नीरज आवंडेकर, अकोला
'सत्तेपासून वंचित असलेल्यांना स्थान देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. यात सहभागी होण्याचा प्रस्ताव एमआयएमने दिला. हेदेखील सत्तेपासून दूर असलेले घटक असल्याने आम्ही त्याचा स्वीकार केला. त्यामुळे एमआयएमदेखील वंचित बहुजन आघाडीचा घटक असेल. ही युती नव्हे तर वंचित घटकांची आघाडी आहे, असे स्पष्ट मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केले.
अॅड. प्रकाश आंबेडकरांनी समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन भारिप-बहुजन महासंघाची सुरुवात अकोल्यातून केली होती. पक्ष वाढीसाठी त्याचा मोठा लाभ झाला होता. वऱ्हाडातील बऱ्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भारिप-बमसंचे वर्चस्व आहे. अकोला जिल्हा परिषद तर बऱ्याच अंशी भारिप-बमसंच्या ताब्यात आहे. त्यातही अकोला जिल्हा प्रकाश आंबेडकरांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. काँग्रेससोबत युती करून अकोल्यातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र स्वबळाचा नारा दिल्यानंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सोबतच काँग्रेसचाही पराभवच झाला आणि त्यामुळे सलग तीन वेळा अकोल्याची खासदारकी भाजपकडे गेली. एकूणच राजकीय परिस्थिती लक्षात घेता अॅड. आंबेडकर यांनी काँग्रेससोबत आघाडी करावी, असे मत राजकीत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. आता काँग्रेससोबत जावे लागल्यास एमआयएमची अडचण होईल की सोयीचे राजकारण खेळले जाईल, याकडेही लक्ष लागून आहे. पण, काँग्रेसनी प्रस्ताव दिल्यास आमच्या अटींवर मान्य करू, असेही अॅड. आंबेडकर यांनी सांगितले.
आघाडी महाराष्ट्रापुरतीच मर्यादित
वंचित बहुजन आघाडीमध्ये आमच्या सोबत विजय मोरे, लक्ष्मण माने यासारखी राजकारणातील दिग्गज मंडळीसुद्धा आहे. यापुढे अॅड. ओवेसी आणि त्यांचा पक्षसुद्धा वंचित बहुजन आघाडीचा घटक असतील. ही आघाडी फक्त महाराष्ट्रातील निवडणुकीपुरतीच मर्यादित असेल, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले.
आंबेडकर-ओवेसी यांची २ ऑक्टोबरला बैठक
एमआयएमचे अध्यक्ष अॅड. असदुद्दीन ओवेसी आणि अॅड. आंबेडकर यांची येत्या २ ऑक्टोबरला औरंगाबादमध्ये बैठक होणार आहे. त्याच दिवशी जाहीर सभा होणार असून अॅड. ओवेसीदेखील व्यासपीठावर राहणार आहेत. इथेच या नव्या सोशल इंजिनीअरिंगची घोषणा होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
'सत्तेपासून वंचित असलेल्यांना स्थान देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. यात सहभागी होण्याचा प्रस्ताव एमआयएमने दिला. हेदेखील सत्तेपासून दूर असलेले घटक असल्याने आम्ही त्याचा स्वीकार केला. त्यामुळे एमआयएमदेखील वंचित बहुजन आघाडीचा घटक असेल. ही युती नव्हे तर वंचित घटकांची आघाडी आहे, असे स्पष्ट मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केले.
अॅड. प्रकाश आंबेडकरांनी समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन भारिप-बहुजन महासंघाची सुरुवात अकोल्यातून केली होती. पक्ष वाढीसाठी त्याचा मोठा लाभ झाला होता. वऱ्हाडातील बऱ्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भारिप-बमसंचे वर्चस्व आहे. अकोला जिल्हा परिषद तर बऱ्याच अंशी भारिप-बमसंच्या ताब्यात आहे. त्यातही अकोला जिल्हा प्रकाश आंबेडकरांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. काँग्रेससोबत युती करून अकोल्यातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र स्वबळाचा नारा दिल्यानंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सोबतच काँग्रेसचाही पराभवच झाला आणि त्यामुळे सलग तीन वेळा अकोल्याची खासदारकी भाजपकडे गेली. एकूणच राजकीय परिस्थिती लक्षात घेता अॅड. आंबेडकर यांनी काँग्रेससोबत आघाडी करावी, असे मत राजकीत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. आता काँग्रेससोबत जावे लागल्यास एमआयएमची अडचण होईल की सोयीचे राजकारण खेळले जाईल, याकडेही लक्ष लागून आहे. पण, काँग्रेसनी प्रस्ताव दिल्यास आमच्या अटींवर मान्य करू, असेही अॅड. आंबेडकर यांनी सांगितले.
आघाडी महाराष्ट्रापुरतीच मर्यादित
वंचित बहुजन आघाडीमध्ये आमच्या सोबत विजय मोरे, लक्ष्मण माने यासारखी राजकारणातील दिग्गज मंडळीसुद्धा आहे. यापुढे अॅड. ओवेसी आणि त्यांचा पक्षसुद्धा वंचित बहुजन आघाडीचा घटक असतील. ही आघाडी फक्त महाराष्ट्रातील निवडणुकीपुरतीच मर्यादित असेल, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले.
आंबेडकर-ओवेसी यांची २ ऑक्टोबरला बैठक
एमआयएमचे अध्यक्ष अॅड. असदुद्दीन ओवेसी आणि अॅड. आंबेडकर यांची येत्या २ ऑक्टोबरला औरंगाबादमध्ये बैठक होणार आहे. त्याच दिवशी जाहीर सभा होणार असून अॅड. ओवेसीदेखील व्यासपीठावर राहणार आहेत. इथेच या नव्या सोशल इंजिनीअरिंगची घोषणा होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.