अ‍ॅपशहर

राष्ट्रसंतांना लाखो भाविकांची मौन श्रद्धांजली

‘अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून अखिल विश्व सुखी समृद्ध करण्याचा ‘ग्रामगीता’रुपी महामंत्र देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देशाच्या कानाकोपऱ्यातून गुरुकुंजात आलेल्या लाखो भाविकांनी मंगळवारी ४ वाजून ५८ मिनिटांनी मौन श्रद्धांजली अर्पण केली. पूजापाठाचे कुठलेही अवडंबर न माजवता केवळ मौन पाळून वाहण्यात आलेल्या या श्रद्धांजलीमुळे गुरुकुंजात नीरव शांतता पसरली होती. राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची चाकेही यावेळी थांबली होती.

Maharashtra Times 11 Oct 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, अमरावती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rastrsant tukdoji maharaj mahotsav
राष्ट्रसंतांना लाखो भाविकांची मौन श्रद्धांजली

‘अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून अखिल विश्व सुखी समृद्ध करण्याचा ‘ग्रामगीता’रुपी महामंत्र देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देशाच्या कानाकोपऱ्यातून गुरुकुंजात आलेल्या लाखो भाविकांनी मंगळवारी ४ वाजून ५८ मिनिटांनी मौन श्रद्धांजली अर्पण केली. पूजापाठाचे कुठलेही अवडंबर न माजवता केवळ मौन पाळून वाहण्यात आलेल्या या श्रद्धांजलीमुळे गुरुकुंजात नीरव शांतता पसरली होती. राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची चाकेही यावेळी थांबली होती.
‘जय मंगल गुरुदेव हमारे, तुम्हरे दर्शन में सुख सारे’ असे म्हणत भारताच्या कानाकोपऱ्यातून श्रद्धांजलीच्या मुख्य कार्यक्रमासाठी लाखो लोक गुरुकुंजात दाखल झाले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण अश्बिन वद्य पंचमी ११ ऑक्टोबर १९६८ला दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी झाले होते. तेव्हापासून दरवर्षी अविरत गुरुकुंजात हा श्रद्धांजली सोहळा आयोजित करण्यात येतो. मौन श्रद्धांजलीच्या मुख्य कार्यक्रमाला साडेतीन वाजता ‘गुरुदेव हमारा प्यारा’ या अर्चना गीताने सुरुवात झाली. राष्ट्रसंतांच्या जीवन कार्याचे स्मरण करण्याची, त्यातून प्रेरणा घेण्याची आणि काही सत्संकल्प करण्याची ही वेळ असते. त्यामुळेच या प्रसंगी राष्ट्रसंतांच्या भव्यदिव्य विश्वव्यापक कार्याची माहिती शब्द व सुरांच्या माध्यमातून अलोट जनसमुदायाला करून दिल्या गेली. सुमारे तीन तास लाखोंचा जनसमुदाय राष्ट्रसंतांच्या विश्वात्मक विचार व कार्याचा, त्यातून भासणाऱ्या त्यांच्या दिव्यत्वाचा अनुभव घेत ध्यानस्थ बसला होता. ४ वाजून ५८ मिनिटांनी शिस्तबद्धरितीने तमाम गुरुदेवभक्तांनी महासमाधीच्या दिशेने हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानंतर आरती व सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन अशा सर्व धर्माच्या प्रार्थना आपआपल्या धर्मगुरूंकडून येथे करण्यात आल्या. हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी काही क्षणासाठी राष्ट्रीय महार्गावरील वाहतूक थांबविण्यात येऊन दुकानातील व्यवहार, भोंगे बंद करण्यात आल्यामुळे सर्वत्र नीरव शांतता पसरली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज