म.टा. प्रतिनिधी, नागपूर
राज्यभरात गाजलेल्या युग चांडक अपहरण आणि हत्या प्रकरणातील एका विधिसंघर्षग्रस्त बालकावरील आरोप सिद्ध झाल्याने त्याला दोषी ठरविण्यात आले आहे. त्याच्यावरील भांदविच्या कलम ३६४ (अ) आणि १२० (ब) अन्वये म्हणजेच खंडणीकरिता अपहरण आणि गुन्हेगारी कट रचणे हे आरोप सिद्ध झाले आहेत. या खटल्याचा निकाल आज, शुक्रवारी सुनावण्यात येणार आहे. या बालगुन्हेगाराच्या मदतीने युगला दिवाणात लपविण्याचा आरोपींचा प्लान होता.
या प्रकरणातील अन्य दोन आरोपींना यापूर्वीच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून, हायकोर्टातसुद्धा ही शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. परंतु, या प्रकरणातील एका अल्पवयीन आरोपीविरुद्धची सुनावणी अद्याप पूर्ण झालेली नव्हती. बालन्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. राजेश धनालाल दवारे (२०) आणि अरविंद अभिलाष सिंग (२४) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी १ सप्टेंबर २०१४ रोजी युग चांडक या आठवर्षीय चिमुरड्याचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केली होती. अपहरणकर्त्यांकडून दोन वेळा खंडणीसाठी फोन करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात युगचा गळा दाबून निर्घृण खून केला होता. २ सप्टेंबर रोजी युगचा मृतदेह मिळाला होता. खंडणीच्या उद्देशाने त्यांनी हे अपहरण केले होते. लकडगंज पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सबळ पुराव्यांसह आरोपींविरुद्ध २९० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. न्या. एन.एम. बेदरकर, न्या. मेले, आणि न्या. सुरेखा बोरकुटे यांच्यासमक्ष या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सरकारी वकील एस.जी. शहारे यांनी या प्रकरणी सरकारची बाजू मांडली.
सुधारात्मक शिक्षा
विधी संघर्षग्रस्त बालकांवरील आरोप सिद्ध झाल्यावर त्यांना शिक्षा देण्याची पद्धत ही वेगळी असते. या कायद्यानुसार त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली जात नाही. त्यांच्यात सुधारणा घडावी, या उद्देशाने त्यांना शिक्षा सुनावली जाते.
कटात सहभाग
विधिसंघर्षग्रस्त बालक हा मुख्य आरोपी राजेश दवारेचा सख्खा भाऊ आहे. घटनेच्या वेळी तो १७ वर्षांचा होता. या अपहरणाच्या कटात त्याचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे अपहरण आणि गुन्हेगारी कट रचणे या आरोपांखाली त्याला दोषी ठरविण्यात आले.
राज्यभरात गाजलेल्या युग चांडक अपहरण आणि हत्या प्रकरणातील एका विधिसंघर्षग्रस्त बालकावरील आरोप सिद्ध झाल्याने त्याला दोषी ठरविण्यात आले आहे. त्याच्यावरील भांदविच्या कलम ३६४ (अ) आणि १२० (ब) अन्वये म्हणजेच खंडणीकरिता अपहरण आणि गुन्हेगारी कट रचणे हे आरोप सिद्ध झाले आहेत. या खटल्याचा निकाल आज, शुक्रवारी सुनावण्यात येणार आहे. या बालगुन्हेगाराच्या मदतीने युगला दिवाणात लपविण्याचा आरोपींचा प्लान होता.
या प्रकरणातील अन्य दोन आरोपींना यापूर्वीच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून, हायकोर्टातसुद्धा ही शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. परंतु, या प्रकरणातील एका अल्पवयीन आरोपीविरुद्धची सुनावणी अद्याप पूर्ण झालेली नव्हती. बालन्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. राजेश धनालाल दवारे (२०) आणि अरविंद अभिलाष सिंग (२४) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी १ सप्टेंबर २०१४ रोजी युग चांडक या आठवर्षीय चिमुरड्याचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केली होती. अपहरणकर्त्यांकडून दोन वेळा खंडणीसाठी फोन करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात युगचा गळा दाबून निर्घृण खून केला होता. २ सप्टेंबर रोजी युगचा मृतदेह मिळाला होता. खंडणीच्या उद्देशाने त्यांनी हे अपहरण केले होते. लकडगंज पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सबळ पुराव्यांसह आरोपींविरुद्ध २९० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. न्या. एन.एम. बेदरकर, न्या. मेले, आणि न्या. सुरेखा बोरकुटे यांच्यासमक्ष या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सरकारी वकील एस.जी. शहारे यांनी या प्रकरणी सरकारची बाजू मांडली.
सुधारात्मक शिक्षा
विधी संघर्षग्रस्त बालकांवरील आरोप सिद्ध झाल्यावर त्यांना शिक्षा देण्याची पद्धत ही वेगळी असते. या कायद्यानुसार त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली जात नाही. त्यांच्यात सुधारणा घडावी, या उद्देशाने त्यांना शिक्षा सुनावली जाते.
कटात सहभाग
विधिसंघर्षग्रस्त बालक हा मुख्य आरोपी राजेश दवारेचा सख्खा भाऊ आहे. घटनेच्या वेळी तो १७ वर्षांचा होता. या अपहरणाच्या कटात त्याचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे अपहरण आणि गुन्हेगारी कट रचणे या आरोपांखाली त्याला दोषी ठरविण्यात आले.