म. टा. वृत्तसेवा, अकोला
कपाशीवर येणाऱ्या कीटकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्यातील पहिला प्रयोग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कापूस संशोधन विभागाच्या प्र-क्षेत्रावर घेण्यात आला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस मुंबई व पडगीलवार इंडस्ट्रीज अकोला यांनी संयुक्तपणे राबविलेल्या या प्रयोगानंतर पुढच्या वर्षी या प्रयोगाची अंमलबजावणी कृषी विद्यापीठातील संपूर्ण कापूस प्र-क्षेत्रावर राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील कपाशीचे क्षेत्र ४० लाख हेक्टरपर्यंत आहे. या पिकावरील बोंडअळीसह विविध प्रकारच्या कीड नियंत्रणासाठी कीटकनाशके फवारणी करावी लागतात. परंतु तज्ज्ञ मुनष्यबळ अलीकडे उपलब्ध होत नसून मजुरांची प्रचंड वानवा आहे. अशास्त्रीय वापराने शेतकरी, शेतमजुरांचे बळी जात आहेत. या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने यांत्रिकीकरणावर भर दिला असून विशेषतः कपाशी पिकावरील कीटकनाशकांवर नियंत्रण मिविण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. स्वयंचलित या यंत्राद्वारे १५ मिनिटांत एक एकरावर फवारणी केली जाणार आहे. बॅटरीवर चालणारे हे ड्रोन असून यामध्ये जीपीएसप्रणाली आहे. एकवेळ क्षेत्र मोजमाप केल्यास पुन्हा मोजण्याची गरज नाही. कीटकनाशकांचा प्रादुर्भाव किती हेसुद्धा यातून कळणार आहे. त्यामुळे फवारणी किती करावी, हेदेखील निश्चित होते. विशेष म्हणजे, फवारणी करताना मध्येच औषध किंवा बॅटरी संपली तर पुन्हा त्याच ठिकाणाहून हे यंत्र फवारणीचे अचूक काम सुरू करते. या प्रणालीद्वारे कीटकनाशके झाडाच्या पानांना जावून पक्के चिकटत असल्याने किडीचे प्रभावी नियंत्रण होते. यावेळी कुलगरू डॉ. व्ही. एम. भाले, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर, मध्यवर्ती संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एच. एन. सेठी, डॉ. शैलेश ठाकरे, डॉ. धीरज कराळे, उद्योजक श्रीकांत पडगीलवार यांच्यासह सर्व विभागाच्या शास्त्रज्ञांची उपस्थिती होती.
कपाशीवरील कीटकनाशकांचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी या तंत्रज्ञानाची आता गरज आहे. यामुळे कीटकनाशकांची प्रभावी अंमलबजावणी करता येईल. मानवी जीवाचा धोकासुद्धा कमी होऊ शकतो. सध्या हे ड्रोन यंत्र प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आले. पुन्हा यात आणखी काही संशोधन करावे लागणार आहे. त्यानंतर सार्वत्रिकस्तरावर याची अंमलबजावणी करता येऊ शकते, अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी दिली.
कपाशीवर येणाऱ्या कीटकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्यातील पहिला प्रयोग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कापूस संशोधन विभागाच्या प्र-क्षेत्रावर घेण्यात आला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस मुंबई व पडगीलवार इंडस्ट्रीज अकोला यांनी संयुक्तपणे राबविलेल्या या प्रयोगानंतर पुढच्या वर्षी या प्रयोगाची अंमलबजावणी कृषी विद्यापीठातील संपूर्ण कापूस प्र-क्षेत्रावर राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील कपाशीचे क्षेत्र ४० लाख हेक्टरपर्यंत आहे. या पिकावरील बोंडअळीसह विविध प्रकारच्या कीड नियंत्रणासाठी कीटकनाशके फवारणी करावी लागतात. परंतु तज्ज्ञ मुनष्यबळ अलीकडे उपलब्ध होत नसून मजुरांची प्रचंड वानवा आहे. अशास्त्रीय वापराने शेतकरी, शेतमजुरांचे बळी जात आहेत. या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने यांत्रिकीकरणावर भर दिला असून विशेषतः कपाशी पिकावरील कीटकनाशकांवर नियंत्रण मिविण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. स्वयंचलित या यंत्राद्वारे १५ मिनिटांत एक एकरावर फवारणी केली जाणार आहे. बॅटरीवर चालणारे हे ड्रोन असून यामध्ये जीपीएसप्रणाली आहे. एकवेळ क्षेत्र मोजमाप केल्यास पुन्हा मोजण्याची गरज नाही. कीटकनाशकांचा प्रादुर्भाव किती हेसुद्धा यातून कळणार आहे. त्यामुळे फवारणी किती करावी, हेदेखील निश्चित होते. विशेष म्हणजे, फवारणी करताना मध्येच औषध किंवा बॅटरी संपली तर पुन्हा त्याच ठिकाणाहून हे यंत्र फवारणीचे अचूक काम सुरू करते. या प्रणालीद्वारे कीटकनाशके झाडाच्या पानांना जावून पक्के चिकटत असल्याने किडीचे प्रभावी नियंत्रण होते. यावेळी कुलगरू डॉ. व्ही. एम. भाले, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर, मध्यवर्ती संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एच. एन. सेठी, डॉ. शैलेश ठाकरे, डॉ. धीरज कराळे, उद्योजक श्रीकांत पडगीलवार यांच्यासह सर्व विभागाच्या शास्त्रज्ञांची उपस्थिती होती.
कपाशीवरील कीटकनाशकांचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी या तंत्रज्ञानाची आता गरज आहे. यामुळे कीटकनाशकांची प्रभावी अंमलबजावणी करता येईल. मानवी जीवाचा धोकासुद्धा कमी होऊ शकतो. सध्या हे ड्रोन यंत्र प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आले. पुन्हा यात आणखी काही संशोधन करावे लागणार आहे. त्यानंतर सार्वत्रिकस्तरावर याची अंमलबजावणी करता येऊ शकते, अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी दिली.