म.टा. प्रतिनिधी, नागपूर
मुंजे चौक ते मोरभवन आणि मोरभवन ते झाशी राणी मेट्रो स्टेशन या मार्गावर आणि रेल्वे स्टेशन ते मेट्रो स्टेशन या मार्गावर पादचाऱ्यांसाठी स्काय वॉक तयार करण्याच्या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत करण्यात आले. मेट्रो रेल्वेच्या मार्गावर हे स्कॉय वॉक तयार करण्यात येत आहेत. मात्र, शहरातील इतर अनेक चौक वाहतुकीसाठी धोकादायक असून या चौकातही पादचाऱ्यांसाठी स्काय वॉक किंवा अंडरपासची सुविधा निर्माण करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
स्मार्ट होऊ लागलेल्या नागपुरात सीताबर्डीसह ११ चौकांत पायी चालणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची गरज ‘मटा’ने १० एप्रिल रोजीच्या अंकात प्रसिद्ध केली होती. वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांनीही त्यानंतर पुढे येऊन चौक पार करताना पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग असावा हा मुद्दा लावून धरला. महामेट्रोकडून मेट्रो रेल्वेच्या मार्गात स्काय वॉक तयार केले जात आहेत. मात्र, इतर मार्गांचे काय, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. स्थानिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून इतर चौकातही पादचाऱ्यांसाठी अशी सुविधा निर्माण करण्याची मागणी राज्यशासनाकडे करण्यात आली आहे.
वाहनांसह नागरिकांची गर्दी असणारे चौक अधिक असले तर आज तातडीची गरज म्हणून शहरातील ११ चौकांत अंडरपास किंवा स्काय वॉक तयार होण्याची गरज आहे. यात व्हेरायटी चौक, झाशी राणी, अंजुमन, गणेशपेठ बसस्टॅण्ड, इंदोरा, अग्रसेन, चितारओळी, गोळीबार, मेयो हॉस्पिटल, एलआयसी, रेल्वे स्थानकाजवळील डीआरएम ऑफिस चौक यांचा समावेश आहे. या चौकातील वाढती वाहतूक आणि पादचाऱ्यांची होणारी कोंडी सोडविण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली.
गर्दीचा वाढतोय ग्राफ
अमरावती रोड, घाट रोड, अजनी रोड, रेल्वे स्टेशन रोड, सेंट्रल एव्हेन्यू, मानेवाडा रोड, सुभाष रोड, अयाचित रोड, अंबाझरी रोड, वर्धा रोड, हिंगणा रोड, कामठी रोड, नाग रोड, पाचपावली रोड या रस्त्यांचा वाहतुकीवर परिणाम होतो. या मार्गांवरील वाहतूक नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार शहरातील चौकही गजबजले जाऊ लागले आहेत. १६ तासांत २० हजार ते ८० हजार वाहने शहरातील विविध रस्त्यांवर फिरतात. घाट रोडजवळील नाला क्रॉसिंगजवळ दिवसाला सुमारे ७९ हजार वाहनांची ये-जा असते. सेंट्रल एव्हेन्यूवर दिवसाला ५० हजार वाहनांची ये-जा असते. शहरातील सर्वाधिक वाहनांची वर्दळ असणारे ठिकाण एसटी स्टॅण्ड आहे. येथे ३० हजारांपेक्षा अधिक लोक दिवसाला ये-जा करतात. त्यामुळे या समस्येवर आजच प्रभावी उपाय काढला नाही तर पुढे येणारे धोके अधिक मोठे असतील, असे तज्ज्ञ व सूज्ञ सांगतात.
मुंजे चौक ते मोरभवन आणि मोरभवन ते झाशी राणी मेट्रो स्टेशन या मार्गावर आणि रेल्वे स्टेशन ते मेट्रो स्टेशन या मार्गावर पादचाऱ्यांसाठी स्काय वॉक तयार करण्याच्या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत करण्यात आले. मेट्रो रेल्वेच्या मार्गावर हे स्कॉय वॉक तयार करण्यात येत आहेत. मात्र, शहरातील इतर अनेक चौक वाहतुकीसाठी धोकादायक असून या चौकातही पादचाऱ्यांसाठी स्काय वॉक किंवा अंडरपासची सुविधा निर्माण करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
स्मार्ट होऊ लागलेल्या नागपुरात सीताबर्डीसह ११ चौकांत पायी चालणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची गरज ‘मटा’ने १० एप्रिल रोजीच्या अंकात प्रसिद्ध केली होती. वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांनीही त्यानंतर पुढे येऊन चौक पार करताना पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग असावा हा मुद्दा लावून धरला. महामेट्रोकडून मेट्रो रेल्वेच्या मार्गात स्काय वॉक तयार केले जात आहेत. मात्र, इतर मार्गांचे काय, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. स्थानिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून इतर चौकातही पादचाऱ्यांसाठी अशी सुविधा निर्माण करण्याची मागणी राज्यशासनाकडे करण्यात आली आहे.
वाहनांसह नागरिकांची गर्दी असणारे चौक अधिक असले तर आज तातडीची गरज म्हणून शहरातील ११ चौकांत अंडरपास किंवा स्काय वॉक तयार होण्याची गरज आहे. यात व्हेरायटी चौक, झाशी राणी, अंजुमन, गणेशपेठ बसस्टॅण्ड, इंदोरा, अग्रसेन, चितारओळी, गोळीबार, मेयो हॉस्पिटल, एलआयसी, रेल्वे स्थानकाजवळील डीआरएम ऑफिस चौक यांचा समावेश आहे. या चौकातील वाढती वाहतूक आणि पादचाऱ्यांची होणारी कोंडी सोडविण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली.
गर्दीचा वाढतोय ग्राफ
अमरावती रोड, घाट रोड, अजनी रोड, रेल्वे स्टेशन रोड, सेंट्रल एव्हेन्यू, मानेवाडा रोड, सुभाष रोड, अयाचित रोड, अंबाझरी रोड, वर्धा रोड, हिंगणा रोड, कामठी रोड, नाग रोड, पाचपावली रोड या रस्त्यांचा वाहतुकीवर परिणाम होतो. या मार्गांवरील वाहतूक नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार शहरातील चौकही गजबजले जाऊ लागले आहेत. १६ तासांत २० हजार ते ८० हजार वाहने शहरातील विविध रस्त्यांवर फिरतात. घाट रोडजवळील नाला क्रॉसिंगजवळ दिवसाला सुमारे ७९ हजार वाहनांची ये-जा असते. सेंट्रल एव्हेन्यूवर दिवसाला ५० हजार वाहनांची ये-जा असते. शहरातील सर्वाधिक वाहनांची वर्दळ असणारे ठिकाण एसटी स्टॅण्ड आहे. येथे ३० हजारांपेक्षा अधिक लोक दिवसाला ये-जा करतात. त्यामुळे या समस्येवर आजच प्रभावी उपाय काढला नाही तर पुढे येणारे धोके अधिक मोठे असतील, असे तज्ज्ञ व सूज्ञ सांगतात.