नागपूर : महापालिका निवडणुकीत भाजपने वाटलेल्या उमेदवारीवरून संघ आणि भाजपातील संघर्ष तीव्र झाला असतानाच, संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी या वादात उडी घेतली आहे.‘ संघाच्या स्वयंसेवकांना कोणत्याही पक्षातून कार्य करण्याचा आणि निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे. संघाचा स्वयंसेवक फक्त भाजप सोबत बांधील राहावा असा नियम नाही.
त्यामुळे भाजपचे नुकसान होत असेल तर त्यांचे त्यांनी बघून घ्यावे’ असेही ते इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी बोलताना म्हणाले. महापालिका निवडणुकीत संघाने सुचविलेल्या अनेक उमेदवारांच्या नावावर भाजपने फुल्या मारल्या तर संघाने फुल्या मारलेल्यांना उमेदवारी दिली. अनेक खुल्या प्रवर्गातील जागांवर दुसऱ्या प्रवर्गातील उमेदवारांना लढविले त्यामुळे भाजप आणि संघात संघर्ष तीव्र झाला आहे. अनेक स्वयंसेवकांनी बंडखोरी केली असताना मागोंचे हे विधान महत्त्वाचे ठरते आहे.
त्यामुळे भाजपचे नुकसान होत असेल तर त्यांचे त्यांनी बघून घ्यावे’ असेही ते इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी बोलताना म्हणाले. महापालिका निवडणुकीत संघाने सुचविलेल्या अनेक उमेदवारांच्या नावावर भाजपने फुल्या मारल्या तर संघाने फुल्या मारलेल्यांना उमेदवारी दिली. अनेक खुल्या प्रवर्गातील जागांवर दुसऱ्या प्रवर्गातील उमेदवारांना लढविले त्यामुळे भाजप आणि संघात संघर्ष तीव्र झाला आहे. अनेक स्वयंसेवकांनी बंडखोरी केली असताना मागोंचे हे विधान महत्त्वाचे ठरते आहे.