अक्षय गांधी
नागपूर : 'भय्या, एक बडा ग्लास रस देना, बरफ ज्यादा मत डालना...' हे वाक्य तापत्या उन्हात बाहेर पडणाऱ्यांचे, ऊसाच्या रसाच्या ठेल्यावरचे! उपराजधानीतील कडक उन्हाळ्यात ४७ अंश सेल्सियसमध्येही दिवसभर कष्ट करून हे श्रमिक उसाच्या रसाच्या माध्यमातून नागपूरकरांना गारवा देत असतात. मात्र, यंदाच्या करोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये उसाच्या रसाच्या यंत्राची चाकेही रुतली. फिरत्या चाकांवरचा 'गोडवा' देणारा हा व्यवसायच बुडाल्याने या श्रमिकांचा आता जगण्यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे.
गाव-खेड्यात आजही उसाचा रस काढण्याची परंपरागत पद्धत आहे. बैलाला जुंपून लाकडीयंत्राच्या साहाय्याने ऊसाचा रस आठवडी बाजारात काढला जातो. केरोसीनवर किंवा विजेवर चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्यानेही रस काढतात. मात्र, केरोसीन मिळणे कठीण झाल्याने हातठेल्यावरून गल्लीबोळात फिरणाऱ्या ऊसाच्या रसविक्रेत्यांची वर्दळ वाढली. हातठेल्यावरून विनायंत्र स्वत:च्या हाताने रस काढणारेही रसवाले अनेक आहेत. चरितार्थ चालविण्यासाठी अनेकजणांनी हा ऊसाच्या रसाचा गारवा देण्याचा व्यवसाय स्वीकारला. त्यांचे परिश्रम बघून वाटसरूंकडूनही त्यांना उदंड प्रतिसाद मिळत गेला. माफत दरात, ताजा रस मिळत असल्याने उपराजधानीत ऊसाच्या रसवंत्यांचे जाळे वाढत गेले. यात परप्रांतीयांची मोठी संख्या आहे.
आयुष्यच झाले लॉकडाउन
मूळ उत्तर प्रदेशचे रहिवासी, सध्या काचीपुरा येथील वस्तीत राहणारे मनीराम यादव दरवर्षी उन्हाळ्यात व्हीआयपी रोडवर उसाच्या रसाचा हातठेला लावतात. ते म्हणाले, 'उसाच्या रसाची नागपुरातील वाढती मागणी बघून दरवर्षी घरातील मुलांना मी नागपुरात बोलावून घेतो आणि विविध ठिकाणी ठेला लावून देत असतो. यासाठी किरायाने गाडीही ठरलेलीच आणि उन्हाळ्याचा मोसम संपला की, मुले मुळ गावी परत जातात. या मोसमात होणाऱ्या कमाईचा हातभार घर चालविण्यासाठी होत असे. मात्र, यंदा करोनाने सर्वच बिघडवले. लॉकडाउनमुळे संपूर्ण व्यवसायच बुडाला. यंदा दिवाळीही साजरी करता येणार नाही.'
ठरलेले चेहरेही दुरावले
व्हीएनआयटीजवळ उसाच्या रसाचा ठेला लावणारे गोविंद म्हणतात की, माझे ग्राहक ठरलेले असतात. दिवसभरात नवीन ग्राहक जास्त नसतात. मात्र, ठरलेले ग्राहक नियमित वेळेत येत असतात. कुणाला बरफ नको, तर एखाद्याला अद्रक आणि पुदिना जास्त लागतो. ठेल्याजवळ गाडी उभी राहिली की, त्यांनी न सांगता अवघ्या काही मिनिटांत त्यांना त्यांना हवा तसा रसाचा ग्लास द्यायचो. मात्र, करोनामुळे यंदा ते ओळखीचे चेहरेही दिसले नाहीत.
'भय्या…, ताजा देना'
अनेक ग्राहकांना असे वाटायचे की, उसाचा रस विकणारे रस कमी आणि पाणीच जास्त टाकतात. त्यामुळे काही ठराविक ग्राहक आल्यावर त्यांच्यासमोर भांडे रिकामे करूनच ताजा रस काढावा लागायचा. मात्र, काहींना तर आमच्या स्वच्छतेवरही शंका असायची. म्हणून अशा ग्राहकांसमोर भांडी आणि यंत्र धुवून रस काढावा लागायचा. 'भय्या ताजा रस देना' हे प्रत्येक ग्राहकांचे वाक्य असायचे. करोनामुळे यंदा मात्र सारे काम बिघडले, असे रसविक्रेता कृष्णा मोरवाल म्हणाला.
सावली आणि गारवा
शहरात वर्धा मार्ग, अंबाझरी, व्हीआयपी रोड, धरमपेठ, नंदनवन, फुटाळा अशा जवळपास सर्वच मुख्य रस्त्यांवर तसेच शहरातील गल्ली, उद्याने, बाजारपेठ आणि रुग्णालयांजवळही हे ठेले असतात. इतवारीमध्ये तर संपूर्ण १२ महिने उसाचा रस मिळत असते. कावीळ झालेल्यांसाठी हे उपयुक्त असल्याने इतवारीतील काळ्या उसाचे रस प्रसिद्ध आहे. याशिवाय परिसरानुसारही ऊसाच्या रसाच्या दरात तफावत दिसून येत असते, हे विशेष.
नागपूर : 'भय्या, एक बडा ग्लास रस देना, बरफ ज्यादा मत डालना...' हे वाक्य तापत्या उन्हात बाहेर पडणाऱ्यांचे, ऊसाच्या रसाच्या ठेल्यावरचे! उपराजधानीतील कडक उन्हाळ्यात ४७ अंश सेल्सियसमध्येही दिवसभर कष्ट करून हे श्रमिक उसाच्या रसाच्या माध्यमातून नागपूरकरांना गारवा देत असतात. मात्र, यंदाच्या करोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये उसाच्या रसाच्या यंत्राची चाकेही रुतली. फिरत्या चाकांवरचा 'गोडवा' देणारा हा व्यवसायच बुडाल्याने या श्रमिकांचा आता जगण्यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे.
गाव-खेड्यात आजही उसाचा रस काढण्याची परंपरागत पद्धत आहे. बैलाला जुंपून लाकडीयंत्राच्या साहाय्याने ऊसाचा रस आठवडी बाजारात काढला जातो. केरोसीनवर किंवा विजेवर चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्यानेही रस काढतात. मात्र, केरोसीन मिळणे कठीण झाल्याने हातठेल्यावरून गल्लीबोळात फिरणाऱ्या ऊसाच्या रसविक्रेत्यांची वर्दळ वाढली. हातठेल्यावरून विनायंत्र स्वत:च्या हाताने रस काढणारेही रसवाले अनेक आहेत. चरितार्थ चालविण्यासाठी अनेकजणांनी हा ऊसाच्या रसाचा गारवा देण्याचा व्यवसाय स्वीकारला. त्यांचे परिश्रम बघून वाटसरूंकडूनही त्यांना उदंड प्रतिसाद मिळत गेला. माफत दरात, ताजा रस मिळत असल्याने उपराजधानीत ऊसाच्या रसवंत्यांचे जाळे वाढत गेले. यात परप्रांतीयांची मोठी संख्या आहे.
आयुष्यच झाले लॉकडाउन
मूळ उत्तर प्रदेशचे रहिवासी, सध्या काचीपुरा येथील वस्तीत राहणारे मनीराम यादव दरवर्षी उन्हाळ्यात व्हीआयपी रोडवर उसाच्या रसाचा हातठेला लावतात. ते म्हणाले, 'उसाच्या रसाची नागपुरातील वाढती मागणी बघून दरवर्षी घरातील मुलांना मी नागपुरात बोलावून घेतो आणि विविध ठिकाणी ठेला लावून देत असतो. यासाठी किरायाने गाडीही ठरलेलीच आणि उन्हाळ्याचा मोसम संपला की, मुले मुळ गावी परत जातात. या मोसमात होणाऱ्या कमाईचा हातभार घर चालविण्यासाठी होत असे. मात्र, यंदा करोनाने सर्वच बिघडवले. लॉकडाउनमुळे संपूर्ण व्यवसायच बुडाला. यंदा दिवाळीही साजरी करता येणार नाही.'
ठरलेले चेहरेही दुरावले
व्हीएनआयटीजवळ उसाच्या रसाचा ठेला लावणारे गोविंद म्हणतात की, माझे ग्राहक ठरलेले असतात. दिवसभरात नवीन ग्राहक जास्त नसतात. मात्र, ठरलेले ग्राहक नियमित वेळेत येत असतात. कुणाला बरफ नको, तर एखाद्याला अद्रक आणि पुदिना जास्त लागतो. ठेल्याजवळ गाडी उभी राहिली की, त्यांनी न सांगता अवघ्या काही मिनिटांत त्यांना त्यांना हवा तसा रसाचा ग्लास द्यायचो. मात्र, करोनामुळे यंदा ते ओळखीचे चेहरेही दिसले नाहीत.
'भय्या…, ताजा देना'
अनेक ग्राहकांना असे वाटायचे की, उसाचा रस विकणारे रस कमी आणि पाणीच जास्त टाकतात. त्यामुळे काही ठराविक ग्राहक आल्यावर त्यांच्यासमोर भांडे रिकामे करूनच ताजा रस काढावा लागायचा. मात्र, काहींना तर आमच्या स्वच्छतेवरही शंका असायची. म्हणून अशा ग्राहकांसमोर भांडी आणि यंत्र धुवून रस काढावा लागायचा. 'भय्या ताजा रस देना' हे प्रत्येक ग्राहकांचे वाक्य असायचे. करोनामुळे यंदा मात्र सारे काम बिघडले, असे रसविक्रेता कृष्णा मोरवाल म्हणाला.
सावली आणि गारवा
शहरात वर्धा मार्ग, अंबाझरी, व्हीआयपी रोड, धरमपेठ, नंदनवन, फुटाळा अशा जवळपास सर्वच मुख्य रस्त्यांवर तसेच शहरातील गल्ली, उद्याने, बाजारपेठ आणि रुग्णालयांजवळही हे ठेले असतात. इतवारीमध्ये तर संपूर्ण १२ महिने उसाचा रस मिळत असते. कावीळ झालेल्यांसाठी हे उपयुक्त असल्याने इतवारीतील काळ्या उसाचे रस प्रसिद्ध आहे. याशिवाय परिसरानुसारही ऊसाच्या रसाच्या दरात तफावत दिसून येत असते, हे विशेष.