मटा ऑनलाइन वृत्त । नागपूर
भाजपचे खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करून भाजपला घरचा आहेर दिला आहे. खासदारांसोबत झालेल्या एका बैठकी दरम्यान आपण मांडलेल्या प्रश्नांवर आणि समस्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चिडले, असे खळबळजनक वक्तव्य पटोले यांनी एका कार्यक्रमात केले. इतकेच नाही तर मराठवाडा किंवा विदर्भातील कोणताही व्यक्ती एकदा मुंबई, दिल्लीत गेली की त्याची मानसिकता बदलते सूचक विधान करून त्यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरसुद्धा शरसंधान साधले. पटोले यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचे पक्षात आलबेल नसल्याच्या चर्चांना पेव फुटले आहेत.
अॅग्रोव्हेट आणि अॅग्रोइंजिनिअर्सद्वारे आयोजित करण्यात आलेल्या 'विदर्भात सिंचन समस्या आणि शेतकऱ्यांचे अश्रू' या चर्चासत्रा दरम्यान ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सदस्य परिणय फुके, किशोर वरांबे, सुभाष टाले आदि अन्य मान्यवर उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत खासदारांची बैठक झाली. या बैठकीचा अनुभव सांगताना पटोले म्हणाले ‘या बैठकी दरम्यान खासदारांनी मांडलेल्या प्रश्नांवर मोदींनी ‘तुमको ये योजना पता नही है क्या, वो योजना पता नही है क्या? तुम बैठो,’ अशी जुजबी उत्तरे देऊन खासदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मीसुद्धा वेगळ्या ओबीसी मंत्रालयाचा आणि शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला. त्यावरसुद्धा मोदींनी आपण ही योजना सुरु केली ती योजना सुरु केली, अशी माहिती देण्यास सुरवात केली. यावर मी स्वतः शेतकरी असून शेतकऱ्यांना काहीही मिळत नसल्याने सांगितले असता मोदी माझ्यावरही चिडले.’
मुख्यमंत्र्यांनाही टोला
‘मुख्यमंत्र्यांनी एकदा राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत मी काही मुद्दे मांडले. आपल्या राज्याला कमी निधी मिळण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या राज्य सरकारने खासदारांचे महत्त्वच जाणलेले नाही. इतर राज्यांच्या खासदारांना उपजिल्हाधिकारी दर्जाचा एका स्वीय सचिव देण्यात येतो, इतर सुविधासुद्धा पुरविण्यात, असे मुद्दे मी मांडले. या बैठकीनंतर परत मुख्यमंत्र्यांनी खासदारांची बैठकच घेतली नाही. व्यक्ती विदर्भाचा असो वा मराठवाड्याचा असो तो एकदा मुंबई, दिल्लीला गेला त्याची मानसिकता बदलते,’ या शब्दात पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
मोठे प्रकल्प नाही, जलयुक्त शिवार फायद्याचे
यावेळी सिंचनावर बोलताना आमदार फुके म्हणाले ‘विदर्भात मध्यम आणि लघू असे एकूण ३४० सिंचन प्रकल्प आहेत. यातील केवळ १४१ प्रकल्प पूर्ण होऊ शकले आहे. अनेक महत्त्वाचे प्रकल्प रखडलेले आहे. गत काही वर्षातील सिंचन क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा विचार केल्यास मोठ्या प्रकल्पांकडे आशा लावळे फारसे लाभदायी नाही. त्यापेक्षा जलयुक्त शिवार सारख्या लहान पण प्रशासकीय आणि कृषी दृष्टीकोनातून यशस्वी असलेल्या प्रकल्पांवर भर द्यायला हवा.’
भाजपचे खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करून भाजपला घरचा आहेर दिला आहे. खासदारांसोबत झालेल्या एका बैठकी दरम्यान आपण मांडलेल्या प्रश्नांवर आणि समस्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चिडले, असे खळबळजनक वक्तव्य पटोले यांनी एका कार्यक्रमात केले. इतकेच नाही तर मराठवाडा किंवा विदर्भातील कोणताही व्यक्ती एकदा मुंबई, दिल्लीत गेली की त्याची मानसिकता बदलते सूचक विधान करून त्यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरसुद्धा शरसंधान साधले. पटोले यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचे पक्षात आलबेल नसल्याच्या चर्चांना पेव फुटले आहेत.
अॅग्रोव्हेट आणि अॅग्रोइंजिनिअर्सद्वारे आयोजित करण्यात आलेल्या 'विदर्भात सिंचन समस्या आणि शेतकऱ्यांचे अश्रू' या चर्चासत्रा दरम्यान ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सदस्य परिणय फुके, किशोर वरांबे, सुभाष टाले आदि अन्य मान्यवर उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत खासदारांची बैठक झाली. या बैठकीचा अनुभव सांगताना पटोले म्हणाले ‘या बैठकी दरम्यान खासदारांनी मांडलेल्या प्रश्नांवर मोदींनी ‘तुमको ये योजना पता नही है क्या, वो योजना पता नही है क्या? तुम बैठो,’ अशी जुजबी उत्तरे देऊन खासदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मीसुद्धा वेगळ्या ओबीसी मंत्रालयाचा आणि शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला. त्यावरसुद्धा मोदींनी आपण ही योजना सुरु केली ती योजना सुरु केली, अशी माहिती देण्यास सुरवात केली. यावर मी स्वतः शेतकरी असून शेतकऱ्यांना काहीही मिळत नसल्याने सांगितले असता मोदी माझ्यावरही चिडले.’
मुख्यमंत्र्यांनाही टोला
‘मुख्यमंत्र्यांनी एकदा राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत मी काही मुद्दे मांडले. आपल्या राज्याला कमी निधी मिळण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या राज्य सरकारने खासदारांचे महत्त्वच जाणलेले नाही. इतर राज्यांच्या खासदारांना उपजिल्हाधिकारी दर्जाचा एका स्वीय सचिव देण्यात येतो, इतर सुविधासुद्धा पुरविण्यात, असे मुद्दे मी मांडले. या बैठकीनंतर परत मुख्यमंत्र्यांनी खासदारांची बैठकच घेतली नाही. व्यक्ती विदर्भाचा असो वा मराठवाड्याचा असो तो एकदा मुंबई, दिल्लीला गेला त्याची मानसिकता बदलते,’ या शब्दात पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
मोठे प्रकल्प नाही, जलयुक्त शिवार फायद्याचे
यावेळी सिंचनावर बोलताना आमदार फुके म्हणाले ‘विदर्भात मध्यम आणि लघू असे एकूण ३४० सिंचन प्रकल्प आहेत. यातील केवळ १४१ प्रकल्प पूर्ण होऊ शकले आहे. अनेक महत्त्वाचे प्रकल्प रखडलेले आहे. गत काही वर्षातील सिंचन क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा विचार केल्यास मोठ्या प्रकल्पांकडे आशा लावळे फारसे लाभदायी नाही. त्यापेक्षा जलयुक्त शिवार सारख्या लहान पण प्रशासकीय आणि कृषी दृष्टीकोनातून यशस्वी असलेल्या प्रकल्पांवर भर द्यायला हवा.’