वर्धा : जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य व किरकोळ केरोसिन परवानाधारकांतर्फे बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे अयोजन करण्यात आले आहे. सॉप्टवेअरमध्ये वेळोवेळी बदल करण्यात येत असल्यामुळे मशिनमध्ये वेळोवेळी रेंज न येण्याच्या समस्येचा परवानाधारकांना सामना करावा लागतो. त्यामुळे कार्डधारक व दुकानदारांमध्ये मशीनच्या दोषामुळे वाद निर्माण होत आहेत. तसेच महागाईचा विचार करून शासनाने परवानाधारकांचे कुटुंब चालवण्या इतपत मानधन, किंवा मासिक वेतन द्यावे, यासह प्रमुख मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. सर्व तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह रास्त भाव धान्य दुकानदारांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय देशमुख यांनी केले आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांचा आज मोर्चा
जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य व किरकोळ केरोसिन परवानाधारकांतर्फे बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे अयोजन करण्यात आले आहे.
Maharashtra Times 21 Feb 2018, 4:30 pm