म. टा. प्रतिनिधी, नागपूर
थकीत पैसे न दिल्याने कंत्राटदारांनी बोअरवेलची कामे करण्यास तूर्त नकार दिल्याने ऐन उन्हाळ्यात जिल्हा परिषदेच्या अडचणी वाढणार आहेत. पैशाची चिंता करू नका, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी कंत्राटदारांना सांगितले होते. अध्यक्षांच्या आदेशाला डावलून कंत्राटदारांनी उन्हाळ्यात बोअरवेलची कामे थांबविल्याने पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ११०० पैकी जवळपास ८०० बोअरवेलचे सर्वेक्षण भूवैज्ञानिकांनी केलेले आहे.
पण, कंत्राटदारांनी ऐनवेळी कामे थांबविल्याने प्रशासन व सदस्य पेचात सापडले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच बैठक घेऊन विहिरींच्या कामाचा आढावा घेतला होता. समाधानकारक कामे झाल्याचे दिसून आले होते. बोअरवेल कंत्राटदारांनीही कामे करण्यास होकार दिला होता. मागील आठवड्यात अध्यक्षांसमोर कामे करण्याची कंत्राटदारांनी हमी दिली होती. आधी थकीत सात कोटी रुपये द्या, त्यानंतरच कामे पूर्ण करू, असे कंत्राटदारांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर सांगितले. त्यामुळे अध्यक्षांना होकार, तर सीईओंना नकार अशी भूमिका कंत्राटदारांनी का घेतली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बोअरवेलची कामे सुरू करण्याची मुदत तशी मार्चमध्ये संपली आहे. कंत्राटदार आणि झेडपी यांच्या करार न झाल्याने ही कामे रेंगाळली होती. जिल्हा परिषदेत प्रशासक की सदस्यांना मुदतवाढ, यावरूनही बराच वेळ व्यर्थ गेला. त्यानंतर बोअरवेलच्या कामांना हाती घेण्यात आले. पाणी पुरवठा विभागाकडे प्रभारी कार्यकारी अभियंता असल्यानेही कामे प्रलंबित आहेत. सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सहारे यांच्याकडे पाणी पुरवठा विभागाचा कार्यभार आहे. तातडीने पूर्णवेळ कार्यकारी अभियंता दिल्यास बरीच कामे मार्गी लागतील, असा दावा कंत्राटदारांनी केला आहे.
टंचाई तीव्र
नागपूर जिल्ह्यात गत वर्षाच्या तुलनेत यंदा जास्त पाणी टंचाई जाणवू लागली आहे. प्रत्येक तालुक्यातून जवळपास २५ टँकरचे प्रस्ताव जिल्हा परिषदेत पोहचले आहेत. नागपूर जिल्ह्यातील १२ गावांमधून २६ टँकरचे प्रस्ताव आहेत. यात २ लावा, १ बोखारा, १ बेसा, १ बेलतरोडी या गावात टँकरचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे.
थकीत पैसे न दिल्याने कंत्राटदारांनी बोअरवेलची कामे करण्यास तूर्त नकार दिल्याने ऐन उन्हाळ्यात जिल्हा परिषदेच्या अडचणी वाढणार आहेत. पैशाची चिंता करू नका, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी कंत्राटदारांना सांगितले होते. अध्यक्षांच्या आदेशाला डावलून कंत्राटदारांनी उन्हाळ्यात बोअरवेलची कामे थांबविल्याने पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ११०० पैकी जवळपास ८०० बोअरवेलचे सर्वेक्षण भूवैज्ञानिकांनी केलेले आहे.
पण, कंत्राटदारांनी ऐनवेळी कामे थांबविल्याने प्रशासन व सदस्य पेचात सापडले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच बैठक घेऊन विहिरींच्या कामाचा आढावा घेतला होता. समाधानकारक कामे झाल्याचे दिसून आले होते. बोअरवेल कंत्राटदारांनीही कामे करण्यास होकार दिला होता. मागील आठवड्यात अध्यक्षांसमोर कामे करण्याची कंत्राटदारांनी हमी दिली होती. आधी थकीत सात कोटी रुपये द्या, त्यानंतरच कामे पूर्ण करू, असे कंत्राटदारांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर सांगितले. त्यामुळे अध्यक्षांना होकार, तर सीईओंना नकार अशी भूमिका कंत्राटदारांनी का घेतली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बोअरवेलची कामे सुरू करण्याची मुदत तशी मार्चमध्ये संपली आहे. कंत्राटदार आणि झेडपी यांच्या करार न झाल्याने ही कामे रेंगाळली होती. जिल्हा परिषदेत प्रशासक की सदस्यांना मुदतवाढ, यावरूनही बराच वेळ व्यर्थ गेला. त्यानंतर बोअरवेलच्या कामांना हाती घेण्यात आले. पाणी पुरवठा विभागाकडे प्रभारी कार्यकारी अभियंता असल्यानेही कामे प्रलंबित आहेत. सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सहारे यांच्याकडे पाणी पुरवठा विभागाचा कार्यभार आहे. तातडीने पूर्णवेळ कार्यकारी अभियंता दिल्यास बरीच कामे मार्गी लागतील, असा दावा कंत्राटदारांनी केला आहे.
टंचाई तीव्र
नागपूर जिल्ह्यात गत वर्षाच्या तुलनेत यंदा जास्त पाणी टंचाई जाणवू लागली आहे. प्रत्येक तालुक्यातून जवळपास २५ टँकरचे प्रस्ताव जिल्हा परिषदेत पोहचले आहेत. नागपूर जिल्ह्यातील १२ गावांमधून २६ टँकरचे प्रस्ताव आहेत. यात २ लावा, १ बोखारा, १ बेसा, १ बेलतरोडी या गावात टँकरचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे.