यवतमाळ : अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर त्याच दिवशी वनविभागाच्या पथकाने बछड्यांचा शोध सुरू केला. नऊ दिवस उलटून गेले तरी बछड्यांचा शोध न लागल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच सोमवारी या बछड्यांऐवजी या परिसरात टी-२ वाघाच्या पावलांचे ठसे लोणीजवळील बोराटीच्या जंगलात दिसून आल्याने या वाघाची व दोन बछड्यांची अशी तिहेरी दहशत या भागात वाढली आहे. अवनीचे बछडे शिकार करू शकत नाहीत. त्यामुळे ते उपाशी तडफडत असल्याचे वन्यजीवप्रेमी सांगत आहेत. बछड्यांसाठी वनविभागाने पुरेसे खाद्य जंगलात ठेवले होते. पण, ते खाद्यदेखील बछड्यांनी खाल्लेच नाही. त्यामुळे बछडे गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आठवडा उलटला, बछड्यांचा शोध नाही
अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर त्याच दिवशी वनविभागाच्या पथकाने बछड्यांचा शोध सुरू केला...
Maharashtra Times 13 Nov 2018, 4:00 am