म.टा. प्रतिनिधी, नागपूर
'छोट्या राज्यांचे स्वप्न दाखवून सत्ता मिळवायची आणि जनतेला मूर्ख बनवायचे हा भाजपचा राजकीय फंडा आहे', अशी टीका विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. श्रीहरी अणे यांनी शुक्रवारी केली.
विदर्भ असो वा त्रिपुरा असो, तिथे सत्ता मिळविण्यासाठी भाजप सातत्याने लहान आणि वेगळ्या राज्याचे स्वप्न दाखवित आला आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांना वेगळा विदर्भ नको असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. विदर्भ वेगळा व्हावा, यासाठी भाजपनेच पुढाकार घेत आंदोलन पेटविले होते. विदर्भाच्या मुद्द्यावर लोकांनी भाजपला मतदान केले. पण, भाजपने जनतेच्या भावनेचा अनादर करीत अद्यापपावेतो विदर्भ राज्य स्थापन केले नाही. यावरूनच त्यांची भूमिका स्पष्ट होत असल्याचा दावा अॅड. अणे यांनी केला. यावेळी अणे यांनी राष्ट्रीय नवराज्य निर्माण महासंघाच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ नसल्याचा उच्चार केला. विदर्भाप्रमाणेच इतर राज्यांमध्येही लहान राज्यांची मागणी पुढे येत आहे. परंतु, केंद्र सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ते म्हणाले.
१ मे रोजी काळा दिवस
दरवर्षीप्रमाणे यंदाही १ मे हा महाराष्ट्रदिन काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. यावेळी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येणार आहे. तसेच येत्या १९ मार्च रोजी विदर्भ राज्य आघाडी आणि इतर सहकारी संघटना यांच्यावतीने राजघाट ते पार्लिमेंट स्ट्रीट असा मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये विदर्भ राज्य आघाडीचे ४०० सदस्य सहभागी होणार आहे. आंदोलनानंतर विदर्भात झालेल्या रक्ताक्षरी आंदोलनातील रक्ताने स्वाक्षरी केलेले निवेदन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे.
'छोट्या राज्यांचे स्वप्न दाखवून सत्ता मिळवायची आणि जनतेला मूर्ख बनवायचे हा भाजपचा राजकीय फंडा आहे', अशी टीका विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. श्रीहरी अणे यांनी शुक्रवारी केली.
विदर्भ असो वा त्रिपुरा असो, तिथे सत्ता मिळविण्यासाठी भाजप सातत्याने लहान आणि वेगळ्या राज्याचे स्वप्न दाखवित आला आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांना वेगळा विदर्भ नको असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. विदर्भ वेगळा व्हावा, यासाठी भाजपनेच पुढाकार घेत आंदोलन पेटविले होते. विदर्भाच्या मुद्द्यावर लोकांनी भाजपला मतदान केले. पण, भाजपने जनतेच्या भावनेचा अनादर करीत अद्यापपावेतो विदर्भ राज्य स्थापन केले नाही. यावरूनच त्यांची भूमिका स्पष्ट होत असल्याचा दावा अॅड. अणे यांनी केला. यावेळी अणे यांनी राष्ट्रीय नवराज्य निर्माण महासंघाच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ नसल्याचा उच्चार केला. विदर्भाप्रमाणेच इतर राज्यांमध्येही लहान राज्यांची मागणी पुढे येत आहे. परंतु, केंद्र सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ते म्हणाले.
१ मे रोजी काळा दिवस
दरवर्षीप्रमाणे यंदाही १ मे हा महाराष्ट्रदिन काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. यावेळी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येणार आहे. तसेच येत्या १९ मार्च रोजी विदर्भ राज्य आघाडी आणि इतर सहकारी संघटना यांच्यावतीने राजघाट ते पार्लिमेंट स्ट्रीट असा मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये विदर्भ राज्य आघाडीचे ४०० सदस्य सहभागी होणार आहे. आंदोलनानंतर विदर्भात झालेल्या रक्ताक्षरी आंदोलनातील रक्ताने स्वाक्षरी केलेले निवेदन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे.