नागपूर
कोकणात होऊ घातलेल्या बहुचर्चित 'नाणार' प्रकल्पाविरोधात विरोधी पक्षांनी आज विधानसभेत जोरदार गोंधळ घातला. विरोधी पक्षांना यावेळी सत्ताधारी शिवसेनेचीही साथ मिळाली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासमोरचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी घातलेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
नाणार प्रकल्पाविरोधात आवाज उठवण्यासाठी नाणारवासिय आज मोठ्या संख्येने नागपुरात आले होते. नाणार प्रकल्पाविरोधात विधानभवनाबाहेर आंदोलन सुरू असल्याची माहिती देण्यासाठी राजापूरचे सेनेचे आमदार राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे 'पाँईट ऑफ इन्फर्मेशन'अंतर्गत बोलण्याची परवानगी मागितली. परंतु, राजन साळवी यांची मागणी विधानसभाध्यक्षांनी फेटाळल्याने शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले. प्रत्येक सदस्याला पाँईंट ऑफ इन्फर्मेशननुसार बोलण्याचा अधिकार आहे. नाणार कोकणाचा विनाश करणारा प्रकल्प असून त्याविरोधात आवाज उठवण्याची शिवसेनेची भूमिका राहिली आहे, असे आमदार सुनील प्रभू म्हणाले.
नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असून यासाठी दहा वेळा निलंबित केले तरी आम्हाला फरक पडत नाही. आमची त्यासाठी तयारी आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले. हजारो शेतकरी विधानभवनाच्या बाहेर उभे आहेत. त्यांची व्यथा जाणून घेण्याची शिवसेनेची मागणी होती. पण विधानसभा अध्यक्षांनी ती ऐकली नाही. त्यामुळे आम्ही शिवसेना स्टाईलने राजदंड पळवल्याचे सरनाईक म्हणाले.
कोकणात होऊ घातलेल्या बहुचर्चित 'नाणार' प्रकल्पाविरोधात विरोधी पक्षांनी आज विधानसभेत जोरदार गोंधळ घातला. विरोधी पक्षांना यावेळी सत्ताधारी शिवसेनेचीही साथ मिळाली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासमोरचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी घातलेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
नाणार प्रकल्पाविरोधात आवाज उठवण्यासाठी नाणारवासिय आज मोठ्या संख्येने नागपुरात आले होते. नाणार प्रकल्पाविरोधात विधानभवनाबाहेर आंदोलन सुरू असल्याची माहिती देण्यासाठी राजापूरचे सेनेचे आमदार राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे 'पाँईट ऑफ इन्फर्मेशन'अंतर्गत बोलण्याची परवानगी मागितली. परंतु, राजन साळवी यांची मागणी विधानसभाध्यक्षांनी फेटाळल्याने शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले. प्रत्येक सदस्याला पाँईंट ऑफ इन्फर्मेशननुसार बोलण्याचा अधिकार आहे. नाणार कोकणाचा विनाश करणारा प्रकल्प असून त्याविरोधात आवाज उठवण्याची शिवसेनेची भूमिका राहिली आहे, असे आमदार सुनील प्रभू म्हणाले.
नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असून यासाठी दहा वेळा निलंबित केले तरी आम्हाला फरक पडत नाही. आमची त्यासाठी तयारी आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले. हजारो शेतकरी विधानभवनाच्या बाहेर उभे आहेत. त्यांची व्यथा जाणून घेण्याची शिवसेनेची मागणी होती. पण विधानसभा अध्यक्षांनी ती ऐकली नाही. त्यामुळे आम्ही शिवसेना स्टाईलने राजदंड पळवल्याचे सरनाईक म्हणाले.