वर्धा
राफेल करार आणि उद्योगपतींशी असलेल्या संबंधांवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. सत्य आणि अहिंसेसाठी गांधीजींनी आपलं बलिदान दिलं. पण पंतप्रधान मोदी त्याविरोधात रोजच लढत आहेत, अशी बोचरी टीका राहुल गांधींनी केली.
गांधीजींनी आपल्या संपूर्ण जीवन देशाला दिशा देत अर्पण केलं. गांधीजींनी कधीच कुणाचा राग केला नाही, कधी हिंसा केली नाही आणि कधी कुणाबद्दल वाईट बोलले नाही. पण ज्या विचार, सत्य आणि अहिंसेसाठी गांधींजींनी बलिदान दिले त्या सत्य आणि अहिंसेविरोधात मोदी रोज लढतात. गांधीजी म्हणाले देशाला एकजूट करा पण मोदी फूट पाडत आहेत. गांधीजी म्हणाले खरं बोला पण मोदी रोज खोटं बोलत आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.
राफेलवरून अनिल अंबानींवर निशाणा
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)ला डावलून राफेल करारात विमानांचे कॉन्ट्रॅक्ट अनिल अंबानींना का दिलं? ४५ हजार कोटी रुपयांचं कर्ज असतानाही मोदींनी अनिल अंबानींना विमानचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. कराराच्या १० दिवस आधी अंबानींनी आपली कंपनी बनवली. ५२६ कोटी रुपयांची विमानं मोदींनी १६ हजार कोटींमध्ये खरेदी केली. जनेतेचे ३० हजार कोटी रुपये हिसकावून अनिल अंबानींना दिले गेले. या मागे मोदींचा काय हेतू आहे? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.
'शेतकऱ्यांचे हाल, उद्योगपती मालमाल'
गेल्या चार वर्षात मोदींनी १५ ते २० उद्योगपतींचं ३ लाख २० हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे हात जोडून विनवणी करत आहेत. पण पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री त्यांना कर्जमाफी देत नाहीए. आपल्याला पंतप्रधान नव्हे तर देशाचा चौकीदार व्हायचं आहे, असं मोदी सांगत होते. पण मोदी चौकीदार नाही भागीदार झालेत, असा घणाघात राहुल गांधींनी केला.
राहुल आणि सोनिया गांधींनी धुतली ताटं
सभेपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सेवाग्राममध्ये गांधीजींना आदरांजली वाहिली. आयोजित केलेल्या प्रार्थनासभेत ते सहभागी झाले. यानंतर नेत्यांनी भोजन केलं. भोजन झाल्यावर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी स्वतः आपलं ताट धुतलं.
राफेल करार आणि उद्योगपतींशी असलेल्या संबंधांवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. सत्य आणि अहिंसेसाठी गांधीजींनी आपलं बलिदान दिलं. पण पंतप्रधान मोदी त्याविरोधात रोजच लढत आहेत, अशी बोचरी टीका राहुल गांधींनी केली.
गांधीजींनी आपल्या संपूर्ण जीवन देशाला दिशा देत अर्पण केलं. गांधीजींनी कधीच कुणाचा राग केला नाही, कधी हिंसा केली नाही आणि कधी कुणाबद्दल वाईट बोलले नाही. पण ज्या विचार, सत्य आणि अहिंसेसाठी गांधींजींनी बलिदान दिले त्या सत्य आणि अहिंसेविरोधात मोदी रोज लढतात. गांधीजी म्हणाले देशाला एकजूट करा पण मोदी फूट पाडत आहेत. गांधीजी म्हणाले खरं बोला पण मोदी रोज खोटं बोलत आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.
राफेलवरून अनिल अंबानींवर निशाणा
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)ला डावलून राफेल करारात विमानांचे कॉन्ट्रॅक्ट अनिल अंबानींना का दिलं? ४५ हजार कोटी रुपयांचं कर्ज असतानाही मोदींनी अनिल अंबानींना विमानचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. कराराच्या १० दिवस आधी अंबानींनी आपली कंपनी बनवली. ५२६ कोटी रुपयांची विमानं मोदींनी १६ हजार कोटींमध्ये खरेदी केली. जनेतेचे ३० हजार कोटी रुपये हिसकावून अनिल अंबानींना दिले गेले. या मागे मोदींचा काय हेतू आहे? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.
'शेतकऱ्यांचे हाल, उद्योगपती मालमाल'
गेल्या चार वर्षात मोदींनी १५ ते २० उद्योगपतींचं ३ लाख २० हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे हात जोडून विनवणी करत आहेत. पण पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री त्यांना कर्जमाफी देत नाहीए. आपल्याला पंतप्रधान नव्हे तर देशाचा चौकीदार व्हायचं आहे, असं मोदी सांगत होते. पण मोदी चौकीदार नाही भागीदार झालेत, असा घणाघात राहुल गांधींनी केला.
राहुल आणि सोनिया गांधींनी धुतली ताटं
सभेपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सेवाग्राममध्ये गांधीजींना आदरांजली वाहिली. आयोजित केलेल्या प्रार्थनासभेत ते सहभागी झाले. यानंतर नेत्यांनी भोजन केलं. भोजन झाल्यावर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी स्वतः आपलं ताट धुतलं.