अ‍ॅपशहर

Tukaram mundhe तुकाराम मुंढेंच्या अडचणीत वाढ; महिला आयोगानं धाडली नोटिस

स्मार्ट सिटी प्रकल्पात अनियमितता केल्याचा आरोपावंरून सध्या तुकाराम मुंढे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून करण्यात येत आहे. यात आणखी भर पडली असून, मुंढे यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jul 2020, 11:42 pm
नागपूरः स्मार्ट सिटी प्रकल्पात अनियमितता केल्याचा आरोपावंरून सध्या तुकाराम मुंढे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून करण्यात येत आहे. यात आणखी भर पडली असून, मुंढे यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. स्मार्ट सिटीतील महिला अधिकाऱ्यांनी मॅटर्निटी बेनिफिट नाकारले व मानसिक छळ व अपमानास्पद वागणूकीची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली होती. या तक्रारीवरून आयुक्तांना सात दिवसांत याप्रकरणी संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ( Nagpur Municipal Corporation )
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tukaram mundhe


करोना लढ्यात टाटांचा पुन्हा मदतीचा हात; पालिकेला दहा कोटींची आर्थिक मदत

मुंढे यांच्याकडे 'नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड'च्या सीईओपदाचाही कार्यभार आहे. स्मार्ट सिटीतील महिला अधिकारी भानुप्रिया यांनी मुंढेंविरोधात अपमानजनक वागणुकीची तक्रार दहा दिवसांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली होती. आयुक्त मुंढे नेहमीच इतर अधिकाऱ्यांपुढे अपमान करतात. प्रसूती रजेचा लाभही त्यांनी नाकारला. प्रसूतीनंतर कार्यालयात आल्यानंतर आयुक्तांनी कुठल्याही प्रकारच्या प्रसूती रजा व लाभ मागायचे नाही, असे बजावले. तीन महिन्यांचे बाळ असल्याने कोव्हिडच्या काळात घरून काम करण्याची परवानगी मागितली असता आयुक्तांनी दिली नाही,' असेही महिला अधिकाऱ्याने नमूद केले आहे. याप्रकरणी संपूर्ण अहवालासह सात दिवसांत माहिती देण्यात यावी, असेही राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी नोटीसद्वारे आयुक्तांना स्पष्ट केले.

अर्शद वारसीचं वक्तव्य बेजाबदारपणाचे; 'अदानी'कडून कानउघडणी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नितिन गडकरी यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अवैध, बेकायदेशीर, भ्रष्ट आणि घटनाबाह्य कृती करुन सीईओपद बळकावल्याचा गंभीर आरोप केला होता. या कृतीबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह आणि केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्याकडे केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज