म.टा.वृत्तसेवा,चंद्रपूरः ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर मधील शिवनी वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता समोर आली. तुळशीदास पाकेवार (६०) असे मृतक गुरख्याचे नाव आहे.
सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रात काही जण गेले होते. त्यावेळी कक्ष क्रमांक २६४ मध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक तुळशीदासवर हल्ला केला. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. वनविभागाने जंगलात न जाण्याच्या सूचना त्यांना आधीच दिल्याची महिती आहे. मृतकाचे नातेवाईकांना तातडीची ५० हजारांची मदत देण्यात आली असून, उर्वरित २ लाख ५० हजारांचा धनादेश देण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी म.टा.शी बोलताना दिली.
नऊ महिन्यात अठरा बळी
चालू वर्षात वन्यजीव हल्ल्याच्या जिल्ह्यात अठरा घटना घडल्या आहेत. परिणामी मागील सुमारे सहा महिन्यात वन्यजीव हल्ल्यात अठरा बळी गेले आहेत. त्यातील सर्व हल्ले हे वाघाने केले असून दोन हल्ले बिबट्याने केले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रात काही जण गेले होते. त्यावेळी कक्ष क्रमांक २६४ मध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक तुळशीदासवर हल्ला केला. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. वनविभागाने जंगलात न जाण्याच्या सूचना त्यांना आधीच दिल्याची महिती आहे. मृतकाचे नातेवाईकांना तातडीची ५० हजारांची मदत देण्यात आली असून, उर्वरित २ लाख ५० हजारांचा धनादेश देण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी म.टा.शी बोलताना दिली.
नऊ महिन्यात अठरा बळी
चालू वर्षात वन्यजीव हल्ल्याच्या जिल्ह्यात अठरा घटना घडल्या आहेत. परिणामी मागील सुमारे सहा महिन्यात वन्यजीव हल्ल्यात अठरा बळी गेले आहेत. त्यातील सर्व हल्ले हे वाघाने केले असून दोन हल्ले बिबट्याने केले आहे.