म.टा.प्रतिनिधी,नागपूर
रेल्वे स्थानक, गणेश टेकडी मंदिरासमोरील मानस चौक ते जयस्तंभ चौकादरम्यानचा उड्डाणपूल पाडण्याच्या नोटीसवर मंगळवारी महासभेत चर्चा करण्यात आली. हा उड्डाणपूल पाडण्यासाठी योग्य पद्धतीने सर्वंकष विचार करूनच निर्णय घ्यावा या विरोधकांच्या मागणीनंतर अखेर यासंदर्भात प्रशासनाकडून प्रस्ताव आणला जावा, असे ठरले. वाहतुकीच्या कारणास्तव काही संस्थांनी हा उड्डाणपूल पाडावा असे निवेदन केल्यानंतर माजी महापौर प्रवीण दटके यांनी यासंदर्भात नोटीस दिली होती.
या उड्डाणपुलामुळे शहरातील श्रद्धास्थान असलेल्या श्री गणेश मंदिर टेकडीच्या दर्शनार्थ जाणाऱ्या भाविकांना व रेल्वे स्थानकावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांकरिता अडचणीचा ठरत आहे. शिवाय, उड्डाणपुलाखाली असलेल्या दुकानांमुळेही नागरिकांना अडचण होत आहे. वाहतूक खोळंबत आहे. रेल्वे स्थानकावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांकरिता पूर्व-पश्चिम नागपूर जोडणाऱ्या रामझुला मार्गे जयस्तंभ चौकात येणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. भविष्यात मेट्रो रेल्वे, रामझुल्याचा भाग बघता वाहतूक कोंडी तोडण्यासाठी हा उड्डाणपूल तोडावा अशी विनंती जनाक्रोश, गणेश मंदिर संस्था व इतर काही संस्थांनी मनपाकडे तक्रारी व निवेदनातून केली. त्यानुसार ही नोटीस आणण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी या नोटीसची गरज काय असा सवाल करीत नोटीसऐवजी प्रशासनाकडून प्रस्ताव आणावा असे मत मांडले.
या नोटीसवर किमान चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या उड्डाणपुलाखाली असलेल्या दुकानदारांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही असेल याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. टी. चंद्रशेखर नागपूरचे आयुक्त असताना त्यांच्या कार्यकाळात हा उड्डाणपूल उभारण्यात आला.तत्कालीन पालकमंत्री सतीश चतुर्वेदी होते. तर आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, माजी खासदार गेव्ह आवारी यांनी या पुलास तीव्र विरोध दर्शविला होता. त्यानंतरही हा उड्डाणपूल उभारण्यात आला. आता या उड्डाणपुलाच्या त्रुटी दिसत असल्याने तो तोडण्याची चर्चा सुरू झाली. दटके यांनी विचारांती व अभ्यास करून सुयोग्य प्रस्ताव आणावा असे मत मांडले. उड्डाणपुलाखालील दुकानांचे पुनर्वसनही पूर्व दिशेला करता येईल असे मत मांडले. त्यावर गुडधे यांनी प्रशासनाकडून हा प्रस्ताव यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानुसार आता प्रशासनाकडून उड्डाणपूल तोडण्याबाबतचा अभ्यास केलेला, गरज असणे व नसणे याबाबतचा अंतर्भाव असलेला प्रस्ताव सभागृहात येणार आहे.
विवेकानंद स्मारकाचे संचालन रामकृष्ण मठास
अंबाझरी ओव्हरफ्लो पॉइंट येथील स्वामी विवेकानंद स्मारकाचे संचालन व पुढील देखभालीची जबाबदारी स्वामी विवेकानंद विचारधारेशी जुळलेल्या रामकृष्ण मठ या संस्थेस दहा वर्षांच्या कालालवधीसाठी देण्याच्या ठरावास महासभेने मंजुरी प्रदान केली.
सुरेश भटांचा अर्धाकृती पुतळा
रेशीमबाग येथील नवनिर्मित कविवर्य सुरेश भट सभागृहाच्या परिसरात सुरेश भट यांचा अर्धाकृती पुतळा स्थापित करण्यास महासभेने मंजुरी प्रदान केली. या सभागृहाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.सभागृहाचे ९० टक्के काम झाले आहे.
रेल्वे स्थानक, गणेश टेकडी मंदिरासमोरील मानस चौक ते जयस्तंभ चौकादरम्यानचा उड्डाणपूल पाडण्याच्या नोटीसवर मंगळवारी महासभेत चर्चा करण्यात आली. हा उड्डाणपूल पाडण्यासाठी योग्य पद्धतीने सर्वंकष विचार करूनच निर्णय घ्यावा या विरोधकांच्या मागणीनंतर अखेर यासंदर्भात प्रशासनाकडून प्रस्ताव आणला जावा, असे ठरले. वाहतुकीच्या कारणास्तव काही संस्थांनी हा उड्डाणपूल पाडावा असे निवेदन केल्यानंतर माजी महापौर प्रवीण दटके यांनी यासंदर्भात नोटीस दिली होती.
या उड्डाणपुलामुळे शहरातील श्रद्धास्थान असलेल्या श्री गणेश मंदिर टेकडीच्या दर्शनार्थ जाणाऱ्या भाविकांना व रेल्वे स्थानकावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांकरिता अडचणीचा ठरत आहे. शिवाय, उड्डाणपुलाखाली असलेल्या दुकानांमुळेही नागरिकांना अडचण होत आहे. वाहतूक खोळंबत आहे. रेल्वे स्थानकावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांकरिता पूर्व-पश्चिम नागपूर जोडणाऱ्या रामझुला मार्गे जयस्तंभ चौकात येणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. भविष्यात मेट्रो रेल्वे, रामझुल्याचा भाग बघता वाहतूक कोंडी तोडण्यासाठी हा उड्डाणपूल तोडावा अशी विनंती जनाक्रोश, गणेश मंदिर संस्था व इतर काही संस्थांनी मनपाकडे तक्रारी व निवेदनातून केली. त्यानुसार ही नोटीस आणण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी या नोटीसची गरज काय असा सवाल करीत नोटीसऐवजी प्रशासनाकडून प्रस्ताव आणावा असे मत मांडले.
या नोटीसवर किमान चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या उड्डाणपुलाखाली असलेल्या दुकानदारांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही असेल याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. टी. चंद्रशेखर नागपूरचे आयुक्त असताना त्यांच्या कार्यकाळात हा उड्डाणपूल उभारण्यात आला.तत्कालीन पालकमंत्री सतीश चतुर्वेदी होते. तर आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, माजी खासदार गेव्ह आवारी यांनी या पुलास तीव्र विरोध दर्शविला होता. त्यानंतरही हा उड्डाणपूल उभारण्यात आला. आता या उड्डाणपुलाच्या त्रुटी दिसत असल्याने तो तोडण्याची चर्चा सुरू झाली. दटके यांनी विचारांती व अभ्यास करून सुयोग्य प्रस्ताव आणावा असे मत मांडले. उड्डाणपुलाखालील दुकानांचे पुनर्वसनही पूर्व दिशेला करता येईल असे मत मांडले. त्यावर गुडधे यांनी प्रशासनाकडून हा प्रस्ताव यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानुसार आता प्रशासनाकडून उड्डाणपूल तोडण्याबाबतचा अभ्यास केलेला, गरज असणे व नसणे याबाबतचा अंतर्भाव असलेला प्रस्ताव सभागृहात येणार आहे.
विवेकानंद स्मारकाचे संचालन रामकृष्ण मठास
अंबाझरी ओव्हरफ्लो पॉइंट येथील स्वामी विवेकानंद स्मारकाचे संचालन व पुढील देखभालीची जबाबदारी स्वामी विवेकानंद विचारधारेशी जुळलेल्या रामकृष्ण मठ या संस्थेस दहा वर्षांच्या कालालवधीसाठी देण्याच्या ठरावास महासभेने मंजुरी प्रदान केली.
सुरेश भटांचा अर्धाकृती पुतळा
रेशीमबाग येथील नवनिर्मित कविवर्य सुरेश भट सभागृहाच्या परिसरात सुरेश भट यांचा अर्धाकृती पुतळा स्थापित करण्यास महासभेने मंजुरी प्रदान केली. या सभागृहाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.सभागृहाचे ९० टक्के काम झाले आहे.