एकनाथ चौधरी, वर्धा
मध्यवर्ती दारूगोळा भांडारातील दुर्दैवी घटनेला आज, मंगळवारी वर्ष पूर्ण होत आहे. या काळात बरेच काही घडून गेले. नेते-अधिकाऱ्यांचे दौरे झाले, प्रसारमाध्यमांचे कॅमेरेही फोटो घेऊन गेले. दारूगोळा भांडाराच्या परिसरातील साऱ्याच गावांसाठी हे नवे होते. नव्याची नवलाई संपल्यानंतर अनेकांना वास्तवाची जाणीव झाली. वर्षभरानंतरही उद्ध्वस्त घरे, दुभंगलेली मने आणि विस्कटलेले संसार दिसले. तो एक अपघात होता. त्याची जबाबदारी निश्चित करून कारवाई करणे हे सरकारचे काम. ते त्याच्या गतीने होत राहील. स्फोटांमुळे पडलेली घरेही पुन्हा उभी राहतील. खरा प्रश्न आहे तो या स्फोटांची थेट झळ पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा. त्यांच्या घरातल्या कर्त्या पुरुषांची पोकळी कशी भरून निघणार... त्यांचे भविष्य कसे सावरणार?
मध्यवर्ती दारूगोळा भांडारातील आग विझवण्याच्या प्रयत्नात १९ जणांनी प्राण गमावले. अमित दांडेकर आणि प्रमोद मेश्राम यांनाही दुर्दैवी मृत्यू आला. पुलगाव येथील अग्निशमन दलामध्ये २००२पासून फायर इंजीन ड्रायव्हर म्हणून अमित काम करत होते. त्यांचे भाऊसुद्धा फायर इंजीन ड्रायव्हर आहे. घटनेच्या दिवशी ते कर्तव्यावर होते. दारूगोळा भांडारात आग लागल्याचे कळताच जीवाची पर्वा न करता अमित घटनास्थळी गेले आणि पुन्हा परतलेच नाहीत. अमितच्या अचानक जाण्याने त्यांची पत्नी प्राची, पाच वर्षांचा मुलगा आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मुख्य आधारच हरवला आहे. पण, पोरके झालेल्या मुलांच्या भविष्यासाठी त्या खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुर्घटनेनंतर सरकारीस्तरावरुन मदत मिळाली. पण प्राची यांना कायमस्वरुपी नोकरी आणि पेन्शनची अजूनही प्रतीक्षा आहे. दांडेकर यांच्याप्रमाणेच प्रमोद मेश्राम यांच्याही कुटुंबीयांचा मुख्य आधार गेला आहे. मेश्राम आणि दांडेकर ही फक्त प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. या घटनेतील अन्य १७ जवानांच्या कुटुंबीयांची परिस्थितीसुद्धा वेगळी नाही.
पुलगाव दुर्घटनेच्या पहिल्या स्मृतिदिनी, बुधवारी पुलगाव येथील मित्र परिवाराने ‘एक शाम शहिदों के नाम’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
स्फोट अजूनही सुन्न करतात
स्फोटाच्या घटनेनंतर आगरगाव, पिपरी, मुरदगाव, नागझरी व येसगाव या गावांमध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यात एकूण ११९ रुग्णांना स्फोटांच्या आवाजामुळे बहिरेपणा आल्याचे स्पष्ट झाले. तर ८० नागरिकांना इतर किरकोळ दुखापती व आजार झाल्याचे निष्पन्न झाले. यापैकी ५८ पुढील उपचारांसाठी अन्यत्र पाठविण्यात आले. उपचारानंतर काही जणांचा बहिरेपणाचा त्रास कमी झाला. परंतु, अद्यापही स्फोटांचे आवाज कानात घुमत असल्याचे काही जणांनी सांगितले.
ही अतिशय दुर्दैवी घटना होती. अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी सर्वांनाच घ्यावी लागणार आहे. दारुगोळा भांडारासारख्या संवेदनशील स्थानांच्या आजूबाजूच्या परिसराची नियमित छाननी व्हायला हवी. सोबतच डेपोच्या बाजूला अतिक्रमण असेल तर तेही खबरदारी घेत हटविले गेले पाहिजे.
- डॉ. इंद्रजित खांडेकर, सेवाग्राम रुग्णालय
मध्यवर्ती दारूगोळा भांडारातील दुर्दैवी घटनेला आज, मंगळवारी वर्ष पूर्ण होत आहे. या काळात बरेच काही घडून गेले. नेते-अधिकाऱ्यांचे दौरे झाले, प्रसारमाध्यमांचे कॅमेरेही फोटो घेऊन गेले. दारूगोळा भांडाराच्या परिसरातील साऱ्याच गावांसाठी हे नवे होते. नव्याची नवलाई संपल्यानंतर अनेकांना वास्तवाची जाणीव झाली. वर्षभरानंतरही उद्ध्वस्त घरे, दुभंगलेली मने आणि विस्कटलेले संसार दिसले. तो एक अपघात होता. त्याची जबाबदारी निश्चित करून कारवाई करणे हे सरकारचे काम. ते त्याच्या गतीने होत राहील. स्फोटांमुळे पडलेली घरेही पुन्हा उभी राहतील. खरा प्रश्न आहे तो या स्फोटांची थेट झळ पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा. त्यांच्या घरातल्या कर्त्या पुरुषांची पोकळी कशी भरून निघणार... त्यांचे भविष्य कसे सावरणार?
मध्यवर्ती दारूगोळा भांडारातील आग विझवण्याच्या प्रयत्नात १९ जणांनी प्राण गमावले. अमित दांडेकर आणि प्रमोद मेश्राम यांनाही दुर्दैवी मृत्यू आला. पुलगाव येथील अग्निशमन दलामध्ये २००२पासून फायर इंजीन ड्रायव्हर म्हणून अमित काम करत होते. त्यांचे भाऊसुद्धा फायर इंजीन ड्रायव्हर आहे. घटनेच्या दिवशी ते कर्तव्यावर होते. दारूगोळा भांडारात आग लागल्याचे कळताच जीवाची पर्वा न करता अमित घटनास्थळी गेले आणि पुन्हा परतलेच नाहीत. अमितच्या अचानक जाण्याने त्यांची पत्नी प्राची, पाच वर्षांचा मुलगा आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मुख्य आधारच हरवला आहे. पण, पोरके झालेल्या मुलांच्या भविष्यासाठी त्या खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुर्घटनेनंतर सरकारीस्तरावरुन मदत मिळाली. पण प्राची यांना कायमस्वरुपी नोकरी आणि पेन्शनची अजूनही प्रतीक्षा आहे. दांडेकर यांच्याप्रमाणेच प्रमोद मेश्राम यांच्याही कुटुंबीयांचा मुख्य आधार गेला आहे. मेश्राम आणि दांडेकर ही फक्त प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. या घटनेतील अन्य १७ जवानांच्या कुटुंबीयांची परिस्थितीसुद्धा वेगळी नाही.
पुलगाव दुर्घटनेच्या पहिल्या स्मृतिदिनी, बुधवारी पुलगाव येथील मित्र परिवाराने ‘एक शाम शहिदों के नाम’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
स्फोट अजूनही सुन्न करतात
स्फोटाच्या घटनेनंतर आगरगाव, पिपरी, मुरदगाव, नागझरी व येसगाव या गावांमध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यात एकूण ११९ रुग्णांना स्फोटांच्या आवाजामुळे बहिरेपणा आल्याचे स्पष्ट झाले. तर ८० नागरिकांना इतर किरकोळ दुखापती व आजार झाल्याचे निष्पन्न झाले. यापैकी ५८ पुढील उपचारांसाठी अन्यत्र पाठविण्यात आले. उपचारानंतर काही जणांचा बहिरेपणाचा त्रास कमी झाला. परंतु, अद्यापही स्फोटांचे आवाज कानात घुमत असल्याचे काही जणांनी सांगितले.
ही अतिशय दुर्दैवी घटना होती. अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी सर्वांनाच घ्यावी लागणार आहे. दारुगोळा भांडारासारख्या संवेदनशील स्थानांच्या आजूबाजूच्या परिसराची नियमित छाननी व्हायला हवी. सोबतच डेपोच्या बाजूला अतिक्रमण असेल तर तेही खबरदारी घेत हटविले गेले पाहिजे.
- डॉ. इंद्रजित खांडेकर, सेवाग्राम रुग्णालय