली आहे. कॅन्सरचे निदान लवकर व्हावे, यासाठी राज्यातील आरोग्य अधिकारी, तंत्रज्ञ, परिचारिका यांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सरकारने हाती घ्यावा. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅन्सरचे निदान करणारे केंद्र तयार झाल्यास निदान लवकर होईल. परंतु, नागपूरचे कॅन्सर इन्स्टिट्यूट अद्याप कागदावरच आहे, अशी खंत ज्येष्ठ ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. कृष्णा कांबळे यांनी व्यक्त केली.
मेडिकलमध्ये दरवर्षी सात लाख रुग्ण
मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात विविध उपचारासाठी गेल्या वर्षात सात लाख अठरा हजार २११ रुग्णांवर उपचार झाले. यापैकी ८३ हजार ३४० रुग्ण भरती झाले. तर वर्षभरात सहा हजार मृत्यू मेडिकलमध्ये झाले.