म.टा.प्रतिनिधी, नागपूर
नागपूर जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि अधिकारी हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेl. अरविंद केजरीवाल सरकारने तेथील शाळांमध्ये घडविलेला बदल अभ्यासण्यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. शाळांव्यतिरिक्त दिल्लीत संसद भेटीचाही योग या विद्यार्थ्यांना घडवून आणण्यात येणार असल्याची माहिती आहे.
नागपूर जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचा या दिल्ली दौऱ्यात सहभाग राहणार आहे. केजरीवाल सरकारने दिल्लीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये केलेला लक्षणीय बदल देशभरात कौतुकाचा विषय ठरला आहे. दिल्ली सरकारच्या प्रयत्नांमधून तेथील शाळा, विद्यार्थी आणि शिक्षण यामध्ये प्रगती दिसून आली आहे. तेथील स्थानिक शाळा आणि विद्यार्थी यांच्यात झालेला बदल नागपुरातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अनुभवता यावा, यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आहे. नागपूर जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांचे ६२ विद्यार्थी, १३ शिक्षक आणि १५ अधिकारी या दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. २५ नोव्हेंबरनंतर हा दौरा आयोजित केला जाणार असल्याचे जिल्हा परिषदेतील सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या शाळांबरोबरच विद्यार्थ्यांना संसद भवन बघता यावे यादृष्टीनेही नियोजन करण्यात येते आहे. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे, तेथे भेट देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाल्यास त्यांच्याकरिता हा दौरा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे, संसद भवनाच्या भेटीच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येत आहेत. या दौऱ्यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. विविध जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. यामध्ये, सहावी ते आठवी या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
ग्रामीणचे विस्तार अधिकारी दौऱ्याबाहेर!
जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या सहभागावरून वादाला तोंड फुटले आहे. दिल्ली दौऱ्यावर जाणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील अधिकाऱ्यांचा समावेश नाही. केवळ, मुख्यालयातील अधिकाऱ्यांचा या दौऱ्यात सहभाग करण्यात आला आहे. मुख्यालयातील विस्तार अधिकारी ग्रामीण भागातील शाळांचे पर्यवेक्षाचे काम करीत नसताना त्यांचा दौऱ्यात कसा सहभाग करता आला, असा आक्षेप ग्रामीण भागातील विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांनी घेतला आहे.
नागपूर जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि अधिकारी हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेl. अरविंद केजरीवाल सरकारने तेथील शाळांमध्ये घडविलेला बदल अभ्यासण्यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. शाळांव्यतिरिक्त दिल्लीत संसद भेटीचाही योग या विद्यार्थ्यांना घडवून आणण्यात येणार असल्याची माहिती आहे.
नागपूर जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचा या दिल्ली दौऱ्यात सहभाग राहणार आहे. केजरीवाल सरकारने दिल्लीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये केलेला लक्षणीय बदल देशभरात कौतुकाचा विषय ठरला आहे. दिल्ली सरकारच्या प्रयत्नांमधून तेथील शाळा, विद्यार्थी आणि शिक्षण यामध्ये प्रगती दिसून आली आहे. तेथील स्थानिक शाळा आणि विद्यार्थी यांच्यात झालेला बदल नागपुरातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अनुभवता यावा, यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आहे. नागपूर जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांचे ६२ विद्यार्थी, १३ शिक्षक आणि १५ अधिकारी या दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. २५ नोव्हेंबरनंतर हा दौरा आयोजित केला जाणार असल्याचे जिल्हा परिषदेतील सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या शाळांबरोबरच विद्यार्थ्यांना संसद भवन बघता यावे यादृष्टीनेही नियोजन करण्यात येते आहे. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे, तेथे भेट देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाल्यास त्यांच्याकरिता हा दौरा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे, संसद भवनाच्या भेटीच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येत आहेत. या दौऱ्यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. विविध जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. यामध्ये, सहावी ते आठवी या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
ग्रामीणचे विस्तार अधिकारी दौऱ्याबाहेर!
जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या सहभागावरून वादाला तोंड फुटले आहे. दिल्ली दौऱ्यावर जाणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील अधिकाऱ्यांचा समावेश नाही. केवळ, मुख्यालयातील अधिकाऱ्यांचा या दौऱ्यात सहभाग करण्यात आला आहे. मुख्यालयातील विस्तार अधिकारी ग्रामीण भागातील शाळांचे पर्यवेक्षाचे काम करीत नसताना त्यांचा दौऱ्यात कसा सहभाग करता आला, असा आक्षेप ग्रामीण भागातील विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांनी घेतला आहे.