नागपूर: 'आदित्य बाळासाहेबांचा नातू आहे. मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. पण त्याच्या वागण्यात अजिबात अहंकार नाही. तो सगळ्यांशी मिळून मिसळून वागतो.'
हे कौतुकाचे बोल कुणा शिवसेनेच्या नेत्याचे नाहीत, तर शिवसेनेसोबत जाऊन सरकार स्थापन करायला काही दिवसांपूर्वी राजी नसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे आहेत. नागपूर अधिवेशनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या स्नेहभोजनानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधिमंडळाच्या सर्व आमदारांशी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला अनेक आमदार उपस्थित होते. त्या दिवशी सभागृहाचं कामकाज उशिरापर्यंत झाल्यामुळं आमदारांना तिथं पोहोचायला उशीर झाला. अजित पवार हे देखील त्यात होते. मात्र, कुणाचीही काही गैरसोय होऊ नये याची पुरेपूर काळजी आदित्य यांनी घेतली. सर्वांना गरमागरम जेवण मिळेल याची तजवीज केली. भोजनाच्या वेळी ते सर्वांना हवं, नको ते विचारत होते. सर्वांची विचारपूस करत होते. कुठलाही बडेजाव त्यांच्या वागण्यात नव्हता. अजित पवारांना त्यांचा हा स्वभाव खूप भावला.
अच्छे दिन येईचि ना... ठाकरेंचा भाजपला टोला
अजित पवार यांनी दुसऱ्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत याचा आवर्जून उल्लेख केला. त्यांनी आदित्य यांच्या स्वभावाचं कौतुक केलं. 'आदित्य नवखा आहे. पण सभागृहात सर्वांमध्ये मिसळतो. त्याच्यात मी पण दिसत नाही. एखादी मिटींग असली, तिथं कुणी वरिष्ठ आले की लगेच खुर्ची खाली करून देतो. त्याच्यात मी पणा दिसत नाही, हे कौतुकास्पद आहे,' असं ते म्हणाले.
आदित्य यांच्याबरोबरच विधानसभेतील अन्य नवनिर्वाचित आमदारांचंही त्यांनी कौतुक केलं. देशमुख बंधू बोलत असताना मला विलासरावच बोलताहेत की काय, असं वाटतं. तीच शैली, तीच शब्दफेक. आदिती तटकरे, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील ही सगळीच तरुण मंडळी चांगली आहेत. आमचा रोहितही चांगलं काम करतोय,' असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं तरुण विशेषत: पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांवर ज्येष्ठांचं बारीक लक्ष असल्याचं स्पष्ट झालं आहे.
अधिवेशनही मातोश्रीवरच घ्या; राणेंची बोचरी टीका
हे कौतुकाचे बोल कुणा शिवसेनेच्या नेत्याचे नाहीत, तर शिवसेनेसोबत जाऊन सरकार स्थापन करायला काही दिवसांपूर्वी राजी नसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे आहेत. नागपूर अधिवेशनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या स्नेहभोजनानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधिमंडळाच्या सर्व आमदारांशी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला अनेक आमदार उपस्थित होते. त्या दिवशी सभागृहाचं कामकाज उशिरापर्यंत झाल्यामुळं आमदारांना तिथं पोहोचायला उशीर झाला. अजित पवार हे देखील त्यात होते. मात्र, कुणाचीही काही गैरसोय होऊ नये याची पुरेपूर काळजी आदित्य यांनी घेतली. सर्वांना गरमागरम जेवण मिळेल याची तजवीज केली. भोजनाच्या वेळी ते सर्वांना हवं, नको ते विचारत होते. सर्वांची विचारपूस करत होते. कुठलाही बडेजाव त्यांच्या वागण्यात नव्हता. अजित पवारांना त्यांचा हा स्वभाव खूप भावला.
अच्छे दिन येईचि ना... ठाकरेंचा भाजपला टोला
अजित पवार यांनी दुसऱ्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत याचा आवर्जून उल्लेख केला. त्यांनी आदित्य यांच्या स्वभावाचं कौतुक केलं. 'आदित्य नवखा आहे. पण सभागृहात सर्वांमध्ये मिसळतो. त्याच्यात मी पण दिसत नाही. एखादी मिटींग असली, तिथं कुणी वरिष्ठ आले की लगेच खुर्ची खाली करून देतो. त्याच्यात मी पणा दिसत नाही, हे कौतुकास्पद आहे,' असं ते म्हणाले.
आदित्य यांच्याबरोबरच विधानसभेतील अन्य नवनिर्वाचित आमदारांचंही त्यांनी कौतुक केलं. देशमुख बंधू बोलत असताना मला विलासरावच बोलताहेत की काय, असं वाटतं. तीच शैली, तीच शब्दफेक. आदिती तटकरे, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील ही सगळीच तरुण मंडळी चांगली आहेत. आमचा रोहितही चांगलं काम करतोय,' असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं तरुण विशेषत: पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांवर ज्येष्ठांचं बारीक लक्ष असल्याचं स्पष्ट झालं आहे.
अधिवेशनही मातोश्रीवरच घ्या; राणेंची बोचरी टीका