अ‍ॅपशहर

दीक्षाभूमीवर येऊन धन्य झालो: राष्ट्रपती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या पवित्र भूमीवर समता तसेच सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळेच संपूर्ण समाज प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकला. ही दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग, शांती आणि मानवतेची प्रेरणा देणारी आहे. येथे येऊन मी धन्य झालो आहे, अशा शब्दांत आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बाबासाहेबांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

Maharashtra Times 22 Sep 2017, 3:47 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नागपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम president kovind visits deeksha bhoomi at nagpur
दीक्षाभूमीवर येऊन धन्य झालो: राष्ट्रपती


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या पवित्र भूमीवर समता तसेच सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळेच संपूर्ण समाज प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकला. ही दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग, शांती आणि मानवतेची प्रेरणा देणारी आहे. येथे येऊन मी धन्य झालो आहे, अशा शब्दांत आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बाबासाहेबांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

राष्ट्रपती कोविंद यांनी आज येथील दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेबांना वंदन केले. यावेळी अतिथी डायरीतील संदेशाच्या माध्यमातून राष्ट्रपतींनी बाबासाहेबांच्या कार्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी राष्ट्रपतींसोबत होते. राष्ट्रपती झाल्यानंतर कोविंद यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. या दौऱ्यात आंतरराष्ट्रीय ध्यानधारणा केंद्राचे उद्घाटन आणि बुद्ध वंदना कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. त्यानंतर रामटेक येथे शांतिनाथ जैन मंदिरात दर्शनासाठीही ते जाणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज