अ‍ॅपशहर

काँग्रेस सत्तेत राहणार की नाही? दिल्लीहून परतलेल्या नाना पटोलेंचं मोठं विधान

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केल्याने काँग्रेस नाराज आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. नाना पटोलेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. आता दिल्लीहून परतलेल्या नाना पटोले यांनी नागपुरात सूचक वक्तव्य केलं आहे. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील मतभेद अधिक ठळकपणे समोर येण्याची चिन्ह आहेत.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 May 2022, 1:59 pm
नागपूर : उदयपूरमध्ये काँग्रेसचे नवसंकल्प शिबिर झालं. याशिबारात काँग्रेसने २० प्रस्तावांना मंजुरी दिली. त्यात एक कुटुंब, एक तिकीट या प्रस्तावाचाही समावेश आहे. यासोबत ५० वर्षांखालील पदाधिकाऱ्यांना ५० टक्के प्रतिनिधित्व देण्याचाही प्रस्ताव आहे. काँग्रेसचे तीन दिवसांचे नवसंकल्प शिबिर रविवारी संपले. या शिबिरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रादेशिक पक्षांबाबत काँग्रेसचे विचार मांडले. प्रादेशिक पक्ष भाजपशी लढू शकत नाही. फक्त काँग्रेसमध्ये ती क्षमता आहे, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं. राहुल गांधींनी प्रादेशिक पक्षांबाबत केलेल्या वक्तव्याचे राज्यात पडसाद उमटण्याची चिन्ह आहेत. आता दिल्लीहून परतलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सूचक वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nana patole statement on maha vikas aghadi government in maharashtra
काँग्रेस सत्तेत राहणार की नाही?, दिल्लीहून परतलेल्या नाना पटोलेंचं मोठं विधान


भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणूक असो की इतर अनेक मुद्दे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही भाजपला मदत करणारी राहिली आहे. फक्त आताच नव्हे गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी भाजपला मदत करण्याचं राजकारण करते आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. राज्यात अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवर सरकार बनंल त्यांचं उल्लंघन करण्यात आलं. सोनिया गांधी यांचा अपमान करण्यात येतोय आणि तो आम्ही सहन करणार नाही. एकूणच राष्ट्रवादीच्या भूमिकीची तक्रार आम्ही हायकमांड केली आहे. त्यावर हायकमांड निर्णय घेईल, असं नाना पटोले म्हणाले.

अजित पवारांनी केलेल्या वक्तव्या नाना पटोले बोलले. अजित पवारांचं ते वक्तव्य आहे. व्यक्तिगत आपण बोलणार नाही. पण पक्ष म्हणून आपण राष्ट्रवादीची तक्रार हायकमांड केली आहे. येत्या दिवसांत त्याचे परिणाम दिसतील, असं नाना पटोले म्हणाले. राज्यातील सत्तेत काँग्रेस राहणार की नाही? असा प्रश्न पटोलेंना विचारण्यात आला. याचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल, असं नाना पटोले यांनी सांगितलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची एकला चलो रे भूमिका राहणार आहे, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

नाना पटोलेंचा अजितदादांना टोला

नाना पटोलेची पार्श्वभूमी ही देशाला माहिती आहे. नाना पटोले हा सत्तेसाठी धडपणारा नाही. जनतेसाठी आणि वाचारासाठी लढणार आहे. माझ्या राजकीय पार्श्वभूमीची जास्त चिंता करण्याची गरज नाही. नाना पटोलेने राजीना दिला समोरून दिला. त्यांच्याशी गद्दारी करण्याचं काम कधीच केलं नाही. नाना पटोलेचा इतिहास एकदम स्पष्ट आहे. जे माझ्याबद्दल बोलतात त्यांची पार्श्वभूमी देशाल माहिती आहे, असा टोला पटेले यांनी अजितदादांना लगावला आहे.

पहाटेची सत्ता गेल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. पण लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या सरकारबद्दल बोलणं चुकीचं आहे, असं नाना पटोले म्हणाले. राज्यातील सत्तेचा बाबरी ढाचा, पाडणारच असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईतील सभेत केलं. त्यावर नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली.

विदर्भातील दोन जागा रिक्त, राज्यसभेत कुणाला मिळणार संधी?

काय म्हणाले होते अजित पवार?

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी खंजिर खुपसला, अशी गंभीर टीका नाना पटोलेंनी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. नाना पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद आहे. नाना पटोले हे कुठल्या पक्षातून काग्रेसमध्ये ते तुम्हाल माहिती आहे. ते भाजपमधून आले. हेडलाईन मिळवण्यासाठी ते अशी वक्तव्य करतात. पण प्रत्यक्षात पक्ष आपआपल्या परिने काम असतात, असं उत्तर अजित पवारांनी दिलं होतं.

राणा दाम्पत्याला गुन्हेगारांपेक्षा वाईट वागणूक, सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या- फडणवीस

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज