म.टा.वृत्तसेवा, अमरावती :
काँग्रेसने संधी दिली म्हणून भाजपा सत्तेत आली. काँग्रेस बदमाशांचा पक्ष आहे. परंतु, भाजपावाले त्यापेक्षाही महाचोर आहेत. क्रमांक एकचे खोटारडे व चोरांचे हे सरकार आहे. केवळ निवडणुका जवळ आल्या की सरकार विरोधी पक्षातील नेत्यांच्या भानगडी बाहेर काढतात. मात्र, त्यांना अटक करण्यात येत नाही. दुसरीकडे आपल्या हक्काविरोधात आवाज बुलंद करणाऱ्यांना नक्षलवादी घोषित करण्यात येते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हाती सत्ता आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सक्षम पर्याय असल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
सायन्सकोरच्या प्रांगणावर रविवारी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सत्ता संपादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मंचावर एमआयएमचे आ.वारिस खान पठाण, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, भारिप-बमसंचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने, प्रदेश महासचिव गुणवंत देवपारे, जिल्हाध्यक्ष ॲड.नंदेश अंबाडकर, एमआयएमचे महापालिकेतील गटनेते अब्दुल नाजीम, नसीम सिद्दीकी, सागर डबरासे, वंदना तायडे, विद्या वानखडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षांचा कालावधी लोटला, तरी अद्याप पारधी समाजाला गावात स्थान मिळाले नाही. तर दुसरीकडे संस्कृतीचे ठेकेदार बडनेरात अधिवेशन घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांसोबत लढलेल्यांना आजवर कधीही सत्तेत स्थान मिळाले नाही. परंतु, ब्रिटिशांच्या मांडीवर बसणारे संस्कृतीचे ठेकेदार आज देश चालवित आहेत. आपण कुठल्या संस्कृतीचे ठेकेदार आहात, हे आरएसएसने स्पष्ट करावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. विदर्भातील संत्र्याच्या बियांमध्ये ॲसिड आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. त्यांनी येथील संत्र्याला शापित करण्याचे काम केले. परिणामी, विदर्भातील मार्केट संपले. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आपल्या फायद्यासाठी हे काम केल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदारसंघाचे उमेदवार म्हणून गुणवंत देवपारे यांच्या नावाची घोषणा आंबेडकर यांनी यावेळी केली.
काँग्रेसने संधी दिली म्हणून भाजपा सत्तेत आली. काँग्रेस बदमाशांचा पक्ष आहे. परंतु, भाजपावाले त्यापेक्षाही महाचोर आहेत. क्रमांक एकचे खोटारडे व चोरांचे हे सरकार आहे. केवळ निवडणुका जवळ आल्या की सरकार विरोधी पक्षातील नेत्यांच्या भानगडी बाहेर काढतात. मात्र, त्यांना अटक करण्यात येत नाही. दुसरीकडे आपल्या हक्काविरोधात आवाज बुलंद करणाऱ्यांना नक्षलवादी घोषित करण्यात येते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हाती सत्ता आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सक्षम पर्याय असल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
सायन्सकोरच्या प्रांगणावर रविवारी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सत्ता संपादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मंचावर एमआयएमचे आ.वारिस खान पठाण, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, भारिप-बमसंचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने, प्रदेश महासचिव गुणवंत देवपारे, जिल्हाध्यक्ष ॲड.नंदेश अंबाडकर, एमआयएमचे महापालिकेतील गटनेते अब्दुल नाजीम, नसीम सिद्दीकी, सागर डबरासे, वंदना तायडे, विद्या वानखडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षांचा कालावधी लोटला, तरी अद्याप पारधी समाजाला गावात स्थान मिळाले नाही. तर दुसरीकडे संस्कृतीचे ठेकेदार बडनेरात अधिवेशन घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांसोबत लढलेल्यांना आजवर कधीही सत्तेत स्थान मिळाले नाही. परंतु, ब्रिटिशांच्या मांडीवर बसणारे संस्कृतीचे ठेकेदार आज देश चालवित आहेत. आपण कुठल्या संस्कृतीचे ठेकेदार आहात, हे आरएसएसने स्पष्ट करावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. विदर्भातील संत्र्याच्या बियांमध्ये ॲसिड आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. त्यांनी येथील संत्र्याला शापित करण्याचे काम केले. परिणामी, विदर्भातील मार्केट संपले. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आपल्या फायद्यासाठी हे काम केल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदारसंघाचे उमेदवार म्हणून गुणवंत देवपारे यांच्या नावाची घोषणा आंबेडकर यांनी यावेळी केली.