म. टा. प्रतिनिधी, नागपूर
कापणीला आलेल्या गव्हाच्या पिकाला आग लागल्याने पारशिवनी आणि मौदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. चार गावांमध्ये जवळपास तीन किलोमीटरच्या शेतात आग लागल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे १ हजार एकरातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
यात दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. हातात आलेल्या पिकाला आग कोणी लावली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मौदा तालुक्यातील चाचेर, निमखेडा आणि पारशिवनी तालुक्यातील खेडी या गावातील शेतकऱ्यांना आगीचा जबरदस्त फटका बसला आहे. पारशिवनी तालुक्यातील खेडी गावातून सुरू झालेली ही आग काही क्षणातच मौदा तालुक्यातील गावांपर्यंत पोहचली. या गावांमधील हजारो एकरातील गव्हाचे पीक जळून खाक झाले. आठ दिवसांपूर्वीच पीक कापून शेतात ठेवण्यात आले होते. आगीची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाऱ्याच्या वेगाने आगीने पेट घेतला. आग इतकी भीषण होती की, विझविण्याची संधीच शेतकऱ्यांना मिळाली नाही. रामटेक आणि कामठी नगरपरिषदेला सूचना दिल्यानंतर लगेच अग्निशमक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात यश आले. तरीही, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती तलाठी सतीश नागदवने यांना देण्यात आली. नागदवने यांनी शेतात जाऊन पिकांची पाहणी करून अहवाल तयार केला. कृषी विभागाकडे अहवाल पाठविण्यात आला. एकरी ३० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते संजय सत्यकार, उपसरपंच गजानन काळे, डॉ. दिनेश बादोले, प्रमोद बावनकुळे, शिवा साखरवाडे, राजू कोचे, अशोक वासनिक, अरविंद चौधरी, क्रिष्णा रेड्डी यांनी केली.
कापणीला आलेल्या गव्हाच्या पिकाला आग लागल्याने पारशिवनी आणि मौदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. चार गावांमध्ये जवळपास तीन किलोमीटरच्या शेतात आग लागल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे १ हजार एकरातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
यात दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. हातात आलेल्या पिकाला आग कोणी लावली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मौदा तालुक्यातील चाचेर, निमखेडा आणि पारशिवनी तालुक्यातील खेडी या गावातील शेतकऱ्यांना आगीचा जबरदस्त फटका बसला आहे. पारशिवनी तालुक्यातील खेडी गावातून सुरू झालेली ही आग काही क्षणातच मौदा तालुक्यातील गावांपर्यंत पोहचली. या गावांमधील हजारो एकरातील गव्हाचे पीक जळून खाक झाले. आठ दिवसांपूर्वीच पीक कापून शेतात ठेवण्यात आले होते. आगीची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाऱ्याच्या वेगाने आगीने पेट घेतला. आग इतकी भीषण होती की, विझविण्याची संधीच शेतकऱ्यांना मिळाली नाही. रामटेक आणि कामठी नगरपरिषदेला सूचना दिल्यानंतर लगेच अग्निशमक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात यश आले. तरीही, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती तलाठी सतीश नागदवने यांना देण्यात आली. नागदवने यांनी शेतात जाऊन पिकांची पाहणी करून अहवाल तयार केला. कृषी विभागाकडे अहवाल पाठविण्यात आला. एकरी ३० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते संजय सत्यकार, उपसरपंच गजानन काळे, डॉ. दिनेश बादोले, प्रमोद बावनकुळे, शिवा साखरवाडे, राजू कोचे, अशोक वासनिक, अरविंद चौधरी, क्रिष्णा रेड्डी यांनी केली.