म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा आता रेल्वेने प्रवास करू लागला आहे. बुधवारी सायंकाळी संत्रा घेऊन नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकहून पहिली किसान रेल दिल्लीच्या आदर्शनगरकडे रवाना झाली. लवकरच बांगलादेशलाही नागपुरातून रेल्वेने संत्री जाणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर गाडी काटोलच्या दिशेने निघाली.
यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार, अपर व्यवस्थापक सतपती, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी गाडीचे स्वागत केले. एकूण १२ डब्यांच्या गाडीत २७० टन संत्री पाठविण्यात आली. नागपूर रेल्वेस्थानकाहून दोन डबे आणि एक ब्रेक व्हॅन असे तीन डबे लागले होते. या दोन डब्यांत संत्री होती. गडकरी यांनी सायंकाळी ६ वाजता हिरवी झेंडी दाखविताच गाडी काटोलच्या दिशेने रवाना झाली. काटोलहून एक डबा, नंतर नरखेडहून एक डबा, वरुडहून पाच डबे आणि पांढुर्णाहून संत्री असलेले तीन डबे जोडण्यात आले. नंतर ही गाडी दिल्लीच्या दिशेने रवाना झाली.
संत्रा उत्पादकांसाठी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेशकुमार यांनी पुढाकार घेतला. यासोबतच वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील आणि विभागीय अधिकारी गेल्या दोन महिन्यांपासून संत्रा उत्पादकांच्या संपर्कात होते. जिल्ह्यात जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या वारंवार चर्चा केली. अनेकदा बैठका झाल्या. उत्पादकांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही तसेच सुरक्षित मालाची हमी दिली. चांगला दर मिळत असल्याने उत्पादनकांनीही उत्स्फूर्त प्रतिसादासह या सेवेला पसंतीची पावती दिली आहे. या सेवेमुळे अगदी कमी वेळेत आणि सुरक्षितपणे संत्र्याची वाहतूक केली जाणार आहे. यामुळे वाटेत संत्रा खराब होण्याचे प्रमाण फारच कमी होईल, उत्पादकांना चांगला दर मिळू शकेल. शिवाय, विविध राज्यात आणि देशाबाहेरही संत्र्याची चव चाखता येईल. रेल्वेलाही उत्पन्नाचे एक साधन मिळाले आहे.
दुसऱ्या फेरीत बांगलादेश...
नागपूर रेल्वे स्थानकाहून पहिल्यांदाच रेल्वेने संत्री दिल्लीच्या आदर्शनगर येथे पाठवण्यात आली. त्यानंतर २० ऑक्टोबरला दुसऱ्या फेरीत बांगलादेशला रेल्वे संत्री घेऊन जाणार आहे. विदर्भात काटोल, नरखेड, मोर्शी, वरुड तसेच पांढुर्णा येथून थेट गाड्या सोडण्यात येणार आहेत.
विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा आता रेल्वेने प्रवास करू लागला आहे. बुधवारी सायंकाळी संत्रा घेऊन नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकहून पहिली किसान रेल दिल्लीच्या आदर्शनगरकडे रवाना झाली. लवकरच बांगलादेशलाही नागपुरातून रेल्वेने संत्री जाणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर गाडी काटोलच्या दिशेने निघाली.
यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार, अपर व्यवस्थापक सतपती, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी गाडीचे स्वागत केले. एकूण १२ डब्यांच्या गाडीत २७० टन संत्री पाठविण्यात आली. नागपूर रेल्वेस्थानकाहून दोन डबे आणि एक ब्रेक व्हॅन असे तीन डबे लागले होते. या दोन डब्यांत संत्री होती. गडकरी यांनी सायंकाळी ६ वाजता हिरवी झेंडी दाखविताच गाडी काटोलच्या दिशेने रवाना झाली. काटोलहून एक डबा, नंतर नरखेडहून एक डबा, वरुडहून पाच डबे आणि पांढुर्णाहून संत्री असलेले तीन डबे जोडण्यात आले. नंतर ही गाडी दिल्लीच्या दिशेने रवाना झाली.
संत्रा उत्पादकांसाठी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेशकुमार यांनी पुढाकार घेतला. यासोबतच वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील आणि विभागीय अधिकारी गेल्या दोन महिन्यांपासून संत्रा उत्पादकांच्या संपर्कात होते. जिल्ह्यात जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या वारंवार चर्चा केली. अनेकदा बैठका झाल्या. उत्पादकांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही तसेच सुरक्षित मालाची हमी दिली. चांगला दर मिळत असल्याने उत्पादनकांनीही उत्स्फूर्त प्रतिसादासह या सेवेला पसंतीची पावती दिली आहे. या सेवेमुळे अगदी कमी वेळेत आणि सुरक्षितपणे संत्र्याची वाहतूक केली जाणार आहे. यामुळे वाटेत संत्रा खराब होण्याचे प्रमाण फारच कमी होईल, उत्पादकांना चांगला दर मिळू शकेल. शिवाय, विविध राज्यात आणि देशाबाहेरही संत्र्याची चव चाखता येईल. रेल्वेलाही उत्पन्नाचे एक साधन मिळाले आहे.
दुसऱ्या फेरीत बांगलादेश...
नागपूर रेल्वे स्थानकाहून पहिल्यांदाच रेल्वेने संत्री दिल्लीच्या आदर्शनगर येथे पाठवण्यात आली. त्यानंतर २० ऑक्टोबरला दुसऱ्या फेरीत बांगलादेशला रेल्वे संत्री घेऊन जाणार आहे. विदर्भात काटोल, नरखेड, मोर्शी, वरुड तसेच पांढुर्णा येथून थेट गाड्या सोडण्यात येणार आहेत.