म.टा. प्रतिनिधी, नागपूर
करोनाच्या संकट काळात बँकांमार्फत लहान व्यावसायिक, उद्योजकांकडून वसुलीसाठी लावण्यात येत असलेल्या तगाद्यापासून तात्पुरता दिलासा मिळावा, यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याशी चर्चा करून मार्ग काढावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव दिलीप पनकुले यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली.
प्रफुल्ल पटेल भंडारा-गोंदियाच्या दौऱ्यावर आले असता पनकुले यांनी त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले. करोनाच्या उद्रेकाने सव्वा-दीड वर्षांपासून सर्व ठप्प झाले आहे. लहान व्यावसायिक, उद्योजकांनी बँकातून कर्ज काढून व्यवसाय सुरू केला. लॉकडाउनमुळे व्यापार, लघु व मोठ्या उद्योगांवरही संकट ओढवले. अशा संकट काळात कुटुंब चालवायचे की बँकेचा हप्ता व व्याज भरायचे असा प्रश्न अनेकांसमोर आहे. उत्पन्नच नसल्याने बँकेचा हप्ता भरणे तर दूर, उदरनिर्वाह करण्याचे आव्हान अनेक घटकांसमोर आहे. ही वस्तुस्थिती असतानाही बँकांकडून वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे. आधीच हवालदिल झालेल्या लोकांवर मानसिक दडपण आले आहे. लहान व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज घेतलेल्यांना क्रेडिट स्कोअर खराब होऊ नये व व्यवसाय, उद्योगांना नव्याने चालना मिळावी म्हणून राज्य आणि केंद्राने संयुक्त पॅकेज व योजना जाहीर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही पनकुले यांनी केली.
करोनाच्या संकट काळात बँकांमार्फत लहान व्यावसायिक, उद्योजकांकडून वसुलीसाठी लावण्यात येत असलेल्या तगाद्यापासून तात्पुरता दिलासा मिळावा, यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याशी चर्चा करून मार्ग काढावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव दिलीप पनकुले यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली.
प्रफुल्ल पटेल भंडारा-गोंदियाच्या दौऱ्यावर आले असता पनकुले यांनी त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले. करोनाच्या उद्रेकाने सव्वा-दीड वर्षांपासून सर्व ठप्प झाले आहे. लहान व्यावसायिक, उद्योजकांनी बँकातून कर्ज काढून व्यवसाय सुरू केला. लॉकडाउनमुळे व्यापार, लघु व मोठ्या उद्योगांवरही संकट ओढवले. अशा संकट काळात कुटुंब चालवायचे की बँकेचा हप्ता व व्याज भरायचे असा प्रश्न अनेकांसमोर आहे. उत्पन्नच नसल्याने बँकेचा हप्ता भरणे तर दूर, उदरनिर्वाह करण्याचे आव्हान अनेक घटकांसमोर आहे. ही वस्तुस्थिती असतानाही बँकांकडून वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे. आधीच हवालदिल झालेल्या लोकांवर मानसिक दडपण आले आहे. लहान व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज घेतलेल्यांना क्रेडिट स्कोअर खराब होऊ नये व व्यवसाय, उद्योगांना नव्याने चालना मिळावी म्हणून राज्य आणि केंद्राने संयुक्त पॅकेज व योजना जाहीर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही पनकुले यांनी केली.