अ‍ॅपशहर

सत्तेला पवारांचे छुपे पाठबळ

शिवसेना सरकारविरोधात आंदोलन करीत असले तरी राज्यातील सरकारला अजिबात धोका नाही. शरद पवारांचे छुपे पाठबळ भाजपला असल्याने सत्तेला धोका नसल्याचे सूचक वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

Maharashtra Times 23 Sep 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, अमरावती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ramdas athwale says against sharad pawar
सत्तेला पवारांचे छुपे पाठबळ


शिवसेना सरकारविरोधात आंदोलन करीत असले तरी राज्यातील सरकारला अजिबात धोका नाही. शरद पवारांचे छुपे पाठबळ भाजपला असल्याने सत्तेला धोका नसल्याचे सूचक वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

अमरावती महापालिकेच्या स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमासाठी अमरावती दौऱ्यावर आलेल्या आठवले यांनी शासकीय विश्रामगृह येथील पत्रपरिषदेत सरकारच्या कामगिरीचे कौतुक करीत काँग्रेसचे भविष्य अंधारमय असल्याची टीका केली. शिवसेना सरकारविरोधात आंदोलन करीत असली तरी २०१९पर्यंत ती सोबत आहे. त्यामुळे सरकार पडण्याची शक्यता नाहीच. तशी वेळ आली तरी शरद पवार एनडीएचे छुपे पाठीराखे आहेत. त्यांच्या पाठींब्यावर सरकार तरणार आहे. प्रसंगी आपणही १५ आमदारांची जुळवाजुळव करणार आहोत, असा विश्वास त्यांनी दर्शविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार चौफेर चांगली कामगिरी करीत आहे. आर्थिक स्वच्छतेसाठी त्यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला आहे. जीएसटीमुळेदेखील देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात रस्त्यांचे जाळे विणल्या जात आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, जनधन योजना, उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ होत आहे. सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला असल्याचा दावाही त्यांनी केला.

राणेंनी रिपाइंत यावे

नारायण राणे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत. त्यांच्या निर्णयाशी आपण सहमत असल्याचे आठवले म्हणाले. राणे भाजपात नक्कीच प्रवेश करणार आहेत, परंतु त्यांनी भाजपात प्रवेश न घेतल्यास रिपाइंत यावे, असे त्यांनी सांगितले. राणेंना केंद्रातील मंत्रीपद मिळण्याचे भाकीतही त्यांनी वर्तविले. वेगळ्या विदर्भाबाबत सरकार सकारात्मक आहे. २०१९ पूर्वी वेगळा विदर्भ होईल, असा विश्वास त्यांनी दर्शविला. सरकार मार्केटींग करीत असल्याचा आरोप होत असला तरी काँग्रेसला ते जमले नाही, याचे त्यांना दु:ख आहे. चांगल्या कामाची प्रसिद्धी काँग्रेसला का करता आली नाही, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसचे भविष्य अंधकारमय आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस उभारी घेत नसल्याचेही मत मांडले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज