म. टा. प्रतिनिधी, नागपूर
हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा संपतानाच शुक्रवारी दारूबंदीसाठी दोन मोर्चे निघाले. श्री मोहिनी कॉम्प्लेक्स परिसरात महिलांनी लोटांगण मोर्चा काढून दारूबंदीची मागणी केली. तर मॉरिस कॉलेज टी पॉइन्टवर पाली विद्यापीठ निर्मितीसाठी शांती मार्च काढण्यात आला. माया चवरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चातील गाडगेबाबांच्या वेशात गावोगावातील शाळांना भेटी देऊन ग्रामस्वच्छता आणि नशामुक्तीचा संदेश देणारे श्रीकृष्ण धरमठोक यांनी लक्ष वेधले. शुक्रवारी विधानभवनावर १२ मोर्चे धडकले.
अस्तित्व संघटना बुलडाणा
मागणी : मातृतीर्थ विदर्भ पंढरी बुलडाणा जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करा, राज्यातील सर्वच तीर्थक्षेत्रात दारूबंदी करावी. अनेक गावात पोलिसांच्या आशीर्वादाने दारू गाळणे सुरू आहे. त्यामुळे दारूबंदी कायद्याची पोलिसांकरवी कडक अंमलबजावणी व्हावी. गावोगावी महिला समित्या स्थापन करून त्यांना दारूविक्री करणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी विशेष अधिकार द्यावे, तालुक्यात व्यसनमुक्ती केंद्रे उघडावी, मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशकाची नियुक्ती करावी,
नेतृत्व : लता वाघ सोनोने, प्रतिभा सरदार, सुजाता भगत, नंदाबाई सरदार, माधुरी वाघ, शालिनी सरदार, वंदना तायडे, शोभा भगत, नीलिमा भगत.
ग्राम संरक्षण दल
मागणी : सरसकट महाराष्ट्रात दारूबंदी करण्यात यावी. अवैध दारु विक्रेत्यांवर अजामिनपात्र गुन्हा दाखल करून एक लाख रुपये दंड आकारण्यात यावा. दारुबंदीचा लढा देणाऱ्या महिलांविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे. महिला बचत गटाचे कर्ज माफ करण्यात यावे.
नेतृत्व : माया चवरे, लीलाधर दाभे, ज्ञानेश्वर रक्षक.
ग्राहक कृती समिती
मागणी : आकर्षक परताव्याच्या आमिषाला बळी पडून विदर्भातील लाखो गुंतवणुकदारांनी एजेंटमार्फत सुमारे 100 कोटींची गुंतवणूक केली. मात्र, अचानक कंपनीने गाशा गुंडाळल्याने एजन्ट अडचणीत आले आहेत. कंपनीच्या जमिनीची विक्री करून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करा, आर्थिक घोटाळ्याची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी, कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांना त्वरित अटक करण्यात यावी.
नेतृत्व : भीमराव उमक, रामेश्वर चव्हाण, दिलीप सेसे.
महाराष्ट्र राज्य समतादुत संघर्ष समिती
मागणी : महापुरुषांच्या कार्याचा प्रचार, प्रसारासह समाज कल्याण विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी समता दुतांवर आहे. बार्टीने समता दुतांच्या नियुक्तीची जबाबदारी अन्य कंपनीला दिली आहे. ही पद्धती बदलवून कर्मचाऱ्यांची थेट बार्टीकडून नियुक्ती करण्यात यावी, समतादूतांना प्रवास भत्ता मिळावा.
नेतृत्व : सचिन फुलझेले, ललिता लिल्हारे, भाग्यश्री उज्जैनकर, अनिता कोलते, धम्मदीप भालेराव, नीलेश चौधरी, संध्या राठोड.
हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा संपतानाच शुक्रवारी दारूबंदीसाठी दोन मोर्चे निघाले. श्री मोहिनी कॉम्प्लेक्स परिसरात महिलांनी लोटांगण मोर्चा काढून दारूबंदीची मागणी केली. तर मॉरिस कॉलेज टी पॉइन्टवर पाली विद्यापीठ निर्मितीसाठी शांती मार्च काढण्यात आला. माया चवरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चातील गाडगेबाबांच्या वेशात गावोगावातील शाळांना भेटी देऊन ग्रामस्वच्छता आणि नशामुक्तीचा संदेश देणारे श्रीकृष्ण धरमठोक यांनी लक्ष वेधले. शुक्रवारी विधानभवनावर १२ मोर्चे धडकले.
अस्तित्व संघटना बुलडाणा
मागणी : मातृतीर्थ विदर्भ पंढरी बुलडाणा जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करा, राज्यातील सर्वच तीर्थक्षेत्रात दारूबंदी करावी. अनेक गावात पोलिसांच्या आशीर्वादाने दारू गाळणे सुरू आहे. त्यामुळे दारूबंदी कायद्याची पोलिसांकरवी कडक अंमलबजावणी व्हावी. गावोगावी महिला समित्या स्थापन करून त्यांना दारूविक्री करणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी विशेष अधिकार द्यावे, तालुक्यात व्यसनमुक्ती केंद्रे उघडावी, मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशकाची नियुक्ती करावी,
नेतृत्व : लता वाघ सोनोने, प्रतिभा सरदार, सुजाता भगत, नंदाबाई सरदार, माधुरी वाघ, शालिनी सरदार, वंदना तायडे, शोभा भगत, नीलिमा भगत.
ग्राम संरक्षण दल
मागणी : सरसकट महाराष्ट्रात दारूबंदी करण्यात यावी. अवैध दारु विक्रेत्यांवर अजामिनपात्र गुन्हा दाखल करून एक लाख रुपये दंड आकारण्यात यावा. दारुबंदीचा लढा देणाऱ्या महिलांविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे. महिला बचत गटाचे कर्ज माफ करण्यात यावे.
नेतृत्व : माया चवरे, लीलाधर दाभे, ज्ञानेश्वर रक्षक.
ग्राहक कृती समिती
मागणी : आकर्षक परताव्याच्या आमिषाला बळी पडून विदर्भातील लाखो गुंतवणुकदारांनी एजेंटमार्फत सुमारे 100 कोटींची गुंतवणूक केली. मात्र, अचानक कंपनीने गाशा गुंडाळल्याने एजन्ट अडचणीत आले आहेत. कंपनीच्या जमिनीची विक्री करून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करा, आर्थिक घोटाळ्याची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी, कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांना त्वरित अटक करण्यात यावी.
नेतृत्व : भीमराव उमक, रामेश्वर चव्हाण, दिलीप सेसे.
महाराष्ट्र राज्य समतादुत संघर्ष समिती
मागणी : महापुरुषांच्या कार्याचा प्रचार, प्रसारासह समाज कल्याण विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी समता दुतांवर आहे. बार्टीने समता दुतांच्या नियुक्तीची जबाबदारी अन्य कंपनीला दिली आहे. ही पद्धती बदलवून कर्मचाऱ्यांची थेट बार्टीकडून नियुक्ती करण्यात यावी, समतादूतांना प्रवास भत्ता मिळावा.
नेतृत्व : सचिन फुलझेले, ललिता लिल्हारे, भाग्यश्री उज्जैनकर, अनिता कोलते, धम्मदीप भालेराव, नीलेश चौधरी, संध्या राठोड.