राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या समितीने दिलेला अहवाल पूर्णपणे चुकीचा असल्याचे शूटर नवाब शाफत अली खान यांनी स्पष्ट केले आहे. वाघिण घटनेच्या दिवशी आक्रमक नव्हती, हे म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तिला डार्ट लागला होता. पण बंदुकीची गोळी जिप्सीपासून सहा मीटर वर लागली हे समोर आले आहे. याचा अर्थ अवनी आक्रमक होती व ती जिप्सीवर झेप घेण्याच्या तयारीत होती. यात कुणाचा जीव गेला असता तर जबाबदार कोण असते, असे खान यांनी म्हटले आहे. असगर अली जवळ बंदुकीचा परवाना आहे. आम्हाला राज्य सरकारनेच बोलाविले होते. त्यामुळे आम्ही स्वत:हून आलो नव्हतो. चौकशी समितीवर वन्यजी प्रेमिंचा दबाव होता. त्यामुळे त्यांनी चुकीचा अहवाल दिला. वाघिणीच्या नावाखाली एनजीओ लाखो रुपये परदेशातून मिळवतात. याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असे खान म्हणाले
अहवाल पूर्णत: चुकीचा
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या समितीने दिलेला अहवाल पूर्णपणे चुकीचा असल्याचे शूटर नवाब शाफत अली खान यांनी स्पष्ट केले आहे...
Maharashtra Times 7 Dec 2018, 4:00 am