म. टा. प्रतिनिधी, नागपूर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रग्णालय हे विदर्भच नव्हे तर मध्य भारतातील दारिद्र्य रेषेखालील रुग्णांसाठी एकमेव आधार आहे. त्यामुळे येथे उपचाराच्या आशेने येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मेडिकलचा घटक असलेल्या सुपर स्पेशालिटी आणि ट्रॉमा रुग्णालय देखील त्याला अपवाद नाही. मात्र असे असतानाही बाह्यरुग्ण विभागाच्या वेळेत एक तासाची कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
एकट्या मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात रोज किमान अडीच ते तीन हजार रुग्ण विविध आजारांच्या तपासणीसाठी येतात. त्यापैकी सरासरीने १० टक्के रुग्णांना येथील वॉर्डांमध्ये भरती करून घेण्याची वेळ येते. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागासोबतच येथे उपचारासाठी विविध वॉर्डांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या तीनशे ते साडेतीनशेच्या आसपास जाते.
सद्य:स्थितीत मेडिकलमधील बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी आठ ते दोनपर्यंत होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने यात बदल करून एक तासाची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांना आता दुपारी एक वाजेनंतर आल्यास परत फिरावे लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका बाहेरील राज्यातून येणारे रुग्ण आणि दुर्गम भागातील रुग्णांना सोसावा लागणार आहे.
वादाला फुटणार तोंड
मेडिकलमधील अपघात विभागातही रोज किमान दीडशे जखमी अवस्थेत उपचाराला यायचे. त्यामुळे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी अपघात विभागाचे विभाजन करून सर्जिकल कॅज्युअल्टी वेगळी केली होती. त्यामुळे ज्यांना अपघातात किरकोळ दुखापत झाली आहे, त्यांना आणि ज्यांना मायनर शल्यक्रिया करून घरी पाठविता येऊ शकते अशा रुग्णांसाठी हा सर्जिकल कॅज्युअल्टी विभाग वरदान ठरत होता. जखमी झाल्यानंतर तत्काळ उपचार मिळत असल्याने अपघात विभागातील वादावादीच्या घटनांनाही आवर घातला गेला होता. मात्र या दोन्ही कॅज्युअल्टी पुन्हा एकत्र करण्याचा देखील प्रशासन विचार करीत आहे. त्यामुळे वादावादीला पुन्हा तोंड फुटेल, अशी भिती व्यक्त केली जात आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रग्णालय हे विदर्भच नव्हे तर मध्य भारतातील दारिद्र्य रेषेखालील रुग्णांसाठी एकमेव आधार आहे. त्यामुळे येथे उपचाराच्या आशेने येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मेडिकलचा घटक असलेल्या सुपर स्पेशालिटी आणि ट्रॉमा रुग्णालय देखील त्याला अपवाद नाही. मात्र असे असतानाही बाह्यरुग्ण विभागाच्या वेळेत एक तासाची कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
एकट्या मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात रोज किमान अडीच ते तीन हजार रुग्ण विविध आजारांच्या तपासणीसाठी येतात. त्यापैकी सरासरीने १० टक्के रुग्णांना येथील वॉर्डांमध्ये भरती करून घेण्याची वेळ येते. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागासोबतच येथे उपचारासाठी विविध वॉर्डांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या तीनशे ते साडेतीनशेच्या आसपास जाते.
सद्य:स्थितीत मेडिकलमधील बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी आठ ते दोनपर्यंत होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने यात बदल करून एक तासाची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांना आता दुपारी एक वाजेनंतर आल्यास परत फिरावे लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका बाहेरील राज्यातून येणारे रुग्ण आणि दुर्गम भागातील रुग्णांना सोसावा लागणार आहे.
वादाला फुटणार तोंड
मेडिकलमधील अपघात विभागातही रोज किमान दीडशे जखमी अवस्थेत उपचाराला यायचे. त्यामुळे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी अपघात विभागाचे विभाजन करून सर्जिकल कॅज्युअल्टी वेगळी केली होती. त्यामुळे ज्यांना अपघातात किरकोळ दुखापत झाली आहे, त्यांना आणि ज्यांना मायनर शल्यक्रिया करून घरी पाठविता येऊ शकते अशा रुग्णांसाठी हा सर्जिकल कॅज्युअल्टी विभाग वरदान ठरत होता. जखमी झाल्यानंतर तत्काळ उपचार मिळत असल्याने अपघात विभागातील वादावादीच्या घटनांनाही आवर घातला गेला होता. मात्र या दोन्ही कॅज्युअल्टी पुन्हा एकत्र करण्याचा देखील प्रशासन विचार करीत आहे. त्यामुळे वादावादीला पुन्हा तोंड फुटेल, अशी भिती व्यक्त केली जात आहे.