अ‍ॅपशहर

गोहत्याबंदी हवीच!

गोहत्या बंदी आवश्यकच आहे, त्याबाबतच्या कायद्याची योग्य अंमलबजावणी केली जावी. गोहत्येच्या घटनांचा आधार घेत राजकीय स्वार्थ साधला जातो आहे. गोसेवक आणि स्वार्थी व‌रिोधक यांना एकाच पारड्यात मोजले जाऊ नये, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात केले.

Maharashtra Times 12 Oct 2016, 12:01 am
सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rss chief mohan bhagwat defends gau rakshaks
गोहत्याबंदी हवीच!


म. टा. प्रतिनिधी, नागपूर

गोहत्या बंदी आवश्यकच आहे, त्याबाबतच्या कायद्याची योग्य अंमलबजावणी केली जावी. गोहत्येच्या घटनांचा आधार घेत राजकीय स्वार्थ साधला जातो आहे. गोसेवक आणि स्वार्थी व‌रिोधक यांना एकाच पारड्यात मोजले जाऊ नये, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात केले.

गोरक्षणासाठी अनेकजण कायद्याच्या चौकटीत काम करत आहेत. त्यांची तुलना गोरक्षणाच्या नावाखाली समस्या निर्माण करणाऱ्यांशी होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जैन समाज कायद्याच्या चौकटीत राहून यासाठी चांगले काम करत आहे. काही तथाकथित गोरक्षकांनी दलित आणि मुस्लिमांना लक्ष्य केले होते. हे लोक गोरक्षणाच्या नावाखाली समाजविघातक कारवायांमध्ये गुंतलेले आहेत, अशांच्या मुसक्या आवळण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. उनासारख्या घटना लाजिरवाण्या असून त्या घडायला नको होत्या, असे ते म्हणाले.

भारतीय आर्थिक सेवेचे निवृत्त अधिकारी तसेच अ. भा. हरिजन लीगचे राष्ट्रीय महामंत्री सत्यप्रकाश प्रमुख अतिथी होते. ‘कुरूक्षेत्र मे फिरसे होगा असुर शक्ती का पूर्ण विनाश’ असा संदेश लिहिलेल्या व्यासपीठावरून बोलताना सरसंघचालकांनी देशविरोधी शक्तींचा समाचार घेतला. केंद्र सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. गायिका अनुराधा पौडवाल, गायक मनोज तिवारी यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

पैसा जातो कुठे?

‘केंद्राकडून क‌ाश्मीरला मोठ्या प्रमाणात‌ निधी जातो. मात्र त्या तुलनेत तेथे विकासकामे होत नाहीत. काश्मिरचा पैसा नेमका जातो कुठे हेच कळत नाही,’ अशी खंत व्यक्त करून भागवत यांनी काश्मिरातील राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली.

काट्याचा नायटा करणे थांबवा

आपल्या समाजात अगोदरच असलेले भेद मिटवण्यात अद्याप आपण यशस्वी झालेलो नाही. छोट्या-मोठ्या घटना घडला ‌की, त्यांचा बाऊ करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सातत्याने होतो आहे. खोटा प्रचार करून काट्याचा नायटा करणाऱ्या शक्तींना थांबविणे आवश्यक आहे, असे भागवत म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज