म.टा. प्रतिनिधी, नागपूर
बैतुल मार्गावर ट्रक व कारच्या भीषण अपघातात नागपुरातील व्यापाऱ्यासह दोनजण ठार तर एक जखमी झाला. ही घटना बैतुल-मुलताई मार्गावरील पंखागाव येथे मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली. राजू ऊर्फ अविनाश नरसिंहराव निकम (४९, रा.कर्नलबाग) व सुदेश चंद्रकांत डोंगरे (३२, रा. राणी दुर्गावती चौक) अशी मृतांची तर अरुण तिडके असे जखमीचे नाव आहे. राजू हे सामजिक कार्यकर्ते होते.
खरबी भागात राजू यांचे इलेक्ट्रिक साहित्यविक्रीचे दुकान आहे. सुदेश हा त्यांचा चालक होता. बैतुलजवळ कानकवली या भागात कर्करोगाचे आयुर्वेदिक औषध मिळत असल्याचे राजू यांना माहिती होते. त्यांनी अनेकांना हे औषध आणूनही दिले होते. शनिवारी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले. त्यांच्या सासूलाही कर्करोग असल्याने औषध आणण्यासाठी रात्री दहा वाजताच्या सुमारास राजू त्यांचे मित्र अरुण व चालक सुदेश हे कारने बैतुलकडे निघाले. मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास बैतुलच्या आधी पंखागाव भागात विरुद्ध दिशेने गिट्टी घेऊन येणारा ट्रक कारवर आदळला. कार ट्रकच्या आत घुसून चक्काचूर झाली. राजू आणि सुदेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच मुलताई पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. कटरने कारचा पत्रा कापून तिघांना बाहेर काढले. जखमी अरुण यांना उपचारासाठी नागपुरातील सक्करदरा भागातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच राजू यांचे लहान भाऊ उमेश व त्यांचे मित्र अनिल सुद्रिक मुलताई येथे पोहोचले. सुदेश याचे नातेवाइक न पोहोचल्या त्यांचा मृतदेह मेडिकल शवागारात ठेवण्यात आला आहे. राजू यांच्या मागे आई-वडील व भाऊ यांच्यासह पत्नी उज्वला व मुलगी जान्हवी आहे. ती अकरावीत शिकते. राजू यांच्या मृत्यूने त्यांना जबर धक्का बसला असून, परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुदेश यांना तीन वर्षांचा अर्नव नावाचा मुलगा आहे. मुलताई पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
बैतुल मार्गावर ट्रक व कारच्या भीषण अपघातात नागपुरातील व्यापाऱ्यासह दोनजण ठार तर एक जखमी झाला. ही घटना बैतुल-मुलताई मार्गावरील पंखागाव येथे मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली. राजू ऊर्फ अविनाश नरसिंहराव निकम (४९, रा.कर्नलबाग) व सुदेश चंद्रकांत डोंगरे (३२, रा. राणी दुर्गावती चौक) अशी मृतांची तर अरुण तिडके असे जखमीचे नाव आहे. राजू हे सामजिक कार्यकर्ते होते.
खरबी भागात राजू यांचे इलेक्ट्रिक साहित्यविक्रीचे दुकान आहे. सुदेश हा त्यांचा चालक होता. बैतुलजवळ कानकवली या भागात कर्करोगाचे आयुर्वेदिक औषध मिळत असल्याचे राजू यांना माहिती होते. त्यांनी अनेकांना हे औषध आणूनही दिले होते. शनिवारी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले. त्यांच्या सासूलाही कर्करोग असल्याने औषध आणण्यासाठी रात्री दहा वाजताच्या सुमारास राजू त्यांचे मित्र अरुण व चालक सुदेश हे कारने बैतुलकडे निघाले. मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास बैतुलच्या आधी पंखागाव भागात विरुद्ध दिशेने गिट्टी घेऊन येणारा ट्रक कारवर आदळला. कार ट्रकच्या आत घुसून चक्काचूर झाली. राजू आणि सुदेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच मुलताई पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. कटरने कारचा पत्रा कापून तिघांना बाहेर काढले. जखमी अरुण यांना उपचारासाठी नागपुरातील सक्करदरा भागातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच राजू यांचे लहान भाऊ उमेश व त्यांचे मित्र अनिल सुद्रिक मुलताई येथे पोहोचले. सुदेश याचे नातेवाइक न पोहोचल्या त्यांचा मृतदेह मेडिकल शवागारात ठेवण्यात आला आहे. राजू यांच्या मागे आई-वडील व भाऊ यांच्यासह पत्नी उज्वला व मुलगी जान्हवी आहे. ती अकरावीत शिकते. राजू यांच्या मृत्यूने त्यांना जबर धक्का बसला असून, परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुदेश यांना तीन वर्षांचा अर्नव नावाचा मुलगा आहे. मुलताई पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.