नागपूर:
नागपूरच्या भिवापूर येथे आज सकाळी झालेल्या अपघातात एक मुलगी चिरडली गेली असून या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे संतप्त जमावाने नागपूर-गडचिरोली महामार्गावर रास्ता रोको करत जाळपोळ केल्याने पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या चार नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यामुळे या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
सकाळी साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. भिवापूर येथे रस्त्याच्याकडेला एक ट्रॅव्हल बस बंद पडलेली होती. त्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतं. या अपघातात एक मुलगी ठार झाल्याचं कळताच संतप्त जमावाने नागपूर-गडचिरोली महामार्ग रोखून धरला. जमावाने रास्ता रोको करत टायर आणि लाकडे पेटवून संताप व्यक्त केला. या अपघाताला कारणीभूत ठरणारी रस्त्याच्याकडेला उभी असलेली बसही जमावाने पेटवून दिली. यावेळी पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठाणेदाराला हटवण्याची मागणी करण्यात आली. जमावाने जाळपोळ करत सुमारे दोन तास वाहतूक अडवून ठेवल्याने पोलिसांनी लाठीमार केला. मात्र त्यानंतरही आंदोलन सुरूच राहिल्याने अश्रुधुराच्या चार नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बघता बघता या आंदोलनाचे लोण संपूर्ण शहरभर पसरले. नागरिकांनी मोर्चा काढत पोलिसांचा निषेध नोंदवला. अवैद्य वाहतुकीला आश्रय देत असल्यामुळेच हा अपघात झाला आहे. या अवैद्य वाहतुकीला अभय देणारे ठाणेदार हर्षल येकरे यांना निलंबित करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात विद्यार्थीही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
नागपूरच्या भिवापूर येथे आज सकाळी झालेल्या अपघातात एक मुलगी चिरडली गेली असून या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे संतप्त जमावाने नागपूर-गडचिरोली महामार्गावर रास्ता रोको करत जाळपोळ केल्याने पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या चार नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यामुळे या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
सकाळी साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. भिवापूर येथे रस्त्याच्याकडेला एक ट्रॅव्हल बस बंद पडलेली होती. त्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतं. या अपघातात एक मुलगी ठार झाल्याचं कळताच संतप्त जमावाने नागपूर-गडचिरोली महामार्ग रोखून धरला. जमावाने रास्ता रोको करत टायर आणि लाकडे पेटवून संताप व्यक्त केला. या अपघाताला कारणीभूत ठरणारी रस्त्याच्याकडेला उभी असलेली बसही जमावाने पेटवून दिली. यावेळी पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठाणेदाराला हटवण्याची मागणी करण्यात आली. जमावाने जाळपोळ करत सुमारे दोन तास वाहतूक अडवून ठेवल्याने पोलिसांनी लाठीमार केला. मात्र त्यानंतरही आंदोलन सुरूच राहिल्याने अश्रुधुराच्या चार नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बघता बघता या आंदोलनाचे लोण संपूर्ण शहरभर पसरले. नागरिकांनी मोर्चा काढत पोलिसांचा निषेध नोंदवला. अवैद्य वाहतुकीला आश्रय देत असल्यामुळेच हा अपघात झाला आहे. या अवैद्य वाहतुकीला अभय देणारे ठाणेदार हर्षल येकरे यांना निलंबित करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात विद्यार्थीही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.